शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Maharashtra winter session 2021 : अध्यक्षांविना संपले अधिवेशन, निवडणूक झालीच नाही; राज्यपालांशी टळला संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 06:45 IST

Maharashtra winter session 2021 : सरकारच्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या सोमवारच्या बैठकीतही अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायचीच, असा सूर होता. मात्र, मंगळवारी राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठविले आणि सरकारने निवडणुकीवर यू-टर्न घेतल्याचे म्हटले जाते. 

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यावर ठाम असलेल्या  आघाडी सरकारने राज्यपालांशी अधिक संघर्ष टाळला आणि विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही निवडणूक घेतली नाही. त्यामुळे सरकार बॅकफूटवर गेल्याचे दिसले. काँग्रेसला याही अधिवेशनात अध्यक्षपदाने हुलकावणी दिली.

‘विधानमंडळ हे कायदेमंडळ आहे आणि त्यात झालेले निर्णय आपल्या कक्षेत येत नाहीत’, असे बजावून सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांनी अनुमती दिली नाही तरी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे स्पष्ट संकेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठविलेल्या पत्रात सोमवारी दिले होते. 

सरकारच्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या सोमवारच्या बैठकीतही अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायचीच, असा सूर होता. मात्र, मंगळवारी राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठविले आणि सरकारने निवडणुकीवर यू-टर्न घेतल्याचे म्हटले जाते. 

पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चासूत्रांनी सांगितले की, अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्याआधी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी पवार आणि ठाकरे या दोघांनाही राज्यपालांच्या अनुमतीशिवाय निवडणूक घेण्यातील धोक्यांबाबत ‘ब्रीफ’ केले होते.  निवडणूक झालीच तर ती घटनाबाह्य घेतल्याचे कारण देत राज्यपाल, केंद्र सरकारकडून राज्य सरकारला अडचणीत आणले जाईल आणि भाजपच्या खेळीला राज्य सरकार बळी पडल्यासारखे होईल, तेव्हा निवडणूक टाळावी, असे पवार-ठाकरे चर्चेत ठरल्याचे समजते. त्यानंतर काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशीही चर्चा करण्यात आली आणि निवडणूक न घेण्याचे निश्चित करण्यात आले.

राष्ट्रपती राजवटीला आमंत्रण? ‘अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेणे हे घटनात्मक नाही, असे राज्यपालांचे म्हणणे हाेते.  तरीही ती तुम्ही घेणार असाल तर राष्ट्रपती राजवटीला ते आमंत्रण ठरेल, असे राज्यपालांच्या पत्रात थेट नमूद नसले तरी त्यादृष्टीने त्यांनी अंगुलीनिर्देश केला होता, अशी माहिती आहे.  त्यामुळेच सरकार बॅकफूटवर गेल्याचे म्हटले जाते. अध्यक्षपदासाठी सरकार पणाला न लावण्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतली. भविष्यात आवाजी मतदानानेच ही निवडणूक घ्यायची यावर मात्र सरकार ठाम आहे.

काँग्रेसच्या पदरी निराशाच नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून (फेब्रुवारी २०२१) अध्यक्षपद रिक्त आहे. अध्यक्षांच्या निवडीशिवाय मंगळवारी हिवाळी अधिवेशनदेखील संपले. आता फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या अधिवेशनापर्यंत वाट बघावी लागणार आहे. महाविकास आघाडीकडे १७० आमदारांचे संख्याबळ असतानाही काँग्रेसला अध्यक्षपद मिळू शकले नाही.

अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरातविधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ फेब्रुवारी २०२२ पासून नागपुरात होणार आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVidhan Parishadविधान परिषद