शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

निष्ठावंत अन् आयारामांच्या 'मॅनेजमेंट'च भाजपसमोर मुख्य आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 15:46 IST

राज्याला लुटणाऱ्या २५० घराण्यांना सोडणार नाही, असा गर्भित इशारा पाटील यांनी दिला. या २५० घराण्यात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांचा सहभाग आहे. पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे कारवाई झाल्यास, आयारामांसाठी ही बाब त्रासदायक ठरू शकते.

मुंबई - भारतीय जनता पक्षाचा झंझावात आणि विरोधकांची झालेली वाताहत यामुळे अनेकांना विधानसभेत निवडून येण्याची भ्रांत आहे. तर ज्यांना निवडून येण्याची खात्री आहे, त्यांना मंत्रीपदाची ओढ असून काहींना निर्माण केलेले साम्राज्या टिकून ठेवायचे आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांचा पक्षांतरावर जोर वाढला आहे. अनेक वर्षे विशिष्ट विचारांसाठी लढा देणारे नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. मात्र पक्षांतर करणाऱ्या सर्वच नेत्यांना दिलेला शब्द पाळणे सत्ताधाऱ्यांसाठी तितकेसे सोपे नाही. यातून अनेक जण डावलले जाण्याची शक्यता आहे. केवळ सत्तेच्या हव्यासापोटी पक्ष बदलणाऱ्यांना डावलल्यामुळे राजकारणाचे एकप्रकारे शुद्धीकरणच होणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात विविष्ट घरण्यांनी अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व गाजवले. ही घराणे बोटावर मोजण्याइतरप असली तरी याच घरण्यांकडे सत्तेच्या चाव्या अनेक दिवस होत्या. त्यामुळे शिक्षणसंस्था, कारखाने, सुतगिरण्या अशा संस्था उभारून या घराण्यांनी अमाप पैसा कमवला. तर अनेकांनी कोट्यावधी रुपयांचे कर्ज करून ठेवले. परंतु, सत्ता गेल्यापासून या नेत्यांच्या साम्राज्याला धक्के बसण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नेत्यांनी पक्षांतराची युक्ती काढली असून तूर्तास तरी त्यांच्यावरचे संकट टळल्याचे दिसत आहे.

पक्षांतर करणाऱ्या अनेक नेत्यांनी उमेदवारी मिळो वा ना मिळो, आमच्या साम्राज्याला धक्का लागायला नको, या अटीवर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विचारधारेचा मुद्दा येथे गौण ठरतो. तर काही शक्तीशाली नेत्यांनी प्रवेशासोबतच मंत्रीपदंही मिळवले. परंतु, हे मंत्रीपद त्यांच्यामुळे नव्हे तर संबधीत पक्षांला त्या-त्या जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्यासाठी देण्यात आली. परंतु, त्याचवेळी भाजपला पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना देखील सांभाळावे लागणार आहे. विरोधकांपेक्षा हेच भाजपसमोरचे मुख्य आव्हान दिसत आहे.

दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षांतर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांची ही भूमिका पक्षांतर करून सुरक्षित राहण्याच्या तयारीत असलेल्या नेत्यांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. राज्याला लुटणाऱ्या २५० घराण्यांना सोडणार नाही, असा गर्भित इशारा पाटील यांनी दिला. या २५० घराण्यात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांचा सहभाग आहे. पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे कारवाई झाल्यास, आयारामांसाठी ही बाब त्रासदायक ठरू शकते. यातून राजकारणाचे शुद्धीकरण होणार हे मात्र नक्की.