शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तीन जागांचा गुंता सुटेना! आघाडीचे घोडे अडलेलेच; चर्चा होणार, पण आता दिल्लीतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 06:54 IST

जागावाटपाबाबत आता दिल्लीतील नेत्यांनी चर्चा करावी, अशी भूमिका राज्यातील काँग्रेस नेत्यांनी घेतली.

मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटपाचे घोडे तीन जागांवरून अडलेलेच आहे. आघाडीतील तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका होऊनही सांगली, दक्षिण मध्य मुंबई आणि भिवंडी या जागांचा तिढा कायम आहे. 

राज्याच्या स्तरावर हा तिढा सुटत नसल्याने आता याबाबत दिल्लीत चर्चा होणार असल्याची माहिती आघाडीतील सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शुक्रवारी राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीतील नेत्यांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली.

या बैठकीत तिढा असलेल्या जागावाटपाबाबत आता दिल्लीतील नेत्यांनी चर्चा करावी, अशी भूमिका राज्यातील काँग्रेस नेत्यांनी घेतली. लोकसभेच्या सांगली मतदारसंघात ठाकरे गटाने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. ‘मविआ’त सांगलीच्या जागेवर काँग्रेसनेही दावा सांगितला आहे. 

सांगलीत मैत्रीपूर्ण लढतसांगलीच्या जागेसाठी काँग्रेस जास्त आग्रही आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनीही हा विषय लावून धरला असून, त्यासाठी एकदा दिल्लीत धडक दिली आहे. जर सांगलीची जागा काँग्रेसला सुटली नाही तर या जागेवर मैत्रीपूर्ण लढत करावी, असा आग्रह काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी धरला असून त्याबाबतचा निर्णय दिल्लीतील नेतेच घेऊ शकतात, असे राज्यातील एका काँग्रेस नेत्याने सांगितले.

आमचा वापर केला जाताेय : प्रकाश आंबेडकरमहाविकास आघाडीत आम्हाला वेगळे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. येत्या दोन एप्रिल रोजी आम्ही सगळे स्पष्ट करणार आहोत, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. कुणी तरी कुणासाठी आम्हाला वापरून घेत असल्याचे दिसते, असेही आंबेडकर म्हणाले.

कोणत्या जागेचा पेच?दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ काँग्रेससाठी अनुकूल असल्याचे सांगत काँग्रेसने या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. तर उद्धव ठाकरेंनी अनिल देसाईंची इथून उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आतापर्यंतच्या आघाडीत भिवंडीची जागा ही काँग्रेसच्या वाट्याला यायची. यावेळी या जागेवर शरद पवार गटानेही दावा केला आहे. तर काँग्रेसही दावा सोडायला तयार नसल्याने जागेचा पेच कायम आहे. 

नाना पटोलेंची गैरहजेरीतीन जागांचा तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते. तर शुक्रवारी काँग्रेसच्या नेत्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीकडेही पटोले यांनी पाठ फिरवली. आपण भंडारा-गोंदियात प्रचारामध्ये व्यग्र असल्याचे कारण पटोलेंनी सांगितल्याचे समजते. सांगली आणि दक्षिण मध्य मुंबईची जागा शिवसेनेला गेली तर त्याचे खापर आपल्या डोक्यावर नको आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांची नाराजी नको म्हणून पटोले या बैठकांना गैरहजर राहिल्याची चर्चा आहे. शुक्रवारच्या बैठकीला प्रभारी रमेश चेन्नीथला, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची येत्या ३ एप्रिल रोजी पत्रकार परिषद होणार असून, त्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. उद्धव ठाकरे व शरद पवार दिल्लीत जाणार आहेत; मात्र तिथे राज्यातील जागावाटपावर चर्चा होणार नाही.      - संजय राऊत, ठाकरे गटाचे नेते 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४