शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

माणगाव-भादाव पूल मोडकळीस

By admin | Updated: July 11, 2017 03:44 IST

माणगाव काळ नदीवर वसलेला भादावचा पूल म्हणून ओळखला जाणारा हा पूल १९७० मध्ये काळ प्रकल्पाने बांधला.

लोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : माणगाव काळ नदीवर वसलेला भादावचा पूल म्हणून ओळखला जाणारा हा पूल १९७० मध्ये काळ प्रकल्पाने बांधला. जवळपास ४६ वर्षांहून अधिक काळ झाला असून या पुलाचे कठडे तुटून पूल मोडकळीस आला आहे. या पुलाकडे काळ प्रकल्प खात्याने त्वरित लक्ष देऊन नव्याने बांधावा, अशी मागणी भादाव ग्रामस्थांनी केली आहे.या पुलाची आयुमर्यादा आता संपली असून तो पूल पूर्णपणे मोडकळीस आला आहे. या पुलाची अवस्था गंभीर बनली असून केव्हाही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या पुलाला चिरा-भेगा पडलेल्या असून पुलाला गळती लागली आहे. या पुलावरून केवळ दुचाकी वाहनांना जाण्यासाठी परवानगी असून तीन किंवा चारचाकी वाहनांना जाण्यासाठी बंदी आहे. हा पूल मजबूत किंवा नवीन झाल्यास भादाव ग्रामस्थांना व माणगावकरांना सोयीचे ठरणार आहे. हा पूल नव्याने बांधल्यास भादाव ग्रामस्थांचा तीन कि.मी. अंतर कमी होणार आहे. शिवाय ग्रामस्थांचा पैसा व वेळ वाचून शालेय विद्यार्थ्यांनाही ते खास सोयीचे ठरणार आहे. हा पूल कमकुवत झाला असल्याने सद्यस्थितीत भीतीचे वातावरण असून पूल कधीही कोसळण्याची शक्यता आहे. जीव मुठीत धरून ग्रामस्थ या पुलावरून प्रवास करीत आहेत.काळ प्रकल्प खात्याने अंदाजपत्रक तयार केलेले आहे. मात्र अद्याप निधीअभावी काम सुरू झाले नाही. आज या पुलाची अवस्था अत्यंत गंभीर बनली असून या पुलाकडे काळ प्रकल्प खात्याने लक्ष देऊन हा पूल मजबूत अथवा नव्याने करावा, अशी मागणी भादाव ग्रामस्थांनी केली आहे. हा प्रश्न लवकरच मार्गी न लागल्यास काळ प्रकल्प खात्यावर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.काळ प्रकल्पाअंतर्गत हा पूल येत असून सध्या या पुलाची अवस्था बिकट आहे. या पूल दुरु स्तीचे अंदाजपत्रक वरील कार्यालयात मान्यतेसाठी पाठविले आहे. तसेच आमचे ठाणे येथील अधीक्षक अभियंता लोहार यांनाही या पुलाची माहिती दिली असून येथे भेट सुद्धा दिली आहे. लवकर प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर पुलाचे काम सुरू होईल. - श्वेता पाटील, सहा.कार्यकारी अभियंता, काळ प्रकल्प माणगाव