शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती-अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 05:34 IST

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती झाली असून, विद्यमान सरकारने महाराष्ट्राच्या हिताचे एकही धोरण राबविले नाही.

मुंबई : भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती झाली असून, विद्यमान सरकारने महाराष्ट्राच्या हिताचे एकही धोरण राबविले नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हे सरकार घालवावेच लागेल, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केली.टिळक भवन या दादर येथील काँग्रेस कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर अशोक चव्हाण बोलत होते. तत्पूर्वी चव्हाण यांनी हुतात्मा चौकात जाऊन, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, चव्हाण यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जोरदार टीका केली. भाजपा सत्तेत आल्यापासून १३ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे उद्योग व्यापार मोठ्या संकटात सापडला आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून, राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून समाजात जातीय तेढ निर्माण केले जात आहे. केंद्रातले आणि राज्यातले सरकार जनतेच्या भल्यासाठी काम करण्याऐवजी, दोन-चार उद्योगपतींच्या भल्यासाठी काम करीत आहेत. कामगार कायदे बदलून कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम सुरू आहे. देशाला भांडवलदारांच्या ताब्यात जाण्यापासून वाचविण्यासाठी भाजपाला सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. या वेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार भाई जगताप यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशोक चव्हाण बुधवारी, २ मे रोजी नाणारला भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधणार आहेत. नाणार रिफायनरी विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने अलीकडेच अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. अशोक चव्हाण उद्या सकाळी ११.३० वाजता कात्रादेवी सागवे ता.राजापूर येथे स्थानिकांशी संवाद साधणार आहेत व त्यानंतर जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या वेळी महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खा. हुसेन दलवाई, आ. भाई जगताप, आ. हुस्नबानो यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी त्यांसोबत असतील.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपा