शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

मालवण प्रकरण : कोश्यारी यांची टोपी कधी उडाली नाही, मग पुतळा पडला कसा? ठाकरे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 14:54 IST

"आमचे महामहीम राज्यपाल कोश्यारी समुद्र किनारी राहत  होते. त्यांनी देखील महाराजांचा अपमान केला होता. पण जोरदार वाऱ्याने राज्यपालांची टोपी उडाली असे माझ्या तरी वाचणात आलेले नाही. हा पुतळा पडला कसा?" असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट आहे. आज सर्वपक्षीय नेत्यांनी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यातच, आमचे महामहीम राज्यपाल कोश्यारी समुद्र किनारी राहत  होते. पण जोरदार वाऱ्याने त्यांची टोपी उडाली नाही, मग हा पुतळा पडला कसा?" असा सवाल करत ठाकरे यांनी राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. 

ठाकरे म्हणाले, "महाविकास आघाडीतर्फे सर्जेकोट म्हणजे मालवन येथील पुतळा समुद्रात कोसळला, त्याघटनेचा निषेध करण्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चामध्ये मोदी शहांचे दलाल आणि काही शिवद्रोही रस्ता आडवून बसले आहेत हे शिवद्रोही आहेत. कारण सांगितले जात आहे की, महाराजांचा पुतळा हा वाऱ्याने पडला. हे कारण अत्यंत निर्लज्जपणाचा कळस गाठणारे आहे." एवढेच नाही तर, "आमचे महामहीम राज्यपाल कोश्यारी समुद्र किनारी राहत  होते. त्यांनी देखील महाराजांचा अपमान केला होता. पण जोरदार वाऱ्याने राज्यपालांची टोपी उडाली असे माझ्या तरी वाचणात आलेले नाही. हा पुतळा पडला कसा?" असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

ठाकरे पुढे म्हणाले, "याच्या पलिकडे जाऊन जे गद्दर आहेत, नाव घेऊन बोलायचे झाले तर केसरकर बोलत आहेत. काही वाईट घडलं तर, त्यातून काही चांगलं घडेल कदाचित. हे संतापजनक आहे. यामुळे आम्ही ठरवले आहे की, येणाऱ्या रविवारी म्हणजे एक तारखेला दुपारी 11 वाजण्याच्या सुमारास हुतात्मा स्मारकाला वंदन करून, आम्ही सर्वजन गेट वे ऑफ इंडियाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारला आहे, त्या पुतळ्याजवळ जमणार आहोत आणि या निर्ढावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला जोडे मारो हा कार्यक्रम तिकडे करणार आहोत."

हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम असेल. तेथे मी असेल, शरद पवार असतील, नाना पटोले असतील, तिन्ही पक्षाचे सर्वप्रमुख नेते असतील, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. त्याच प्रमाणे मी सर्व शिवप्रेमींना विनंती करतो की, आपणदेखील या सर्व सरकारच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी या आंदोलनात सहभागी व्हावे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMahavikas Aghadiमहाविकास आघाडी