शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

इथेनॉलनिर्मिती करा, जादा साखर विका; साखर कारखान्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 00:25 IST

साखरेचा साठा कमी करण्यासाठी केंद्राचे पाऊल

- चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : बी हेवी मोलॅसिसपासून किंवा उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती करा आणि जादा साखर विका, असा आदेश केंद्राने साखर कारखान्यांना दिला आहे. देशातील साखरेचा साठा कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहेत. आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या साखर हंगामासाठी हा आदेश लागू होणार आहे.गरज २६० लाख टनांची असताना देशात चालू साखर हंगामात ३२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले. यामुळे नव्या हंगामाच्या सुरुवातीला सुमारे १०० लाख टन साखर शिल्लक राहणार आहे. शिवाय नव्या हंगामात ३५० लाख टन साखर उत्पादित होईल, असा अंदाज आहे. यामुळे नव्या हंगामातही शिल्लक साखरेचा प्रश्न भेडसावणार आहे. यामुळे सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून इथेनॉलचे दर १० ते २५ टक्क्यांनी वाढविले आहेत. सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाºया इथेनॉलला प्रतिलिटर ४३ रुपये ४६ पैसे, बी हेवीपासूनच्या इथेनॉलला ५२ रुपये ४३ पैसे, तर उसाच्या रसापासून थेट तयार होणाºया इथेनॉलला ५९ रुपये १३ पैसे असे दर निश्चित केले आहेत. या धोरणाचाच पुढचा भाग म्हणून बी हेवीपासून तसेच उसापासून थेट इथेनॉल निर्मिती केल्यास जेवढा ऊस इथेनॉल निर्मितीकडे वळविला जाईल आणि त्यापासून जेवढी साखर निर्मिती झाली असेल तेवढी साखर खुल्या बाजारात विक्रीला कारखान्याला परवानगी देण्यात आली आहे.असे असेल प्रमाणएक टन साखर निर्मिती म्हणजेच ६०० लिटर इथेनॉल असे प्रमाण केंद्र सरकारने निश्चित केले आहे. म्हणजेच १० टक्के उतारा गृहीत धरला तर प्रतिक्विंटल ६० किलो साखर विकता येऊ शकेल. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कोट्याव्यतिरिक्त खुल्या बाजारात विकता येणारी ही जादा साखर असणार आहे.शिल्लक साखरेचा साठा कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा हा चांगला निर्णय आहे. देशाची जेवढी गरज आहे तेवढीच साखर निर्मिती करून उर्वरित ऊस इथेनॉल निर्मितीकडे वळविण्याचा भविष्यात हा कायमस्वरुपी पर्याय ठरु शकतो. - विजय औताडे, साखर उद्योगातील तज्ञ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने