शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

"मनोज जरांगे अन् मराठा समाजाची फसवणूक करण्याचं पाप ट्रिपल इंजिन सरकार करतंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 18:53 IST

आरक्षणाचा जेव्हा मुद्दा आला आणि सरकारने शब्द दिला तेव्हाच सरकारने तातडीने सर्वेक्षण करणे गरजेचे होते असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

बारामती - मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आधीपासून वेळ दिला आहे. जरांगे पाटलांनी खूप सहन केले आणि सरकारचे ऐकूनही घेतले आहे. त्यामुळे आता मात्र मनोज जरांगे पाटील आणि समाजाची फसवणूक करायचे पाप हे ट्रिपल इंजिनचे खोके सरकार करतंय अशी शक्यता नाकारता येत नाही असं सांगत सुप्रिया सुळेंनी सरकारवर आरोप केला. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तारीख पे तारीख अशाप्रकारे मनोज जरांगे पाटलांना सातत्याने टाळलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असतानाचे विधान पाहिले. जेव्हा एखादी गोष्ट करायची नसती तेव्हा तारीख पे तारीख नाहीतर कमिटी आणि रिपोर्ट करायचे. हा फडणवीसांचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. तुम्हाला हवा असेल तर देते असं सांगत सुळे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

तसेच आरक्षणाचा जेव्हा मुद्दा आला आणि सरकारने शब्द दिला तेव्हाच सरकारने तातडीने सर्वेक्षण करणे गरजेचे होते. आता काहीतरी धावपळ करून जे काही करतायेत ते दुर्दैव आहे. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लीम समाजाला न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे कुठलाही चुकीचा रिपोर्ट देऊन यावर अन्याय होऊ नये. आताचे जे काम महाराष्ट्र सरकार अर्धवट करतेय. त्यामुळे खोटारडा रिपोर्ट काढून सरकारने कुठल्याही समाजाला फसवू नये असंही सुप्रिया सुळेंनी सरकारला म्हटलं. 

दरम्यान, लोकशाहीत आंदोलन करायचा प्रत्येकाला अधिकार आहे. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासह असंख्य लोक आज मुंबईच्या दिशेने येतायेत. हे सर्वजण शांततेच्या मार्गाने मुंबईत येतायेत. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाने त्यांना सहकार्य केले पाहिजे. जे लोक मुंबईत येतायेत त्या सर्वांचे स्वागत केले पाहिजे. या आंदोलकांना ज्या काही सुविधा लागतील त्या प्रशासनाने, सरकारने त्यांना पुरवल्या पाहिजेत कारण ही लोकशाही आहे असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील