शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

निर्णय चांगला, पण सुधारणा करा, 'तो' शब्द काढा; उपोषण मागे न घेण्यावर मनोज जरांगे ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 11:48 IST

सरकारने काढलेला जीआर आम्हाला मान्य, पण त्यात सुधारणा करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

जालना – सरकारने ज्यांच्याकडे वंशावळीच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखले देण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने घेतलेला निर्णय चांगला, परंतु वंशावळ या शब्दाऐवजी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, सरकारने काढलेल्या परिपत्रकात सुधारणा करा अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी उपोषण आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे गेल्या १० दिवसांपासून मराठ्यांना आरक्षण मिळावे यामागणीसाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून ठिकठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे.

आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे म्हणाले की, ज्या मराठा समाजाकडे कुणबी असल्याच्या नोंदी असतील त्यांना आजपासून दाखले दिले जातील. एकूण मागण्यांपैकी एक महत्त्वाचा विषय आहे. परंतु मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही आमची मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल घेतलेला निर्णय चांगला आहे. त्याचं मराठा समाजाकडून कौतुक आहे. परंतु ज्यांच्याकडे वंशावळाची नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल अशी अट आहे. परंतु आमच्याकडे कुणाकडे वंशावळाचे पुरावे नाहीत. धाडस आणि निर्णय घेण्याची क्षमता मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्र्यांनी दाखवली त्याचं कौतुक, परंतु झालेल्या निर्णयाचा फायदा समाजाला होणार नाही. निर्णय चांगला पण त्यात सुधारणा करा असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत महाराष्ट्रातील मराठा समाजाने कालचा निर्णय मान्य केला, परंतु जिथे वंशावळीचा शब्द आहे तिथे सुधारणा करा. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, वंशवळी आमच्याकडे नाही, आमची मागणी ती नाही. निर्णयात सुधारणा करावी ही आमची मागणी आहे. सरकारने काढलेला जीआर आम्हाला मान्य, पण त्यात सुधारणा करा. सरकारने आम्हाला फसवलं हे आम्ही म्हणत नाही. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, वंशावळ हा शब्द काढून सरसकट हा शब्द वापरा. महाराष्ट्रात मराठा समाजाचे जे आंदोलन सुरू आहे. आपले आंदोलन लोकशाही मार्गाने आहे. आमचे आंदोलन शांततेत आहेत. आजही हल्ल्यात जखमी झालेले मराठा बांधव रुग्णालयात उपचार घेतायेत. आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू राहणार आहे अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली.

दरम्यान, सरकारने आमची भावना समजून घ्यावी, आमच्या लेकरांना होणारा त्रास, युवकांच्या आत्महत्या, आम्ही सरकारचे दुश्मन नाही, आजपर्यंत अनेक बळी गेलेत. त्यामुळे जाता जाता तुमच्या निर्णयाचा आम्ही स्वागत केले. परंतु वंशावळीच्या जागेवर सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी सुधारणा करा. सुधारित जीआर आमच्याकडे घेऊन या. ७० वर्षात कुणी केले नाही या सरकारने केले असा आशीर्वाद तुम्हाला लागेल. त्यामुळे आणखी १-२ दिवस घ्या, सुधारणा करून नवीन जीआर काढा असंही जरांगे यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण