शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

बालकांसाठी स्वतंत्र कायदा करा

By admin | Updated: July 19, 2014 01:47 IST

देशातील बालकांचे अधिकार, बाल न्याय तसेच बालकामगारांशी निगडित सर्व कायद्यांना सामावून घेणारा स्वतंत्र सर्वसमावेशक कायदा आणण्याची मागणी खा. विजय दर्डा यांनी राज्यसभेत अशासकीय प्रस्ताव सादर करताना केली.

शीलेश शर्मा, नवी दिल्लीदेशातील बालकांचे अधिकार, बाल न्याय तसेच बालकामगारांशी निगडित सर्व कायद्यांना सामावून घेणारा स्वतंत्र सर्वसमावेशक कायदा आणण्याची मागणी खा. विजय दर्डा यांनी राज्यसभेत अशासकीय प्रस्ताव सादर करताना केली.देशातून बेपत्ता होणारी मुले, त्यांचे अपहरण तसेच छळवणुकीबाबत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. या कायद्यांतर्गत जलद निवाडा न्यायालयांमधून दैनंदिन आधारावर सुनावणी करून निर्धारित कालावधीत निर्णयाची व्यवस्था केली जावी. मुलांचे शोषण रोखण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांत विधेयक आणतानाच बालमजुरी तसेच मुलांना पळवून नेण्यासंबंधी गुन्ह्यांबद्दल १० ते २० वर्षांच्या कठोर कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली जावी, असे खा. दर्डा यांनी स्पष्ट केले. २०११ मध्ये बेपत्ता मुुलांची संख्या ६० हजार होती. त्यापैकी २२ हजार मुलांचा अद्यापही ठावठिकाणा नाही, हे धक्कादायक तथ्य त्यांनी राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोचा हवाला देत समोर आणले. दरतासाला ११ मुले बेपत्ता होतात. त्यातील ४ मुलांचा शोध लागत नाही, अशी माहिती ‘बचपन बचाओ’च्या अहवालात आहे. आकड्यांबद्दल बोलायचे झाल्यास बेपत्ता मुुलांची संख्या दरवर्षी सर्वाधिक ९० हजारांच्या घरात असल्याची धक्कादायक माहिती आहे. एकट्या बंगालमध्ये सर्वाधिक मुले बेपत्ता होतात. या राज्यात २०११ मध्ये १२ हजार, मध्य प्रदेशात ७७९७, दिल्लीत ५,१११ मुले बेपत्ता झाल्याची माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे यात स्वत: घर सोडून गेलेल्या मुलांची आकडेवारी समाविष्ट नाही.