शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 11:16 IST

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपींची सुटका करताना विशेष न्यायालयाने एटीएस आणि एनआयएच्या तपासात तीव्र विसंगती असल्याचे म्हणत या ...

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपींची सुटका करताना विशेष न्यायालयाने एटीएस आणि एनआयएच्या तपासात तीव्र विसंगती असल्याचे म्हणत या दोन्ही तपास यंत्रणांतील संघर्षावर निकालपत्रात प्रकाश टाकला. 

आरडीएक्ससह स्फोटक  यंत्र पुण्यातील एका घरात लावण्यात आले होते, असा दावा एटीएसने केला. तर एनआयएचा निष्कर्षच अगदी वेगळा आहे. हे यंत्र इंदूरमधील एका मोटारसायकलमध्ये बसविले होते आणि सेंधवा बसस्थानकावरून मालेगावला नेण्यात आले होते. अशाप्रकारे दोन्ही तपासयंत्रणांच्या आरोपपत्रांमध्ये भौतिक तफावत आहे. दोन्ही तपासयंत्रणांचा तपास स्फोटके बसविणे, त्यांची वाहतूक करणे आणि आरोपींच्या स्फोटांतील भूमिकेबद्दल सुसंगत नाही, असे न्या. ए. के. लाहोटी यांनी सातही आरोपींची सुटका करताना म्हटले.आरोपपत्रांमध्ये केलेल्या आरोपांचे समर्थन करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. आरोपपत्रांतील शब्दांकन हा निर्णायक पुरावा म्हणून ग्राह्य धरू शकत नाही, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. ‘फौजदारी खटल्यांत पुराव्यांचा संपूर्ण भार सरकारी वकिलांवर असतो आणि ते बचावपक्षाच्या कमकुवतपणावर अवलंबून राहू शकत नाही,’ अशी टिप्पणी न्यायालयाने केली. 

परिस्थितिजन्य पुराव्यांच्या आधारे दोषसिद्धीसाठी न्यायाधीशांनी पाच तत्त्वांची आठवण करून दिली. परिस्थिती, सुसंगत तथ्ये, निर्णायक पुरावे आणि आरोपीच्या निर्दोषतेबद्दल कोणतीही वाजवी शंका राहणार नाही, याची खात्री करून पुराव्यांची संपूर्ण साखळी सादर करणे याचा समावेश आहे, असे न्यायालयाने म्हटले. बॉम्बस्फोटसारखा गुन्हा देशाच्या सुरक्षितता आणि अखंडतेविरोधात असला तरी कायदा पुराव्याचा दर्जा कमकुवत करू शकत नाही, असेही न्यायालयाने अधोरेखित केले.

हा केवळ सरकारी वकिलांचा अंदाजमोटारसायकल बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आल्याचा दावा तपासयंत्रणांनी केला आहे. मात्र, ती मोटारसायकल अर्धी जळाली आणि तिचा खालचा भाग खराब झाला. त्यामुळे बॉम्ब मोटारसायकलमध्ये बसविण्यात आला होता, हा सरकारी वकिलांचा केवळ अंदाज आहे, असे न्यायालयाने म्हटले. एनआयएने तपास हाती घेतल्यानंतर प्रज्ञासिंह ठाकूरला निर्दोष ठरविले, याचीही दखल न्यायालयाने घेतली.

बॉम्बस्फोटासाठी लागणारे आरडीएक्स लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितने आणल्याचा एटीएसचा दावा फेटाळताना न्यायालयाने म्हटले की, पुरोहितने आरडीएक्स आणल्याचे, त्याचा बॉम्ब बनविल्याचे आणि तोच बॉम्ब स्फोटासाठी वापरल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. 

टॅग्स :Malegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटCourtन्यायालयNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा