शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

राज्यातील प्रमुख ५६ धरणांनी गाठला तळ; गतवर्षीपेक्षा ७ टक्के कमी पाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 09:49 IST

राज्यात नागपूर विभागातील १६ मुख्य धरणांपैकी केवळ दोन धरणांची पातळी खालावली आहे. उ

- बाळासाहेब बोचरेमुंबई : यंदा पाऊस कमी पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असतानाच, बिपोरजॉय वादळामुळे मान्सूनही लांबला असून, अजून उन्हाच्या झळा सुरूच आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा लक्षणीय घटला असून, गतवर्षाच्या तुलनेत तो सात टक्क्यांनी कमी आहे. 

राज्यात नागपूर विभागातील १६ मुख्य धरणांपैकी केवळ दोन धरणांची पातळी खालावली आहे. उर्वरित १२३ प्रमुख धरणांपैकी ५४ धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे. विशेषत: पुणे आणि कोकण विभागातील धरणांनी तळ गाठला आहे. राज्यातील प्रमुख १३९ धरणांतील साठा गतवर्षी सरासरी ३०.७२ टक्के होता, तो आजच्या घडीला सरासरी २३.७४ टक्के झाला आहे.  

या पार्श्वभूमीवर राज्यातील मध्यम प्रकल्पाचे मात्र आशादायी चित्र असून, एकूण २६० प्रकल्पांमध्ये सरासरी ३०.७२ टक्के साठा असून, तो गतवर्षीच्या तुलनेत सरासरी चार टक्के अधिक आहे. राज्यातील  लघुप्रकल्पामध्येही आशादायी चित्र आहे. एकूण २,५९० लघुप्रकल्पामध्ये सरासरी १६.९७ टक्के साठा असून, तो गतवर्षी  १३.४३ टक्के होता. 

पाण्यासाठी दाही दिशाराज्यात पाणीटंचाईच्या अतिशय तीव्र झळा महाराष्ट्रातील जनतेला भोगाव्या लागत आहेत. राज्यात २,७५४ गावे व वाड्यांना टंचाईचा सामना करावा लागत असून ५२३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

१३९ धरणांमधील पाणीसाठा

विभाग    धरणे    पाणीसाठा    गतवर्षीअमरावती    १०    ३९.८३%    ४०.८०%औरंगाबाद    ४४    ३३.५९%    ३६.८९%कोकण    ११    २७.५९%    ३५.५९%नागपूर    १६    ४०.९२%    ३०.६७%नाशिक    २३    २७.६५%    २७.०७%पुणे    ३५    १०.४२%    १३.३१%एकूण    १३९    २३.७४%    ३०.७२%

टॅग्स :Damधरण