शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

महाराष्ट्राला ‘वेदांत’पेक्षा मोठा प्रकल्प मिळणार; पंतप्रधान मोदींचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 05:56 IST

महाराष्ट्रातील युवा पिढी बेरोजगार राहू नये म्हणून यापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणला जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे.

ठाणे/नवी मुंबई : वेदांत - फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. सात महिन्यांच्या कालावधीत कंपनीला इन्सेंटिव्ह पॅकेज दिले असते तर हा प्रकल्प महाराष्ट्रात राहिला असता. महाराष्ट्राला यापेक्षा मोठा प्रकल्प दिला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रातील युवा पिढी बेरोजगार राहू नये म्हणून यापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणला जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे. वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याचे खापर शिंदे-फडणवीसांवर फोडायचे, अशी राजकीय खेळी सुरू असल्याचा आरोप सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. 

३९ हजार कोटींचे पॅकेज आधीच्या सरकारने दिले होते. तरीही हा प्रकल्प आलेला नाही, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात असे कोणतेही पॅकेज ठरले नव्हते. या प्रकल्पाबाबत संबंधित कंपनीने केंद्र सरकार व राज्य सरकार काय सुविधा देऊ शकता, अशी विचारणा करणारे पत्र पाठविले होते. आधीच्या सरकारने त्या पत्राला उत्तर दिले नव्हते, याकडे सामंत यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर शिंदे यांना या कंपनीबद्दल प्रेझेंटेशन दिले गेले. फडणवीस यांनी प्रकल्पाचे अनिल अग्रवाल यांना भेटून त्यांच्या शंका दूर केल्या, असे सामंत यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी हाय पॉवर कमिटीची मीटिंग आधीच्या सरकारने घेणे गरजेचे होते; पण घेतली नाही. 

‘नाणार’ही रोजगार देणारा प्रकल्प होतानाणार प्रकल्पाला उद्धव ठाकरेंपासून सगळ्यांनी विरोध केला म्हणून तो प्रकल्प रद्द केला. ठाकरेंनी हा प्रकल्प बैसूरला करू शकतो, असे पत्र केंद्र सरकारला लिहिले; पण तिथेही विरोध होत आहे. एक प्रकल्प हातातून गेला तर विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप करीत आहेत. नाणार प्रकल्पदेखील युवा पिढीला रोजगार देणारा होता, असा टोला सामंत यांनी लगावला.

‘त्या’ उद्योगांची यादी आज जाहीर करणार अडीच वर्षांत महाराष्ट्रातून किती प्रकल्प बाहेर गेले, याची यादी उद्याच जाहीर करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असल्याची टीका केली. त्या टीकेला त्यांनी उत्तरही दिले. येत्या वर्षभरात महाराष्ट्रातील मराठी उद्योजक दीड लाख रोजगार उपलब्ध करून देणार आहेत.

महाविकास आघाडीमुळेच औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र पिछाडीवर गेला आहे. ‘वेदांत’ही मागील सरकारच्या अनास्थेमुळेच गुजरातला गेल्याचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी केला. चांगले झाले की आम्ही केले व वाईट झाले की शिंदे-फडणवीस यांनी केले, असे बोलण्याची सवय विरोधकांना लागल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUday Samantउदय सामंत