शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
2
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
3
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
4
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
5
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
6
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
7
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
8
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
9
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
10
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
11
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
12
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
13
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
14
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
15
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
16
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
17
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
18
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
19
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
20
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...

मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 15:18 IST

Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai: आता असेच आंदोलन करण्याचा प्रयत्न अन्य काही नेते करण्याच्या तयारीत आहेत.

Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai: मुंबईत पाच दिवस उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी मुंबईत आलेल्या गरीब मराठा बांधवांनी शांततेत आणि संयम दाखविला. मुंबईतील एकाही व्यक्तीला कोणीही त्रास दिला नाही. सर्व जण शांततेत गेले आणि परतलेही, याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा मला नाही तर गरीब मराठ्यांचे आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते. 

मनोज जरांगे पाटील यांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत येऊन तळ ठोकला. मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी हजारो लोक मुंबईत आले. मुंबईत पर्यटनही केले. मंत्रिमंडळ उपसमितीने मसुदा तयार करून मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. जीआर काढून आश्वासन पूर्ण केले. मनोज जरांगे यांनी उपोषणाला अखेर यश आले. मराठा बांधवांनी विजयाचा गुलाल उधळला. सरकारने काढलेले जीआर मान्य करत जरांगे यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या फॉर्म्युल्याची चर्चा सुरू झाली असून, हा हिट फॉर्म्युला अमलात आणत अशाच प्रकारचे आंदोलन करण्याची तयारी काही आंदोलनांच्या बाबतीत सुरू झाल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. 

जरांगे यांचा फॉर्म्युला 'हिट'

मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनासाठी गावाहून तयार जेवण, चार-पाच दिवस टिकेल असा शिधा, पाणी अशी पूर्ण तयारी केली होती. आता असेच आंदोलन करण्याचा प्रयत्न अन्य काही नेते करण्याच्या तयारीत आहेत. बच्चू कडू यांनी भंडारा शेतक-यांच्या सभेत मुंबईला आंदोलन करण्याचे आवाहन केले. गाड्यांसाठी वर्गणी काढा, प्रत्येकाने दोन-पाच किलो तांदूळ, गहू घ्या, आठ दिवसांच्या आंदोलनाच्या तयारीने मुंबईला जाऊ, असे सांगितले. धारावी बचाव आंदोलनाचे नेते बाबुराव माने यांनीही 'पुनर्वसन धारावीतच करा' या मागणीसाठी मराठा आंदोलनाप्रमाणे आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यामुळे नेत्यांना नवा फॉर्म्युला सापडला असेच दिसते.

दरम्यान, मुख्यमंत्री साहेब, दलित-मुस्लिमांना एक उपसमिती करा. शेतकऱ्यांसाठी एक उपसमिती पाहिजे. शेतकऱ्यांचेही प्रश्न सुटले पाहिजेत. आदिवासी समाजासाठीही एक मंत्रिमंडळाची उपसमिती असायला पाहिजे. का नसायला पाहिजे? मायक्रो ओबीसींसाठीही एक समिती असायला पाहिजे. त्या गरिबांचेही प्रश्न सुटतील ना, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणFarmers Protestशेतकरी आंदोलनdharavi-acधारावी