शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू

By मुरलीधर भवार | Updated: May 7, 2025 00:24 IST

Kalyan Accident News: कल्याण पूर्व येथील चिंचपाडा परिसरात अय्यप्पा मंदिरासमोर रस्त्यावरून जात असलेल्या रिक्षावर भले मोठे झाड कोसळले. ही घटना रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास घडली.  रिक्षातून  प्रवास करणारे दोन प्रवासी आणि  रिक्षा चालक अशा तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

- मुरलीधर भवार कल्याण - आज रात्री नऊ वाजताच्या सुमारास कल्याणमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. यावेळी कल्याण पूर्व येथील चिंचपाडा परिसरात अय्यप्पा मंदिरासमोर रस्त्यावरून जात असलेल्या रिक्षावर भले मोठे झाड कोसळले. ही घटना रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास घडली.  रिक्षातून  प्रवास करणारे दोन प्रवासी आणि  रिक्षा चालक अशा तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

वादळी वाऱ्यासह पावसामुळे कल्याण परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. ही घटना घडतात महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. वीज पुरवठा खंडित असल्याने अग्निशमन दलाला रिक्षावर पडलेले झाड दूर करण्यात अडथळे येत होते. इलेक्ट्रॉनिक पर्वतीच्या साह्याने रिक्षावर पडलेले झाड कापून दूर करण्यात आले. रिक्षात अडकलेल्या तीन जणांना बाहेर काढून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तिघेही मृत असल्याचे घोषित केले. दोन पुरुष आणि एक महिला मृत्युमुखी पडली आहे. 

घटनेची माहिती मिळताच मदत कार्यासाठी शिंदे सेनेचे शहर प्रमुख निलेश शिंदे, पदाधिकारी प्रशांत काळे, माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य पाहता घटनास्थळी केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त प्रसाद बोरकर, सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी घटनास्थळी घेऊन पाहणी केली. रिक्षावर पडलेले झाड हटवण्यासाठी स्क्रीन किंवा जेसीबी तातडीने उपलब्ध झाला नाही, अशी तक्रार स्थानिकांनी यावेळी केली.

टॅग्स :Accidentअपघातkalyanकल्याण