शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठावंत अन् आयारामांच्या 'मॅनेजमेंट'च भाजपसमोर मुख्य आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 15:46 IST

राज्याला लुटणाऱ्या २५० घराण्यांना सोडणार नाही, असा गर्भित इशारा पाटील यांनी दिला. या २५० घराण्यात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांचा सहभाग आहे. पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे कारवाई झाल्यास, आयारामांसाठी ही बाब त्रासदायक ठरू शकते.

मुंबई - भारतीय जनता पक्षाचा झंझावात आणि विरोधकांची झालेली वाताहत यामुळे अनेकांना विधानसभेत निवडून येण्याची भ्रांत आहे. तर ज्यांना निवडून येण्याची खात्री आहे, त्यांना मंत्रीपदाची ओढ असून काहींना निर्माण केलेले साम्राज्या टिकून ठेवायचे आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांचा पक्षांतरावर जोर वाढला आहे. अनेक वर्षे विशिष्ट विचारांसाठी लढा देणारे नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. मात्र पक्षांतर करणाऱ्या सर्वच नेत्यांना दिलेला शब्द पाळणे सत्ताधाऱ्यांसाठी तितकेसे सोपे नाही. यातून अनेक जण डावलले जाण्याची शक्यता आहे. केवळ सत्तेच्या हव्यासापोटी पक्ष बदलणाऱ्यांना डावलल्यामुळे राजकारणाचे एकप्रकारे शुद्धीकरणच होणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात विविष्ट घरण्यांनी अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व गाजवले. ही घराणे बोटावर मोजण्याइतरप असली तरी याच घरण्यांकडे सत्तेच्या चाव्या अनेक दिवस होत्या. त्यामुळे शिक्षणसंस्था, कारखाने, सुतगिरण्या अशा संस्था उभारून या घराण्यांनी अमाप पैसा कमवला. तर अनेकांनी कोट्यावधी रुपयांचे कर्ज करून ठेवले. परंतु, सत्ता गेल्यापासून या नेत्यांच्या साम्राज्याला धक्के बसण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नेत्यांनी पक्षांतराची युक्ती काढली असून तूर्तास तरी त्यांच्यावरचे संकट टळल्याचे दिसत आहे.

पक्षांतर करणाऱ्या अनेक नेत्यांनी उमेदवारी मिळो वा ना मिळो, आमच्या साम्राज्याला धक्का लागायला नको, या अटीवर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विचारधारेचा मुद्दा येथे गौण ठरतो. तर काही शक्तीशाली नेत्यांनी प्रवेशासोबतच मंत्रीपदंही मिळवले. परंतु, हे मंत्रीपद त्यांच्यामुळे नव्हे तर संबधीत पक्षांला त्या-त्या जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्यासाठी देण्यात आली. परंतु, त्याचवेळी भाजपला पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना देखील सांभाळावे लागणार आहे. विरोधकांपेक्षा हेच भाजपसमोरचे मुख्य आव्हान दिसत आहे.

दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षांतर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांची ही भूमिका पक्षांतर करून सुरक्षित राहण्याच्या तयारीत असलेल्या नेत्यांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. राज्याला लुटणाऱ्या २५० घराण्यांना सोडणार नाही, असा गर्भित इशारा पाटील यांनी दिला. या २५० घराण्यात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांचा सहभाग आहे. पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे कारवाई झाल्यास, आयारामांसाठी ही बाब त्रासदायक ठरू शकते. यातून राजकारणाचे शुद्धीकरण होणार हे मात्र नक्की.