शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

“आरक्षणाची लढाई फायनल मॅच असणार, आता आम्ही मुंबई बघणार, हिसका दाखवणार”: मनोज जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 15:06 IST

Manoj Jarange Patil News: आता करून दाखवायचे आहे. १०० टक्के सरकारकडून फसवणूक झालेली आहे. डाव कसे टाकायचे? हे आम्हाला चांगले माहिती आहे, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत येण्याबाबत सूतोवाच केले आहे.

Manoj Jarange Patil News: आता खूप ऊन आहे नाहीतर त्यांना आताच हिसका दाखवला असता. मागच्या वेळी मुंबईला गेलो आणि सुखरूप परत आलो. त्यांना तेव्हाच झटका दाखवला असता. आम्हालाही बघायचे आहे की, मंत्री कुठे राहतो, आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांनी मुंबई बघावी की नाही? त्यांनाही पाहावी असे वाटते. आमचा मुंबईला जाण्याचा विचार आहे. परंतु मी सध्या काही त्याबद्दल तुम्हाला सांगणार नाही. माझा डाव सांगणार नाही, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला धडकणार असल्याचा इशारा दिला आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तसेच सगे-सोयरेसह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले असून, त्यांनी आता मुंबईला येण्याची भाषा सुरू केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आणि बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याकांड प्रकरण चांगलेच लावून धरले आहे. यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने महायुती सरकारवर टीकेचे आसूड ओढताना दिसत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात ठेवावे

आता डाव कसे टाकायचे? हे आम्हाला चांगले माहिती आहे. परंतु आरक्षण आम्ही घेणारच आहे. अजून थोडे थांबू, पण तयारी अशी करू की चारही बाजूंनी तुम्हाला जायला रस्ता मिळणार नाही.  मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात ठेवावे, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी केला. तसेच यापुढे कमी सांगायचे आणि कमी बोलायचे, आता करून दाखवायचे आहे. इथून पुढे सरकारची चाल खेळावी लागणार आहे. सरकार निवडून येईपर्यंत काही कळू देत नाही, बोलू देत नाही. फक्त गोड बोलते. आता अचानक आंदोलन करायचे. या भूमिकेशिवाय सरकार ठिकाणावर येणार नाही, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. 

आरक्षणाची लढाई ही आता फायनल मॅच असणार

आरक्षणाची लढाई ही फायनल मॅच असणार आहे. तुम्ही गोड बोलून तर आमचा काटा काढला. पण आम्ही तुम्हाला खेटू आणि आरक्षण घेऊ राहू. मी गोडीत सांगतो, यापुढे आंदोलन लोकशाहीतच होणार आहे. पण मॅच फायनल असणार आहे. मी आरक्षण मागतोय म्हणजे मला विनाकारण जातीवादी ठरवू नका. तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध करत आहात, म्हणजे तुम्हीच जातीवादी आहात. १०० टक्के सरकारकडून फसवणूक झालेली आहे. योग्य वेळी योग्य होणे गरजेचे होते. आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचे होते आणि ओबीसींचा कायदा दुरुस्त करायचा असला तर त्याची अधिसूचना काढावी लागते. त्यावेळी त्यांनी अधिसूचना काढण्यास विलंब केला. त्यामुळे तिथे आमची फसवणूक झाली, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील