शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

पालकांच्या परवानगीशिवाय मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१ वर्ष करावे, लोकसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 21:08 IST

पालकांच्या परवानगीशिवाय आंतरजातीय विवाह करणा-या मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१ वर्ष करावे अशी आग्रही मागणी

- मनोहर कुंभेजकर 

मुंबई : पालकांच्या परवानगीशिवाय आंतरजातीय विवाह करणा-या मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१ वर्ष करावे अशी आग्रही मागणी उत्तर मुंबई भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आजच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत लोकसभेच्या शून्य प्रहर काळात केली  आहे. खास दिल्लीवरून त्यांनी लोकमतशी संपर्क साधून आपली यामागील भूमिका स्पष्ट केली. सगळीकडे ८ मार्च हा दिवस ' जागतिक महिला दिन ' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी उल्लेखनीय काम केलेल्या महिलांचा सत्कार केला जातो. मात्र शेट्टी यांच्या या मागणीमुळे योग्य वयात जीवनातील महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार या महिलांना मिळेल अशी अशा त्यांनी व्यक्त केली. 

याबद्दल अधिक बोलताना ते म्हणाले की, जर स्त्री तिच्या वयाच्या १८ व्या वर्षी तिच्या कुटुंबियांच्या संमतीने विवाह करत असेल तर अशा विवाहास कोणताही आक्षेप घ्यायची गरज नाही. एखादी स्त्री जर आपल्या पाल्यांच्या संमतीशिवाय आंतरजातीय प्रेमविवाह करत असेल तर अशा मुलीची लग्नाची  वयोमर्यादा २१ वर्षांपर्यंत करावी. अनेकदा असे दिसून येते कि, अनेक मुली प्रेमाच्या भरात कमी वयात लग्न करतात आणि असे करून त्या आपल्या आयुष्याचे नुकसान करून घेण्याची शक्यता अधिक असते. 

शेट्टी म्हणतात की, आंतरजातीय प्रेम विवाहात मुलींनी १८ वर्षे वयात लग्नासारख्या महत्वपूर्ण निर्णय घेणे योग्य नाही.कारण या अजाणत्या वयात कोण योग्य आणि काई अयोग्य याची कल्पना या मुलींना नसते. भारत सरकारला एक नवीन आणि सुयोग्य कायदा लागू करण्याची  चांगली संधी असून याचा फायदा देशातील महिलांना होऊन त्या आत्मनिर्भर होतील असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

टॅग्स :Gopal Shettyगोपाळ शेट्टी