शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

महाराष्ट्राला ‘वेदांत’पेक्षा मोठा प्रकल्प मिळणार; पंतप्रधान मोदींचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 05:56 IST

महाराष्ट्रातील युवा पिढी बेरोजगार राहू नये म्हणून यापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणला जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे.

ठाणे/नवी मुंबई : वेदांत - फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. सात महिन्यांच्या कालावधीत कंपनीला इन्सेंटिव्ह पॅकेज दिले असते तर हा प्रकल्प महाराष्ट्रात राहिला असता. महाराष्ट्राला यापेक्षा मोठा प्रकल्प दिला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रातील युवा पिढी बेरोजगार राहू नये म्हणून यापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणला जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे. वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याचे खापर शिंदे-फडणवीसांवर फोडायचे, अशी राजकीय खेळी सुरू असल्याचा आरोप सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. 

३९ हजार कोटींचे पॅकेज आधीच्या सरकारने दिले होते. तरीही हा प्रकल्प आलेला नाही, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात असे कोणतेही पॅकेज ठरले नव्हते. या प्रकल्पाबाबत संबंधित कंपनीने केंद्र सरकार व राज्य सरकार काय सुविधा देऊ शकता, अशी विचारणा करणारे पत्र पाठविले होते. आधीच्या सरकारने त्या पत्राला उत्तर दिले नव्हते, याकडे सामंत यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर शिंदे यांना या कंपनीबद्दल प्रेझेंटेशन दिले गेले. फडणवीस यांनी प्रकल्पाचे अनिल अग्रवाल यांना भेटून त्यांच्या शंका दूर केल्या, असे सामंत यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी हाय पॉवर कमिटीची मीटिंग आधीच्या सरकारने घेणे गरजेचे होते; पण घेतली नाही. 

‘नाणार’ही रोजगार देणारा प्रकल्प होतानाणार प्रकल्पाला उद्धव ठाकरेंपासून सगळ्यांनी विरोध केला म्हणून तो प्रकल्प रद्द केला. ठाकरेंनी हा प्रकल्प बैसूरला करू शकतो, असे पत्र केंद्र सरकारला लिहिले; पण तिथेही विरोध होत आहे. एक प्रकल्प हातातून गेला तर विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप करीत आहेत. नाणार प्रकल्पदेखील युवा पिढीला रोजगार देणारा होता, असा टोला सामंत यांनी लगावला.

‘त्या’ उद्योगांची यादी आज जाहीर करणार अडीच वर्षांत महाराष्ट्रातून किती प्रकल्प बाहेर गेले, याची यादी उद्याच जाहीर करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असल्याची टीका केली. त्या टीकेला त्यांनी उत्तरही दिले. येत्या वर्षभरात महाराष्ट्रातील मराठी उद्योजक दीड लाख रोजगार उपलब्ध करून देणार आहेत.

महाविकास आघाडीमुळेच औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र पिछाडीवर गेला आहे. ‘वेदांत’ही मागील सरकारच्या अनास्थेमुळेच गुजरातला गेल्याचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी केला. चांगले झाले की आम्ही केले व वाईट झाले की शिंदे-फडणवीस यांनी केले, असे बोलण्याची सवय विरोधकांना लागल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUday Samantउदय सामंत