शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

माणगाव-भादाव पूल मोडकळीस

By admin | Updated: July 11, 2017 03:44 IST

माणगाव काळ नदीवर वसलेला भादावचा पूल म्हणून ओळखला जाणारा हा पूल १९७० मध्ये काळ प्रकल्पाने बांधला.

लोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : माणगाव काळ नदीवर वसलेला भादावचा पूल म्हणून ओळखला जाणारा हा पूल १९७० मध्ये काळ प्रकल्पाने बांधला. जवळपास ४६ वर्षांहून अधिक काळ झाला असून या पुलाचे कठडे तुटून पूल मोडकळीस आला आहे. या पुलाकडे काळ प्रकल्प खात्याने त्वरित लक्ष देऊन नव्याने बांधावा, अशी मागणी भादाव ग्रामस्थांनी केली आहे.या पुलाची आयुमर्यादा आता संपली असून तो पूल पूर्णपणे मोडकळीस आला आहे. या पुलाची अवस्था गंभीर बनली असून केव्हाही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या पुलाला चिरा-भेगा पडलेल्या असून पुलाला गळती लागली आहे. या पुलावरून केवळ दुचाकी वाहनांना जाण्यासाठी परवानगी असून तीन किंवा चारचाकी वाहनांना जाण्यासाठी बंदी आहे. हा पूल मजबूत किंवा नवीन झाल्यास भादाव ग्रामस्थांना व माणगावकरांना सोयीचे ठरणार आहे. हा पूल नव्याने बांधल्यास भादाव ग्रामस्थांचा तीन कि.मी. अंतर कमी होणार आहे. शिवाय ग्रामस्थांचा पैसा व वेळ वाचून शालेय विद्यार्थ्यांनाही ते खास सोयीचे ठरणार आहे. हा पूल कमकुवत झाला असल्याने सद्यस्थितीत भीतीचे वातावरण असून पूल कधीही कोसळण्याची शक्यता आहे. जीव मुठीत धरून ग्रामस्थ या पुलावरून प्रवास करीत आहेत.काळ प्रकल्प खात्याने अंदाजपत्रक तयार केलेले आहे. मात्र अद्याप निधीअभावी काम सुरू झाले नाही. आज या पुलाची अवस्था अत्यंत गंभीर बनली असून या पुलाकडे काळ प्रकल्प खात्याने लक्ष देऊन हा पूल मजबूत अथवा नव्याने करावा, अशी मागणी भादाव ग्रामस्थांनी केली आहे. हा प्रश्न लवकरच मार्गी न लागल्यास काळ प्रकल्प खात्यावर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.काळ प्रकल्पाअंतर्गत हा पूल येत असून सध्या या पुलाची अवस्था बिकट आहे. या पूल दुरु स्तीचे अंदाजपत्रक वरील कार्यालयात मान्यतेसाठी पाठविले आहे. तसेच आमचे ठाणे येथील अधीक्षक अभियंता लोहार यांनाही या पुलाची माहिती दिली असून येथे भेट सुद्धा दिली आहे. लवकर प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर पुलाचे काम सुरू होईल. - श्वेता पाटील, सहा.कार्यकारी अभियंता, काळ प्रकल्प माणगाव