शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"मनोज जरांगे अन् मराठा समाजाची फसवणूक करण्याचं पाप ट्रिपल इंजिन सरकार करतंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 18:53 IST

आरक्षणाचा जेव्हा मुद्दा आला आणि सरकारने शब्द दिला तेव्हाच सरकारने तातडीने सर्वेक्षण करणे गरजेचे होते असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

बारामती - मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आधीपासून वेळ दिला आहे. जरांगे पाटलांनी खूप सहन केले आणि सरकारचे ऐकूनही घेतले आहे. त्यामुळे आता मात्र मनोज जरांगे पाटील आणि समाजाची फसवणूक करायचे पाप हे ट्रिपल इंजिनचे खोके सरकार करतंय अशी शक्यता नाकारता येत नाही असं सांगत सुप्रिया सुळेंनी सरकारवर आरोप केला. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तारीख पे तारीख अशाप्रकारे मनोज जरांगे पाटलांना सातत्याने टाळलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असतानाचे विधान पाहिले. जेव्हा एखादी गोष्ट करायची नसती तेव्हा तारीख पे तारीख नाहीतर कमिटी आणि रिपोर्ट करायचे. हा फडणवीसांचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. तुम्हाला हवा असेल तर देते असं सांगत सुळे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

तसेच आरक्षणाचा जेव्हा मुद्दा आला आणि सरकारने शब्द दिला तेव्हाच सरकारने तातडीने सर्वेक्षण करणे गरजेचे होते. आता काहीतरी धावपळ करून जे काही करतायेत ते दुर्दैव आहे. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लीम समाजाला न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे कुठलाही चुकीचा रिपोर्ट देऊन यावर अन्याय होऊ नये. आताचे जे काम महाराष्ट्र सरकार अर्धवट करतेय. त्यामुळे खोटारडा रिपोर्ट काढून सरकारने कुठल्याही समाजाला फसवू नये असंही सुप्रिया सुळेंनी सरकारला म्हटलं. 

दरम्यान, लोकशाहीत आंदोलन करायचा प्रत्येकाला अधिकार आहे. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासह असंख्य लोक आज मुंबईच्या दिशेने येतायेत. हे सर्वजण शांततेच्या मार्गाने मुंबईत येतायेत. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाने त्यांना सहकार्य केले पाहिजे. जे लोक मुंबईत येतायेत त्या सर्वांचे स्वागत केले पाहिजे. या आंदोलकांना ज्या काही सुविधा लागतील त्या प्रशासनाने, सरकारने त्यांना पुरवल्या पाहिजेत कारण ही लोकशाही आहे असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील