शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षांवर खरं उतरण्यात महाविकास आघाडीला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 09:38 IST

Two Years Of Mahavikas Aghadi: दोन वर्षांपूर्वी एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आले. या दोन वर्षांच्या कालावधीत राज्यासमोरील आव्हानांवर मात करण्याचा, जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षांवर खरं उतरण्याचा, जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न सरकारमधील प्रत्येक घटकाने निष्ठापूर्वक, प्रामाणिकपणे केला व त्यात यशही मिळाले. 

अजित पवार(उपमुख्यमंत्री)दोन वर्षांपूर्वी एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आले. या दोन वर्षांच्या कालावधीत राज्यासमोरील आव्हानांवर मात करण्याचा, जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षांवर खरं उतरण्याचा, जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न सरकारमधील प्रत्येक घटकाने निष्ठापूर्वक, प्रामाणिकपणे केला व त्यात यशही मिळाले.

राज्यावरील कोरोना संकट अभूतपूर्व होते. मात्र या काळात आर्थिक अडचण आल्यानंतरही विकासाची प्रक्रिया अखंड, निरंतर सुरू राहिली. विधानसभा, विधान परिषद सदस्यांच्या स्थानिक विकास निधीत दोन वर्षात १ कोटींवरून ४ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली. बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना आणली. शेतकऱ्यांना कृषिपंप वीज जोडणी देण्याकरिता महावितरण कंपनीला दरवर्षी १ हजार ५०० कोटी रुपये  निधी भागभांडवल उपलब्ध करून दिले.

थकीत वीजबिलात शेतकऱ्यांना ३३ टक्के सूट, उर्वरित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा भरणा मार्च २०२२ पर्यंत केल्यास उर्वरित ५० टक्के रकमेची अतिरिक्त माफी, ४४ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना मूळ थकबाकी रकमेच्या ६६ टक्के या प्रमाणात एकूण ३० हजार ४११ कोटी रुपयांची थकबाकी माफ केली. एनडीआरएफच्या निकषांच्या पुढे जाऊन सानुग्रह अनुदान म्हणून प्रतिकुटुंब १० हजार, दुकानदारांसाठी ५० हजार रुपये, टपरी धारकांसाठी १० हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे.

रयतेचं हित सर्वोच्च मानून राज्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची हा विचार प्रमाण मानून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकदिलानं काम करत, सर्व संकटांवर यशस्वी मात करत, या सरकारनं आपलं वेगळेपण सिद्ध करून दाखवलं आहे.  

सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ देण्यासाठी ९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. ‘शिवभोजन थाळी योजना’ लागू केली. कोरोना निर्बंधकाळात दररोज दोन लाख शिवभोजन थाळ्यांचे मोफत वितरण केले. त्यासाठी ७५ कोटी रुपये उपलब्ध करण्यात आले. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे पाच योजनांच्या राज्यातील ३५ लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी  १ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य आगाऊ दिले. त्यासाठी ९६१ कोटी रुपये  थेट बँक खात्यात वर्ग करण्यात आले. अतिवृष्टी, महापुराने नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी यावर्षी १० हजार कोटींचा निधी जाहीर केला आहे. गेल्यावर्षी ११ हजार ५०० कोटींचा निधी मंजूर केला होता. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी