शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

निष्ठावंत अन् आयारामांच्या 'मॅनेजमेंट'च भाजपसमोर मुख्य आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 15:46 IST

राज्याला लुटणाऱ्या २५० घराण्यांना सोडणार नाही, असा गर्भित इशारा पाटील यांनी दिला. या २५० घराण्यात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांचा सहभाग आहे. पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे कारवाई झाल्यास, आयारामांसाठी ही बाब त्रासदायक ठरू शकते.

मुंबई - भारतीय जनता पक्षाचा झंझावात आणि विरोधकांची झालेली वाताहत यामुळे अनेकांना विधानसभेत निवडून येण्याची भ्रांत आहे. तर ज्यांना निवडून येण्याची खात्री आहे, त्यांना मंत्रीपदाची ओढ असून काहींना निर्माण केलेले साम्राज्या टिकून ठेवायचे आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांचा पक्षांतरावर जोर वाढला आहे. अनेक वर्षे विशिष्ट विचारांसाठी लढा देणारे नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. मात्र पक्षांतर करणाऱ्या सर्वच नेत्यांना दिलेला शब्द पाळणे सत्ताधाऱ्यांसाठी तितकेसे सोपे नाही. यातून अनेक जण डावलले जाण्याची शक्यता आहे. केवळ सत्तेच्या हव्यासापोटी पक्ष बदलणाऱ्यांना डावलल्यामुळे राजकारणाचे एकप्रकारे शुद्धीकरणच होणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात विविष्ट घरण्यांनी अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व गाजवले. ही घराणे बोटावर मोजण्याइतरप असली तरी याच घरण्यांकडे सत्तेच्या चाव्या अनेक दिवस होत्या. त्यामुळे शिक्षणसंस्था, कारखाने, सुतगिरण्या अशा संस्था उभारून या घराण्यांनी अमाप पैसा कमवला. तर अनेकांनी कोट्यावधी रुपयांचे कर्ज करून ठेवले. परंतु, सत्ता गेल्यापासून या नेत्यांच्या साम्राज्याला धक्के बसण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नेत्यांनी पक्षांतराची युक्ती काढली असून तूर्तास तरी त्यांच्यावरचे संकट टळल्याचे दिसत आहे.

पक्षांतर करणाऱ्या अनेक नेत्यांनी उमेदवारी मिळो वा ना मिळो, आमच्या साम्राज्याला धक्का लागायला नको, या अटीवर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विचारधारेचा मुद्दा येथे गौण ठरतो. तर काही शक्तीशाली नेत्यांनी प्रवेशासोबतच मंत्रीपदंही मिळवले. परंतु, हे मंत्रीपद त्यांच्यामुळे नव्हे तर संबधीत पक्षांला त्या-त्या जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्यासाठी देण्यात आली. परंतु, त्याचवेळी भाजपला पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना देखील सांभाळावे लागणार आहे. विरोधकांपेक्षा हेच भाजपसमोरचे मुख्य आव्हान दिसत आहे.

दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षांतर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांची ही भूमिका पक्षांतर करून सुरक्षित राहण्याच्या तयारीत असलेल्या नेत्यांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. राज्याला लुटणाऱ्या २५० घराण्यांना सोडणार नाही, असा गर्भित इशारा पाटील यांनी दिला. या २५० घराण्यात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांचा सहभाग आहे. पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे कारवाई झाल्यास, आयारामांसाठी ही बाब त्रासदायक ठरू शकते. यातून राजकारणाचे शुद्धीकरण होणार हे मात्र नक्की.