शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती-अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 05:34 IST

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती झाली असून, विद्यमान सरकारने महाराष्ट्राच्या हिताचे एकही धोरण राबविले नाही.

मुंबई : भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती झाली असून, विद्यमान सरकारने महाराष्ट्राच्या हिताचे एकही धोरण राबविले नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हे सरकार घालवावेच लागेल, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केली.टिळक भवन या दादर येथील काँग्रेस कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर अशोक चव्हाण बोलत होते. तत्पूर्वी चव्हाण यांनी हुतात्मा चौकात जाऊन, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, चव्हाण यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जोरदार टीका केली. भाजपा सत्तेत आल्यापासून १३ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे उद्योग व्यापार मोठ्या संकटात सापडला आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून, राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून समाजात जातीय तेढ निर्माण केले जात आहे. केंद्रातले आणि राज्यातले सरकार जनतेच्या भल्यासाठी काम करण्याऐवजी, दोन-चार उद्योगपतींच्या भल्यासाठी काम करीत आहेत. कामगार कायदे बदलून कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम सुरू आहे. देशाला भांडवलदारांच्या ताब्यात जाण्यापासून वाचविण्यासाठी भाजपाला सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. या वेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार भाई जगताप यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशोक चव्हाण बुधवारी, २ मे रोजी नाणारला भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधणार आहेत. नाणार रिफायनरी विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने अलीकडेच अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. अशोक चव्हाण उद्या सकाळी ११.३० वाजता कात्रादेवी सागवे ता.राजापूर येथे स्थानिकांशी संवाद साधणार आहेत व त्यानंतर जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या वेळी महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खा. हुसेन दलवाई, आ. भाई जगताप, आ. हुस्नबानो यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी त्यांसोबत असतील.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपा