शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

मेक इन इंडियाचं 'Joke In India' झालं; मुख्यमंत्री KCR यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 18:54 IST

जर मोदी सरकारनं LIC खासगीकरण केले तर आम्ही पुन्हा सरकारी करू असंही मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितले. 

नांदेड - देशाची आर्थिक नीती बदलली नाही तर मनमानीच सुरू राहील. मेक इन इंडियाचं जोक इन इंडिया झालं. किती रोजगार तयार झाले? किती परदेशी गुंतवणूक आली? आजच्या काळात अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडतायेत मग त्या भारतात का येत नाही? मेक इन इंडिया यशस्वी असेल तर त्या कंपन्या भारतात का येत नाही? अनेक कंपन्यांना देशात यायचंय पण त्यांना येऊ दिले जात नाही. कंपन्यांना सुविधा दिल्यात का? मित्रांसाठी काम केले जातेय असा आरोप करत मुख्यमंत्री केसीआर यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. 

मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, वेळ परिवर्तनाची आहे. देशाच्या राजकीय क्षेत्रात बदल झाला पाहिजे. शेतकरी आत्महत्या करतायेत. देशात सर्वात जास्त यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पाण्याचे धोरण १०० टक्के बदलले पाहिजे. देशात परिवर्तन व्हायला हवं. आपल्याला मुलभूत सुविधा देता येत नाही. प्रत्येक क्षेत्रात आपण मागे आहोत. धर्म जातीच्या नावावर विभाजन केले जातेय. लोकांसमोर वास्तव येत नाही. जनतेसमोर हे सत्य यायला हवं. लोकशाहीचे ४ स्तंभात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. भारत राष्ट्र समिती हा पक्ष नाही तर मिशन आहे. देशाच्या विकासासाठी परिवर्तन घडवण्याचं मिशन आहे. जोपर्यंत सत्ता मिळत नाही तोवर हे शक्य नाही असं त्यांनी सांगितले. 

महिलांना शासक बनवूआपल्या देशात ५० टक्के महिला आहे. देशातील प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग झाला तर देश प्रगतीच्या मार्गावर जाईल. देशाला पुढे जायचे असेल तर महिला सबळीकरण गरजेचे आहे. जर देशात आमचे सरकार आले तर प्रत्येक क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्व दिले जाईल. महिलांना शासक बनवले जाईल असं आश्वासन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांनी दिले आहे. तसेच देशातील प्रत्येक विधानसभा, लोकसभा, संसदेत १ वर्षात ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवला जाईल. भारतातील प्रत्येक महिलेला मी हे वचन देतो. बेटी पढाओ, बेटी बचाओ नारा खूप दिला. परंतु वास्तविक मुली, महिलांसोबत काय घडतेय हे पाहून शरमेने मान खाली जाते. राजकीय इच्छाशक्ती असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे. हे आम्ही पाहिलंय असं त्यांनी सांगितले. 

LIC चं खासगीकरण होऊ देणार नाहीदेशातील सर्वात मोठी कंपनी विमा कंपनी आहे. मग LIC का विकत आहे? अदानीचे शेअर्स पडतायेत त्यावर संयुक्त चौकशी समिती नेमा. इतका मोठा घोटाळा झाला. आठवडाभरात १० लाख कोटी बुडतायेत. यात देशाची बँकिंग व्यवस्था, LIC सहभागी आहे. हा जनतेचा पैसा आहे. देश तुम्हाला दोषी ठरवतेय तुम्ही चौकशी करा. अदानी तुमचे मित्र आहे. जगात नंबर २ श्रीमंत यादीत अदानी पोहचले कसे? LIC कर्मचारी, एजेंट आणि २५ कोटी खातेदारांना आम्ही आश्वासन देतो जर मोदी सरकारनं LIC खासगीकरण केले तर आम्ही पुन्हा सरकारी करू असंही मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितले. 

त्याचसोबत आज देशात धंदा सुरू आहे. खासगीकरण सुरू आहे. जिथे नुकसान होते तिथं जनतेवर जबाबदारी ढकलायची. ज्यात नफा मिळतो त्या कंपन्या खासगी केल्या जातात. आपल्या देशाला वीज पुरवठा करण्यासाठी कुणाच्याही मदतीची गरज नाही. २४ तास लोकांना वीज देणे शक्य आहे. कोळसा खाणी इतक्या देशात आहेत. ३६१ बिलियन्स टन कोळसा खाणीत आहे. १२५ वर्ष देशाला पूर्ण वीज देण्यास सरकार समर्थ आहे. खासगीकरण का करतात? लाखो कर्मचारी आहेत मग सरकार वीज का देत नाही. सर्व कारभार खासगी केला तर जनतेची लूट होईल. पवनहंस ही कंपनी सरकारी होती ती कमी दरात विकली गेली. अनेक कंपन्या कमी दरात विकल्या जात आहेत. बँकिंग व्यवस्था धोक्यात येतेय. मनमानीप्रमाणे खासगीकरण केले जाते हे आम्ही खपवून घेणार नाही असंही केसीआर यांनी म्हटलं. 

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावNarendra Modiनरेंद्र मोदीMake In Indiaमेक इन इंडिया