शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

राज्यातील प्रमुख ५६ धरणांनी गाठला तळ; गतवर्षीपेक्षा ७ टक्के कमी पाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 09:49 IST

राज्यात नागपूर विभागातील १६ मुख्य धरणांपैकी केवळ दोन धरणांची पातळी खालावली आहे. उ

- बाळासाहेब बोचरेमुंबई : यंदा पाऊस कमी पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असतानाच, बिपोरजॉय वादळामुळे मान्सूनही लांबला असून, अजून उन्हाच्या झळा सुरूच आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा लक्षणीय घटला असून, गतवर्षाच्या तुलनेत तो सात टक्क्यांनी कमी आहे. 

राज्यात नागपूर विभागातील १६ मुख्य धरणांपैकी केवळ दोन धरणांची पातळी खालावली आहे. उर्वरित १२३ प्रमुख धरणांपैकी ५४ धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे. विशेषत: पुणे आणि कोकण विभागातील धरणांनी तळ गाठला आहे. राज्यातील प्रमुख १३९ धरणांतील साठा गतवर्षी सरासरी ३०.७२ टक्के होता, तो आजच्या घडीला सरासरी २३.७४ टक्के झाला आहे.  

या पार्श्वभूमीवर राज्यातील मध्यम प्रकल्पाचे मात्र आशादायी चित्र असून, एकूण २६० प्रकल्पांमध्ये सरासरी ३०.७२ टक्के साठा असून, तो गतवर्षीच्या तुलनेत सरासरी चार टक्के अधिक आहे. राज्यातील  लघुप्रकल्पामध्येही आशादायी चित्र आहे. एकूण २,५९० लघुप्रकल्पामध्ये सरासरी १६.९७ टक्के साठा असून, तो गतवर्षी  १३.४३ टक्के होता. 

पाण्यासाठी दाही दिशाराज्यात पाणीटंचाईच्या अतिशय तीव्र झळा महाराष्ट्रातील जनतेला भोगाव्या लागत आहेत. राज्यात २,७५४ गावे व वाड्यांना टंचाईचा सामना करावा लागत असून ५२३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

१३९ धरणांमधील पाणीसाठा

विभाग    धरणे    पाणीसाठा    गतवर्षीअमरावती    १०    ३९.८३%    ४०.८०%औरंगाबाद    ४४    ३३.५९%    ३६.८९%कोकण    ११    २७.५९%    ३५.५९%नागपूर    १६    ४०.९२%    ३०.६७%नाशिक    २३    २७.६५%    २७.०७%पुणे    ३५    १०.४२%    १३.३१%एकूण    १३९    २३.७४%    ३०.७२%

टॅग्स :Damधरण