शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश, विरोधकांना टोला लगावत मुख्यमंत्री म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 16:58 IST

Gram Panchayat Election Result: आज राज्यातील २३०० हून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या लागलेल्या निकालामध्ये सत्ताधारी महायुतीने दणदणीत यश मिळवले आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले.

आज राज्यातील २३०० हून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या लागलेल्या निकालामध्ये सत्ताधारी महायुतीने दणदणीत यश मिळवले आहे. या निवडणुकीत भाजपा पहिल्या, अजितदादा गट दुसऱ्या तर शिवसेना शिंदे गट तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. तिन्ही पक्षांनी मिळून १२७७ हून अधिक ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले असून, ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदारांनी महायुतीला मोठ्या प्रमाणावर कौल दिलेला आहे. त्यासाठी मी मतदारांना मनापासून धन्यवाद देतो. महायुती सरकारने गेल्या वर्षभरामध्ये जे काम केलं आहे. तसेच आधीच्या काळात थांबवलेल्या कामांना चालना देण्याचं काम आम्ही केलं आहे. या राज्याचा सर्वांगिण विकास करण्याचं धोरण आम्ही आखलं आहे. राज्यातील सर्वसामान्य माणूस, शेतकरी, उद्योजक, महिला या सर्वांना न्याय देण्याचं काम आम्ही केलं आहे आणि खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी पोहोचलं आहे. आता मतदारांनी मतांमधून आमच्यावरील प्रेम व्यक्त केलं आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीपेक्षा कितीतरी अधिक पटीनं सरपंच आणि सदस्य हे महायुतीचे निवडून आले आहेत. त्यामुळे मी सर्वांना धन्यवाद देतो. तसेच मी मुख्यमंत्री म्हणून तसेच सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि मंत्री सर्वजण मिळून राज्यात लोकाभिमुख आणि जनतेला न्याय देण्याचं काम करत राहू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आजच्या निकालांमधून सर्व समाजाने आम्हाला पाठबळ दिलंय, आशिर्वाद दिला आहे, हे दिसून आलं आहे. घरी बसून राज्य चालवता येत नाही, हे लोकांनी दाखवून दिलं, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला. तसेच आम्ही कामाचा वेग वाढवलाय. आमची अशीच  घोडदौड सुरु राहील. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत महायुतीचं यश कायम राहील. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत ४५ हून अधिक जागा राज्यातून आम्ही देऊ आणि मोदी साहेबांचे हात बळकट करू, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्र