शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवा!

By admin | Updated: June 9, 2014 01:21 IST

शोषित व्यक्ती आणि समाजाला सशक्त व सार्मथ्यवान बनविण्यासाठी सर्वांंनी आपली शक्ती झोकून द्यावी. राष्ट्रसाधनेसाठी गरीब आणि दलितांना सशक्त बनवा, शिवाय कुणाच्या भरोशावर न राहता

राष्ट्रऋषी लहिरी गुरुजी यांचे प्रतिपादन : शिवराज्याभिषेकदिन कार्यक्रमनागपूर : शोषित व्यक्ती आणि समाजाला सशक्त व सार्मथ्यवान बनविण्यासाठी सर्वांंनी आपली शक्ती झोकून द्यावी. राष्ट्रसाधनेसाठी गरीब आणि  दलितांना सशक्त बनवा, शिवाय कुणाच्या भरोशावर न राहता भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे आवाहन राष्ट्रऋषी लहिरी गुरुजी यांनी येथे  केले. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने ‘सुराज मे भागीदारी’ या विषयावर जरीपटका येथील महात्मा गांधी सेन्टेनियल सिंधू हायस्कूलमध्ये रविवारी  विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, व्ही.के. सिंग तर प्रमुख अतिथी म्हणून अनिल सोले आणि  उद्योजिका पद्मश्री कमला सरोज मंचावर होते. ऋषी संस्कृतीचे जतन करालहिरी गुरुजी यांनी सांगितले की, माणसाला नराचा नारायण बनविणारी भारतीय संस्कृती आहे. या महान साधनेशी जुळून शिवाजी महाराज आणि  भगवान बुद्ध बना. भगवान श्रीरामने तब्बल १४ वर्षे पदयात्रा करून भारतातून जातीवाद आणि शोषणाची मानसिकता मिटविण्यासाठी भारतभर पदयात्रा  केली आणि दलितांमध्ये राहून त्यांचा विकास केला. प्रांतवाद, जातीवाद आणि पंथाच्या आधारावर राज्य सुरक्षित राहणार नाही. प्रभू श्रीराम आणि  भगवान गौतम बुद्धाचे जीवनचरित्र सांगताना ते म्हणाले की, ऋषी संस्कृतीचे जतन होईल तरच माझे राज्य सुरक्षित राहील, असे त्यांचे विचार होते.  त्यांनी मनात आणले असते तर ते राजा बनून जीवन जगू शकले असते. पण त्यांनी शोषितांची सेवा केली. ऋषी संस्कृती ही शिवाजी महाराज, संत  तुकाराम महाराज व रामदास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात आली. आपण जन्मापासूनच ‘मी’पणाच्या अहंकारात गुरफटतो आणि  जीवनाचे नुकसान करून बसतो. प्रत्येकजण जन्माने एकसमान असतात. काहीजण दैनंदिन जीवन जगतो तर काही आपले जीवन देशसेवेसाठी वाहून  नेतो. महान लोकांच्या जीवनचरित्राचा अवलंब करा, असा संदेश त्यांनी दिला. व्ही.के. सिंग यांनी सांगितले की, स्वराज्य, परिवर्तन आणि विकासाच्या गोष्टीसाठी सर्वांंंनी एकत्रित यावे. नारे देऊन देश चालत नाही, लोकलढय़ात  सर्वांंचा सहभाग असावा. देशात संशोधने असतानाही दरवर्षी ४0 टक्के धान्य नष्ट होते तर वितरणात ४५ टक्के वीज वाया जाते. देशाला विकासावर  मार्गावर नेण्यासाठी सर्वांंंनी संघटित व्हावे.गडकरी म्हणाले की, सर्वांंंना न्याय द्या, सर्व धर्मांंंचा आदर करा, अशी शिकवण शिवाजी महाराजांनी दिली. गौतम बुद्धांनी अहिंसा व शांतीचा मार्ग  सांगितला. जातीवाद, धर्मवाद दूर होऊन भारतीय संस्कृतीचे जतन करा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते. गरिबी आणि बेरोजगारी दूर  होईल तेव्हाच भारताचा विकास होईल. संचालन अशोक मेंढे यांनी केले. सुदर्शन गोस्वामी यांनी लहिरी गुरूजी यांचा परिचय करून दिला. यावेळी दीपक बजाज, प्रा. विजय केवलरमानी,  सुभाष पारधी, डी.डी. उके, राजन वाघमारे, अँड. कैलास वाघमारे, डॉ. अनिल बघेल, श्रीकांत बोरकर, राजेश हाडके, हितेश उके, सुरेश थूल,  आकाश पाटील, प्रदीप बनसोड, छन्ना मेश्राम, योगेंद्र गजभिये, दीपक बावनगडे, प्रशांत दहीवले, संघपाल उपरे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.  (प्रतिनिधी)