शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

निर्णय चांगला, पण सुधारणा करा, 'तो' शब्द काढा; उपोषण मागे न घेण्यावर मनोज जरांगे ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 11:48 IST

सरकारने काढलेला जीआर आम्हाला मान्य, पण त्यात सुधारणा करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

जालना – सरकारने ज्यांच्याकडे वंशावळीच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखले देण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने घेतलेला निर्णय चांगला, परंतु वंशावळ या शब्दाऐवजी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, सरकारने काढलेल्या परिपत्रकात सुधारणा करा अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी उपोषण आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे गेल्या १० दिवसांपासून मराठ्यांना आरक्षण मिळावे यामागणीसाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून ठिकठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे.

आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे म्हणाले की, ज्या मराठा समाजाकडे कुणबी असल्याच्या नोंदी असतील त्यांना आजपासून दाखले दिले जातील. एकूण मागण्यांपैकी एक महत्त्वाचा विषय आहे. परंतु मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही आमची मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल घेतलेला निर्णय चांगला आहे. त्याचं मराठा समाजाकडून कौतुक आहे. परंतु ज्यांच्याकडे वंशावळाची नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल अशी अट आहे. परंतु आमच्याकडे कुणाकडे वंशावळाचे पुरावे नाहीत. धाडस आणि निर्णय घेण्याची क्षमता मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्र्यांनी दाखवली त्याचं कौतुक, परंतु झालेल्या निर्णयाचा फायदा समाजाला होणार नाही. निर्णय चांगला पण त्यात सुधारणा करा असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत महाराष्ट्रातील मराठा समाजाने कालचा निर्णय मान्य केला, परंतु जिथे वंशावळीचा शब्द आहे तिथे सुधारणा करा. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, वंशवळी आमच्याकडे नाही, आमची मागणी ती नाही. निर्णयात सुधारणा करावी ही आमची मागणी आहे. सरकारने काढलेला जीआर आम्हाला मान्य, पण त्यात सुधारणा करा. सरकारने आम्हाला फसवलं हे आम्ही म्हणत नाही. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, वंशावळ हा शब्द काढून सरसकट हा शब्द वापरा. महाराष्ट्रात मराठा समाजाचे जे आंदोलन सुरू आहे. आपले आंदोलन लोकशाही मार्गाने आहे. आमचे आंदोलन शांततेत आहेत. आजही हल्ल्यात जखमी झालेले मराठा बांधव रुग्णालयात उपचार घेतायेत. आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू राहणार आहे अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली.

दरम्यान, सरकारने आमची भावना समजून घ्यावी, आमच्या लेकरांना होणारा त्रास, युवकांच्या आत्महत्या, आम्ही सरकारचे दुश्मन नाही, आजपर्यंत अनेक बळी गेलेत. त्यामुळे जाता जाता तुमच्या निर्णयाचा आम्ही स्वागत केले. परंतु वंशावळीच्या जागेवर सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी सुधारणा करा. सुधारित जीआर आमच्याकडे घेऊन या. ७० वर्षात कुणी केले नाही या सरकारने केले असा आशीर्वाद तुम्हाला लागेल. त्यामुळे आणखी १-२ दिवस घ्या, सुधारणा करून नवीन जीआर काढा असंही जरांगे यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण