शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मविआच्या विजयात अल्पसंख्याकांचा मोठा वाटा, त्यांच्या हितासाठी सर्वकाही करू - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 16:27 IST

येत्या विधानसभेत मुस्लिमांना चांगली संधी देऊ. वक्फ सुधारणा विधेयक आणून अल्पसंख्याकांचे जे अधिकार आहेत ते संपवण्याचा प्रयत्न आहे. असं शरद पवारांनी सांगितले. 

मुंबई - महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्रित निवडणूक लढवली. मागील निवडणुकीत काँग्रेसला १ आणि आम्हाला ४ जागा मिळाल्या. परंतु यंदाच्या निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली. निकालात महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या. या विजयात अल्पसंख्याकांचा मोठा वाटा होता. अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी जे जे आवश्यक ते मी आणि माझे सहकारी करतील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. 

शरद पवार म्हणाले की, मी ५६ वर्षाहून अधिक काळ देशाच्या संसदेत आणि इथं विधानसभेचं राजकारण पाहतोय. परंतु ही पहिलीच निवडणूक मी बघितली. जिथं महाराष्ट्रातील प्रत्येक गावांत जिथं अल्पसंख्याकांची संख्या जास्त आहे. मुस्लिमांची संख्या अधिक आहे, ख्रिश्चन समाज जास्त आहे या सर्व लोकांनी कुणी हात जोडून मतदानासाठी चला, असं म्हणण्याची प्रतिक्षा न करता मतदानासाठी पुढे आले. आम्ही सकाळी मतदानाच्या रांगा पाहिल्या त्यात ९० टक्क्याहून अधिक अल्पसंख्याक होते. ना कुणाला पैसे दिले, ना कुणाला वाहन व्यवस्था केली परंतु देशाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आणि ४०० पार बोलणाऱ्यांना दूर करण्याचं काम चांगल्याप्रकारे केले असं त्यांनी सांगितले.

तसेच महाराष्ट्रात आज लोकांना भाईचारा हवा. रामगिरी महाराज अजीब महाराज आहे. कुणी महाराज केले माहिती नाही. महाराज असते तर लोकांमध्ये एकोपा राहण्याची जबाबदारी असते. प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे. परंतु ते जे काही बोलले ते कोणाला पसंत पडले नाही. समाजात कुणीही असं विधान करेल ते आम्ही खपवून घेणार नाही. त्याविरोधात कठोर शासन करण्याची आवश्यकता आहे. आमचे जे वकील आहेत ते या प्रकरणावर लक्ष ठेवतील ज्यांनी हे चुकीचे काम केले त्यांना योग्य दाखवण्याचं काम होईल अशा सूचना शरद पवारांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिल्या. 

दरम्यान, सर्व राजकीय पक्षांनी समाजातील सर्व वर्गासाठी धोरण बनवलं पाहिजे. राजकीय पक्षांनी विधानसभा असो वा इतर निवडणूक सर्व ठिकाणी मुसलमान अल्पसंख्याकांना पूर्ण आरक्षण द्यायला हवं. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याकांना चांगली संधी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आज देशात जी गरिबीची समस्या आहे त्यात सर्वात जास्त मुस्लीम आहेत. या वर्गाला गरिबीतून मुक्त कसं करता येईल याकडे लक्ष द्यायला हवं असंही शरद पवारांनी सांगितलं. 

वक्फ सुधारणा विधेयकावरून इशारा

वक्फ सुधारणा विधेयक आणून अल्पसंख्याकांचे जे अधिकार आहेत ते संपवण्याचा प्रयत्न आहे. आमच्या सर्व खासदारांनी याविरोधात आवाज उचलला. सुप्रिया सुळेंनी याचा विरोध करत विधेयक जेपीसीकडे पाठवण्याची मागणी केली. वक्फच्या संपत्तीचा अधिकार कुणाला? कुणाला शाळा काढायची असेल, जी गरज आहे ती पूर्ण करण्याचा अधिकार वक्फला आहे. ही संपत्ती त्यांची आहे. त्याचे हित करण्याचा अधिकार त्यांच्याकडेच असायला हवा हे आमचे धोरण आहे. आमचे लोक कमी असले तरी जे जे काही गरज असेल ते अल्पसंख्याकांच्या हितासाठी आम्ही करू असंही शरद पवारांनी आश्वासन दिले.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMuslimमुस्लीमMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४