शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

महावितरणच्या पुनर्रचनेला आचारसंहितेचा फटका ; डेडलाइन पुन्हा हुकण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 01:59 IST

लोकसभा निवडणुकीसाठी लागू झालेली आचारसंहिता, जून महिन्यात येणारा पावसाळा आणि याच कालावधीत विधानसभा निवडणुकीसाठी लागू होणारी आचारसंहिता; अशा तीन प्रमुख घटकांमुळे महावितरणच्या पुनर्रचनेला आता डिसेंबर उजाडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी लागू झालेली आचारसंहिता, जून महिन्यात येणारा पावसाळा आणि याच कालावधीत विधानसभा निवडणुकीसाठी लागू होणारी आचारसंहिता; अशा तीन प्रमुख घटकांमुळे महावितरणच्या पुनर्रचनेला आता डिसेंबर उजाडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.महावितरणच्या पुनर्रचनेसाठी १ जानेवारी, १ फेब्रुवारी, १ मार्च डेडलाइन ठेवण्यात आली होती. मात्र अडचणींमुळे प्रशासनाला ही डेडलाइन पाळता आली नाही. परिणामी, १ एप्रिल ही डेडलाइन ठरविण्यात आली. मात्र आता लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाली आहे. परिणामी, या काळात महावितरण प्रशासन पुनर्रचना लागू करेल की नाही, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. जरी प्रशासनाने पुनर्रचना लागू केली तरी कामगार संघटना, राजकीय हेवेदावे यांचा परिणाम पुनर्रचनेवर होईल. याचा अप्रत्यक्षरीत्या प्रत्येक घटकावर परिणाम होईल. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कालावधीत पुनर्रचना लागू होणार नाही, असा अंदाज वर्तविला जात आहे.लोकसभा निवडणुकीचा निकाल मे महिन्यात लागल्यानंतर जून महिन्यात जरी पुनर्रचना लागू करायची झाली तर हा कालावधी पावसाळ्याचा आहे. आणि पावसाळ्यात सातत्याने विजेचे प्रश्न तोंड आवासून उभे राहतात. परिणामी या काळात पुनर्रचना लागू झाली आणि वीज ग्राहकांना त्रास झाला तर त्याचे खापर प्रशासनावर फुटेल. परिणामी या काळातही पुनर्रचना लागू होणार नाही, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यानंतर काही कालावधीतच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. साहजिकच पुनर्रचना लागू करणे प्रशासनास कठीण होईल, असाही अंदाज वर्तविला जात आहे. परिणामी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच पुनर्रचनेला मुहूर्त मिळेल आणि त्यासाठी डिसेंबर उजाडेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.पहिल्या टप्प्यात प्रायोगिक अंमलबजावणीपहिल्या टप्प्यात पुणे परिमंडळमधील रास्तापेठ व गणेशखिंड मंडळ, भांडुप परिमंडळमधील वाशी व ठाणे मंडळ आणि कल्याण परिमंडळातील कल्याण मंडळमध्ये महावितरणच्या पुनर्रचना आराखड्याची प्रायोगिक अंमलबजावणी होणार आहे.कामगारांनी पुकारलेला संप, केलेला विरोध आणि प्रक्रिया राबविण्यात येत असलेल्या अडचणींमुळे अद्याप पुनर्रचना झालेली नाही...म्हणूनच घेतलापुनर्रचनेचा निर्णयवीजग्राहकांनी तक्रार कोणाकडे करायची, हे समजणार. तक्रारींचे वेळेत निरसन, कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी व्हावा, कामाचे सुनियोजन तसेच सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.प्रशासनाचे म्हणणे काय?-कामगार कपात केली जाणार नाही.-नवीन उपविभाग व शाखा कार्यालयांची निर्मिती होईल.-नवीन कार्यालयांची निर्मिती.-अतिरिक्त कामगारांचे समायोजन होईल.असे होणार परिणाम- पुनर्रचनेनुसार चार उपविभागांऐवजीदोन उपविभाग.- तीन ते चार कामांची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यास एकच काम.- त्याच्यावरील कामाचा ताण कमी होणार.- कामाचा दर्जा सुधारून काम लवकर होण्यास मदत होणार.- ग्राहकांच्या समस्या लवकर सुटणार.

टॅग्स :mahavitaranमहावितरण