शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

'स्वतःच्या आमदारांवर विश्वास नसणारे सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधी पाहिले नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 15:06 IST

'या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय होत नाही.'

मुंबई: आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session 2021)सुरू झाले आहे.अधिवेशन 28 डिसेंबर 2021 रोजी संपणार आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येते. मात्र, यावेळी हे मुंबईत होत आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेली पाहायला मिळाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी अध्यक्ष निवड यासह आरोग्य विभागाचा घोळ, म्हाडा आणि TET परीक्षांवरुन सरकारवर जोरदार टीका केली. 

सरकारचा स्वतःच्या आमदारांवर विश्वास नाहीयावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्ष निवडीवरुन राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. स्वतःच्या आमदारांवरच अविश्वास असणारे सरकार आम्ही महाराष्ट्राच्या इतिहासात कधी पाहिले नाही, अशी टीका फडणवीसांनी केली. तसेच, महाराष्ट्र विधानसभेच्या स्थापनेपासून जी प्रथा होती, ती बदलण्याचा अट्टाहास का? असा सवालही केला. याशिवाय, तुम्ही हे रेटून नेणार असाल तर आम्ही आमची लढाई कायदेशीर लढू, असे आव्हान त्यांनी दिले. 

इतके असुरक्षित सरकार पाहिले नाहीफडणवीस पुढे म्हणाले की, ज्या सरकारकडे 170 आमदारांचे बहुमत असल्याचे सांगितले जाते, त्या सरकारच्या मनात अध्यक्ष निवडणुकीबाबत संशय आहे. सरकारला स्वत:च्या बहुमातावर विश्वास नाही का ? नियम बदलले तर किमान त्याचा सभागृहासमोरील विचाराचा कालावधी कमी करता येणार नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात इतके असुरक्षित सरकार मी आजवर पाहिले नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते अटलजी यांनीही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कधी व्हीप लागू केला नव्हता. त्यांच्या नावाचा चुकीचा वापर करू नका. तुमच्या भीतीसाठी कशाला खोटे बोलता ? असेही ते म्हणाले.

सरकारने अपात्र कंपन्यांना टेंडर दिलेयावेळी फडणवीस यांनी राज्यातील भरती प्रक्रियेतील घोटाळ्यावरही भाष्य केले. 21 जानेवारी 2021ला न्यासा नावाच्या कंपनीला अपात्र ठरवण्यात आले होते. पण, 4 मार्च रोजी पुन्हा याच कंपनीला पात्र ठरवले. चार कंपन्यांना डावलून न्यासा कंपनीला संपूर्ण काम देण्यात आले. त्यांनाच काम देण्याची आवश्यकता काय होती? त्यामाध्यमातून आधी आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये घोटाळा झाला आणि मग म्हाडाच्या भरतीमध्ये घोटाळा झाला. जीए सॉफ्टवेअर कंपनीला देखील अपात्र ठरवले होते, त्यानंतर त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा केला. या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय होत नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन