शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवा!

By admin | Updated: June 9, 2014 01:21 IST

शोषित व्यक्ती आणि समाजाला सशक्त व सार्मथ्यवान बनविण्यासाठी सर्वांंनी आपली शक्ती झोकून द्यावी. राष्ट्रसाधनेसाठी गरीब आणि दलितांना सशक्त बनवा, शिवाय कुणाच्या भरोशावर न राहता

राष्ट्रऋषी लहिरी गुरुजी यांचे प्रतिपादन : शिवराज्याभिषेकदिन कार्यक्रमनागपूर : शोषित व्यक्ती आणि समाजाला सशक्त व सार्मथ्यवान बनविण्यासाठी सर्वांंनी आपली शक्ती झोकून द्यावी. राष्ट्रसाधनेसाठी गरीब आणि  दलितांना सशक्त बनवा, शिवाय कुणाच्या भरोशावर न राहता भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे आवाहन राष्ट्रऋषी लहिरी गुरुजी यांनी येथे  केले. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने ‘सुराज मे भागीदारी’ या विषयावर जरीपटका येथील महात्मा गांधी सेन्टेनियल सिंधू हायस्कूलमध्ये रविवारी  विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, व्ही.के. सिंग तर प्रमुख अतिथी म्हणून अनिल सोले आणि  उद्योजिका पद्मश्री कमला सरोज मंचावर होते. ऋषी संस्कृतीचे जतन करालहिरी गुरुजी यांनी सांगितले की, माणसाला नराचा नारायण बनविणारी भारतीय संस्कृती आहे. या महान साधनेशी जुळून शिवाजी महाराज आणि  भगवान बुद्ध बना. भगवान श्रीरामने तब्बल १४ वर्षे पदयात्रा करून भारतातून जातीवाद आणि शोषणाची मानसिकता मिटविण्यासाठी भारतभर पदयात्रा  केली आणि दलितांमध्ये राहून त्यांचा विकास केला. प्रांतवाद, जातीवाद आणि पंथाच्या आधारावर राज्य सुरक्षित राहणार नाही. प्रभू श्रीराम आणि  भगवान गौतम बुद्धाचे जीवनचरित्र सांगताना ते म्हणाले की, ऋषी संस्कृतीचे जतन होईल तरच माझे राज्य सुरक्षित राहील, असे त्यांचे विचार होते.  त्यांनी मनात आणले असते तर ते राजा बनून जीवन जगू शकले असते. पण त्यांनी शोषितांची सेवा केली. ऋषी संस्कृती ही शिवाजी महाराज, संत  तुकाराम महाराज व रामदास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात आली. आपण जन्मापासूनच ‘मी’पणाच्या अहंकारात गुरफटतो आणि  जीवनाचे नुकसान करून बसतो. प्रत्येकजण जन्माने एकसमान असतात. काहीजण दैनंदिन जीवन जगतो तर काही आपले जीवन देशसेवेसाठी वाहून  नेतो. महान लोकांच्या जीवनचरित्राचा अवलंब करा, असा संदेश त्यांनी दिला. व्ही.के. सिंग यांनी सांगितले की, स्वराज्य, परिवर्तन आणि विकासाच्या गोष्टीसाठी सर्वांंंनी एकत्रित यावे. नारे देऊन देश चालत नाही, लोकलढय़ात  सर्वांंचा सहभाग असावा. देशात संशोधने असतानाही दरवर्षी ४0 टक्के धान्य नष्ट होते तर वितरणात ४५ टक्के वीज वाया जाते. देशाला विकासावर  मार्गावर नेण्यासाठी सर्वांंंनी संघटित व्हावे.गडकरी म्हणाले की, सर्वांंंना न्याय द्या, सर्व धर्मांंंचा आदर करा, अशी शिकवण शिवाजी महाराजांनी दिली. गौतम बुद्धांनी अहिंसा व शांतीचा मार्ग  सांगितला. जातीवाद, धर्मवाद दूर होऊन भारतीय संस्कृतीचे जतन करा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते. गरिबी आणि बेरोजगारी दूर  होईल तेव्हाच भारताचा विकास होईल. संचालन अशोक मेंढे यांनी केले. सुदर्शन गोस्वामी यांनी लहिरी गुरूजी यांचा परिचय करून दिला. यावेळी दीपक बजाज, प्रा. विजय केवलरमानी,  सुभाष पारधी, डी.डी. उके, राजन वाघमारे, अँड. कैलास वाघमारे, डॉ. अनिल बघेल, श्रीकांत बोरकर, राजेश हाडके, हितेश उके, सुरेश थूल,  आकाश पाटील, प्रदीप बनसोड, छन्ना मेश्राम, योगेंद्र गजभिये, दीपक बावनगडे, प्रशांत दहीवले, संघपाल उपरे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.  (प्रतिनिधी)