शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

स्फोटात सहा मृत्यूमुखी, सीडी तुटली अन् दोन आरोपी गायब; मालेगाव बॉम्बस्फोटातील ७ आरोपी कसे निर्दोष सुटले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 14:52 IST

मालेगाव बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालय सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

Malegaon Blast verdict: महाराष्ट्रातील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात, एनआयएच्या विशेष न्यायालयाने प्रज्ञा सिंह यांच्यासह सर्व सात आरोपींना निर्दोष सोडले आहे. या प्रकरणात ७ मुख्य आरोपी होते. यामध्ये भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी यांचा समावेश आहे. स्फोटाच्या १७ वर्षानंतर कोर्टाने हा निकाल दिला. मालेगावच्या भिक्कू चौकात २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता तर १०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते.

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात १७ वर्षांनी न्यायालयाचा निकाल आला आहे. गुरुवारी मुंबईतील विशेष न्यायालयाने निकाल देताना सर्व आरोपींना निर्दोष सोडले. या प्रकरणातील दोन आरोपी बेपत्ता आहेत, ज्यांच्याविरुद्ध कोर्टाने नवीन आरोपपत्र दाखल करावे लागेल असे म्हटले आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश लाहोटी यांनी हा निकाल देताना स्पष्टपणे सांगितले की, सरकारी पक्ष आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. कोर्टाने स्पष्टपणे म्हटले की या प्रकरणात बनावट कथा तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. कोणताही धर्म दहशतवादाचे समर्थन करत नाही. त्यामळे कोर्टाने सर्व ७ आरोपींना निर्दोष मुक्त केले.

निकाल देताना विशेष न्यायाधीश लाहोटी म्हणाले की,"या प्रकरणातील काही आरोप कोर्टाने फेटाळले आहेत, तर काही स्वीकारले आहेत. कोर्टासमोर सादर केलेले पुरावे दोष सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाहीत. कर्नल पुरोहित यांनी आरडीएक्स आणल्याचा कोणताही पुरावा नाही, पुरोहित यांनी बॉम्ब बनवल्याचाही कोणताही पुरावा नाही. स्फोट झाला त्या ठिकाणी दुचाकी कोणी उभी केली याचा कोणताही पुरावा नाही. दगडफेक कोणी केली, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कोणी केले, पोलिसांची बंदूक कोणी हिसकावून घेतली याचे कोणतेही पुरावे नाहीत. या सर्व आरोपांसाठी कोणताही पुरावा सापडलेला नाही."

"घटनास्थळाचा पंचनामाही नीट करण्यात आला नव्हता आणि घटनास्थळाला बॅरिकेडिंगही करण्यात आले नव्हते. फॉरेन्सिक अहवालही योग्य नव्हता. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. प्रज्ञा ठाकूर यांच्याविरुद्ध दुचाकीच्या मालकीबाबत कोणतेही पुरावे नाहीत. प्रज्ञा ठाकूर स्फोटाच्या दोन वर्षांआधी साध्वी बनल्या होत्या आणि सरकारी वकिलांना कट रचण्यात अपयश आले आहे. या प्रकरणात यूएपीए लागू करता येत नाही कारण आरोप विचार न करता लावण्यात आले होते. अभिनव भारतच्या निधीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. कोणत्याही पुराव्याशिवाय एक चांगली कथा रचली होती आणि केवळ संशयाच्या आधारे कारवाई करण्यात आली," असंही कोर्टाने म्हटलं.

महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने सात आरोपींना अटक केली होती, पण खटला राष्ट्रीय तपास संस्थेकडून चालवला जात होता. खटल्यादरम्यान, ३९ साक्षीदारांनी साक्ष बदलली. काही सीडी तोडल्या गेल्याचे आढळून आले. या सीडींमध्ये प्रज्ञा ठाकूर, पुरोहित आणि इतरांच्या काही कट रचण्याच्या बैठकांचे व्हिडिओ फुटेज होते आणि ते सुधाकर द्विवेदी यांनी गुप्तपणे रेकॉर्ड केले होते. या सीडी कोर्टात सादर करण्यापूर्वी, त्या तोडल्या गेल्या.

टॅग्स :Malegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटSadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाCourtन्यायालय