शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
5
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
6
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
7
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
8
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
9
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
10
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
11
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
12
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
13
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
14
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
15
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
16
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
17
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
18
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
19
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
20
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती

निर्णय चांगला, पण सुधारणा करा, 'तो' शब्द काढा; उपोषण मागे न घेण्यावर मनोज जरांगे ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 11:48 IST

सरकारने काढलेला जीआर आम्हाला मान्य, पण त्यात सुधारणा करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

जालना – सरकारने ज्यांच्याकडे वंशावळीच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखले देण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने घेतलेला निर्णय चांगला, परंतु वंशावळ या शब्दाऐवजी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, सरकारने काढलेल्या परिपत्रकात सुधारणा करा अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी उपोषण आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे गेल्या १० दिवसांपासून मराठ्यांना आरक्षण मिळावे यामागणीसाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून ठिकठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे.

आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे म्हणाले की, ज्या मराठा समाजाकडे कुणबी असल्याच्या नोंदी असतील त्यांना आजपासून दाखले दिले जातील. एकूण मागण्यांपैकी एक महत्त्वाचा विषय आहे. परंतु मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही आमची मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल घेतलेला निर्णय चांगला आहे. त्याचं मराठा समाजाकडून कौतुक आहे. परंतु ज्यांच्याकडे वंशावळाची नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल अशी अट आहे. परंतु आमच्याकडे कुणाकडे वंशावळाचे पुरावे नाहीत. धाडस आणि निर्णय घेण्याची क्षमता मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्र्यांनी दाखवली त्याचं कौतुक, परंतु झालेल्या निर्णयाचा फायदा समाजाला होणार नाही. निर्णय चांगला पण त्यात सुधारणा करा असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत महाराष्ट्रातील मराठा समाजाने कालचा निर्णय मान्य केला, परंतु जिथे वंशावळीचा शब्द आहे तिथे सुधारणा करा. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, वंशवळी आमच्याकडे नाही, आमची मागणी ती नाही. निर्णयात सुधारणा करावी ही आमची मागणी आहे. सरकारने काढलेला जीआर आम्हाला मान्य, पण त्यात सुधारणा करा. सरकारने आम्हाला फसवलं हे आम्ही म्हणत नाही. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, वंशावळ हा शब्द काढून सरसकट हा शब्द वापरा. महाराष्ट्रात मराठा समाजाचे जे आंदोलन सुरू आहे. आपले आंदोलन लोकशाही मार्गाने आहे. आमचे आंदोलन शांततेत आहेत. आजही हल्ल्यात जखमी झालेले मराठा बांधव रुग्णालयात उपचार घेतायेत. आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू राहणार आहे अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली.

दरम्यान, सरकारने आमची भावना समजून घ्यावी, आमच्या लेकरांना होणारा त्रास, युवकांच्या आत्महत्या, आम्ही सरकारचे दुश्मन नाही, आजपर्यंत अनेक बळी गेलेत. त्यामुळे जाता जाता तुमच्या निर्णयाचा आम्ही स्वागत केले. परंतु वंशावळीच्या जागेवर सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी सुधारणा करा. सुधारित जीआर आमच्याकडे घेऊन या. ७० वर्षात कुणी केले नाही या सरकारने केले असा आशीर्वाद तुम्हाला लागेल. त्यामुळे आणखी १-२ दिवस घ्या, सुधारणा करून नवीन जीआर काढा असंही जरांगे यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण