शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

तीन जागांचा गुंता सुटेना! आघाडीचे घोडे अडलेलेच; चर्चा होणार, पण आता दिल्लीतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 06:54 IST

जागावाटपाबाबत आता दिल्लीतील नेत्यांनी चर्चा करावी, अशी भूमिका राज्यातील काँग्रेस नेत्यांनी घेतली.

मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटपाचे घोडे तीन जागांवरून अडलेलेच आहे. आघाडीतील तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका होऊनही सांगली, दक्षिण मध्य मुंबई आणि भिवंडी या जागांचा तिढा कायम आहे. 

राज्याच्या स्तरावर हा तिढा सुटत नसल्याने आता याबाबत दिल्लीत चर्चा होणार असल्याची माहिती आघाडीतील सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शुक्रवारी राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीतील नेत्यांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली.

या बैठकीत तिढा असलेल्या जागावाटपाबाबत आता दिल्लीतील नेत्यांनी चर्चा करावी, अशी भूमिका राज्यातील काँग्रेस नेत्यांनी घेतली. लोकसभेच्या सांगली मतदारसंघात ठाकरे गटाने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. ‘मविआ’त सांगलीच्या जागेवर काँग्रेसनेही दावा सांगितला आहे. 

सांगलीत मैत्रीपूर्ण लढतसांगलीच्या जागेसाठी काँग्रेस जास्त आग्रही आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनीही हा विषय लावून धरला असून, त्यासाठी एकदा दिल्लीत धडक दिली आहे. जर सांगलीची जागा काँग्रेसला सुटली नाही तर या जागेवर मैत्रीपूर्ण लढत करावी, असा आग्रह काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी धरला असून त्याबाबतचा निर्णय दिल्लीतील नेतेच घेऊ शकतात, असे राज्यातील एका काँग्रेस नेत्याने सांगितले.

आमचा वापर केला जाताेय : प्रकाश आंबेडकरमहाविकास आघाडीत आम्हाला वेगळे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. येत्या दोन एप्रिल रोजी आम्ही सगळे स्पष्ट करणार आहोत, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. कुणी तरी कुणासाठी आम्हाला वापरून घेत असल्याचे दिसते, असेही आंबेडकर म्हणाले.

कोणत्या जागेचा पेच?दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ काँग्रेससाठी अनुकूल असल्याचे सांगत काँग्रेसने या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. तर उद्धव ठाकरेंनी अनिल देसाईंची इथून उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आतापर्यंतच्या आघाडीत भिवंडीची जागा ही काँग्रेसच्या वाट्याला यायची. यावेळी या जागेवर शरद पवार गटानेही दावा केला आहे. तर काँग्रेसही दावा सोडायला तयार नसल्याने जागेचा पेच कायम आहे. 

नाना पटोलेंची गैरहजेरीतीन जागांचा तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते. तर शुक्रवारी काँग्रेसच्या नेत्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीकडेही पटोले यांनी पाठ फिरवली. आपण भंडारा-गोंदियात प्रचारामध्ये व्यग्र असल्याचे कारण पटोलेंनी सांगितल्याचे समजते. सांगली आणि दक्षिण मध्य मुंबईची जागा शिवसेनेला गेली तर त्याचे खापर आपल्या डोक्यावर नको आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांची नाराजी नको म्हणून पटोले या बैठकांना गैरहजर राहिल्याची चर्चा आहे. शुक्रवारच्या बैठकीला प्रभारी रमेश चेन्नीथला, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची येत्या ३ एप्रिल रोजी पत्रकार परिषद होणार असून, त्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. उद्धव ठाकरे व शरद पवार दिल्लीत जाणार आहेत; मात्र तिथे राज्यातील जागावाटपावर चर्चा होणार नाही.      - संजय राऊत, ठाकरे गटाचे नेते 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४