शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"भुजबळांना आवरा, ते महाराष्ट्र पेटवतायेत, त्यांनीच...", मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 13:02 IST

मराठ्यांना आरक्षण देण्यास कोणत्याही राजकारण्याची ठाम भूमिका नसल्याचे सांगत धनगर समाजाच्या मागण्या योग्य असून मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. तसेच धनगर समाजाला आमचा पाठिंबा असल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

लातूर : लातूर दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेनंतर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांच्या उपोषणाला भेट दिली. गेल्या १२ दिवसांपासून धनगर समाजाचे दोन बांधव आमरण उपोषणाला बसले आहेत. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची विचारपुस करत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मराठ्यांना आरक्षण देण्यास कोणत्याही राजकारण्याची ठाम भूमिका नसल्याचे सांगत धनगर समाजाच्या मागण्या योग्य असून मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. तसेच धनगर समाजाला आमचा पाठिंबा असल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. राज्यात मराठा ओबीसी हा वाद कधीच होणार नाही. छगन भुजबळ हे महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत. छगन भुजबळांना सरकारनं बळ दिलं आहे. त्यांना सरकामध्ये घेऊन मंत्रीपद दिलं आहे. त्या पदाचा गैरवापर करत आहेत. ओबीसीचे सगळे नेते माझ्या विरोधात उभं करण्याचं काम छगन भुजबळ यांनी केल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच, मी माझा समाज एका बाजुला आहे. सगळे ओबीसीचे नेते एका बाजुला आहे. नेते राजकीय स्वार्थासाठी काम करत असल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

आमची मागणी ओबीसी आरक्षणाची आहे. फक्त सगे-सोयरेची अंमलबजावणी झाली नाही. तेच आमचं म्हणणं आहे की, लवकर १३ तारखेपर्यंतअंमलबजावणी करा. सरकार आमचा गेम करणार असं वाटत नाही. सत्ताधारी, विरोधक यांना गांभीर्य नाही. त्यांना कधीही गरीबांशी देणं घेणं नाही. महाराष्ट्र पेटता राहणार नाही, असं महायुती आणि महाविकास आघाडीचं जरी हे स्वप्न असलं, तरी भुजबळचं स्वप्न राज्य पेटता राहण्याचं आहे. छगन भुजबळांना माझ्या विरोधात सरकारने उभं केलं आहे, असा गंभीर आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला.

याचबरोबर, बीडच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली असे संदेश आले आहेत. मात्र, धंनजय मुंडे यांनी सांगितले की तसे काही नाही. याबाबत धनंजय मुंडे यांचे कौतुक आहे. मात्र, तुमच्या लोकांकडून मराठ्यांना त्रास होत आहे. मराठ्यांचे कार्यक्रम उधळून लावू नका. मराठ्यांच्या लोकांना मारू नका. आमच्या लोकांना शिवीगाळ करू देऊ नका. तुम्ही परवानगीच्या बाजूने जसं पटकन बोलललात. तुम्ही मराठ्यांवर अन्याय केला तर मराठे कसे तुम्हाला सोडतील. तुम्ही मराठ्यांना त्रास दिला तर मी मराठ्यांच्या बाजूने उभे राहिल. तुम्ही जातीयवाद मोडून टाकण्यासाठी उभे राहा. मराठे तुम्हाला कधीही उचलून धरतील. मराठ्यांच्या बाजूने उभे राहा. तुम्ही वाईट वागाल तर मराठे तुम्हाला सत्तेपासून दूर करतील, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळlaturलातूरOBC Reservationओबीसी आरक्षण