शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षांवर खरं उतरण्यात महाविकास आघाडीला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 09:38 IST

Two Years Of Mahavikas Aghadi: दोन वर्षांपूर्वी एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आले. या दोन वर्षांच्या कालावधीत राज्यासमोरील आव्हानांवर मात करण्याचा, जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षांवर खरं उतरण्याचा, जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न सरकारमधील प्रत्येक घटकाने निष्ठापूर्वक, प्रामाणिकपणे केला व त्यात यशही मिळाले. 

अजित पवार(उपमुख्यमंत्री)दोन वर्षांपूर्वी एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आले. या दोन वर्षांच्या कालावधीत राज्यासमोरील आव्हानांवर मात करण्याचा, जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षांवर खरं उतरण्याचा, जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न सरकारमधील प्रत्येक घटकाने निष्ठापूर्वक, प्रामाणिकपणे केला व त्यात यशही मिळाले.

राज्यावरील कोरोना संकट अभूतपूर्व होते. मात्र या काळात आर्थिक अडचण आल्यानंतरही विकासाची प्रक्रिया अखंड, निरंतर सुरू राहिली. विधानसभा, विधान परिषद सदस्यांच्या स्थानिक विकास निधीत दोन वर्षात १ कोटींवरून ४ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली. बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना आणली. शेतकऱ्यांना कृषिपंप वीज जोडणी देण्याकरिता महावितरण कंपनीला दरवर्षी १ हजार ५०० कोटी रुपये  निधी भागभांडवल उपलब्ध करून दिले.

थकीत वीजबिलात शेतकऱ्यांना ३३ टक्के सूट, उर्वरित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा भरणा मार्च २०२२ पर्यंत केल्यास उर्वरित ५० टक्के रकमेची अतिरिक्त माफी, ४४ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना मूळ थकबाकी रकमेच्या ६६ टक्के या प्रमाणात एकूण ३० हजार ४११ कोटी रुपयांची थकबाकी माफ केली. एनडीआरएफच्या निकषांच्या पुढे जाऊन सानुग्रह अनुदान म्हणून प्रतिकुटुंब १० हजार, दुकानदारांसाठी ५० हजार रुपये, टपरी धारकांसाठी १० हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे.

रयतेचं हित सर्वोच्च मानून राज्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची हा विचार प्रमाण मानून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकदिलानं काम करत, सर्व संकटांवर यशस्वी मात करत, या सरकारनं आपलं वेगळेपण सिद्ध करून दाखवलं आहे.  

सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ देण्यासाठी ९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. ‘शिवभोजन थाळी योजना’ लागू केली. कोरोना निर्बंधकाळात दररोज दोन लाख शिवभोजन थाळ्यांचे मोफत वितरण केले. त्यासाठी ७५ कोटी रुपये उपलब्ध करण्यात आले. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे पाच योजनांच्या राज्यातील ३५ लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी  १ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य आगाऊ दिले. त्यासाठी ९६१ कोटी रुपये  थेट बँक खात्यात वर्ग करण्यात आले. अतिवृष्टी, महापुराने नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी यावर्षी १० हजार कोटींचा निधी जाहीर केला आहे. गेल्यावर्षी ११ हजार ५०० कोटींचा निधी मंजूर केला होता. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी