शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सर्व पक्षांच्या नेत्यांकडून सुसंस्कृतपणाचे दर्शन; भास्कर जाधव आक्रस्ताळे वाटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 06:47 IST

लोकशाहीच्या पवित्र मंदिरात आल्यानंतर आक्रस्ताळेपणाला फाटा द्यायचा असतो, राजकीय वैराला मूठमाती द्यायची असते. बाहेरच्या वादाचा विधानभवन हा आखाडा बनता कामा नये या महाराष्ट्राच्या आजवरच्या परंपरेचे वहन सर्वांनीच केले.

यदु जोशी मुंबई : गेल्या १४ दिवसांतील सत्तांतराच्या प्रचंड घडामोडी, आरोप-प्रत्यारोप, धमक्यांचे सत्र व त्यातून आलेली कटूता, असे एकूणच वातावरण राज्यात असताना या सत्तांतराला पूर्णविराम देणाऱ्या विश्वासदर्शक ठरावावेळी बोलताना सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सभ्यता व सुसंस्कृतपणाचे दर्शन घडवत देशासमोर आदर्श निर्माण केला.

लोकशाहीच्या पवित्र मंदिरात आल्यानंतर आक्रस्ताळेपणाला फाटा द्यायचा असतो, राजकीय वैराला मूठमाती द्यायची असते. बाहेरच्या वादाचा विधानभवन हा आखाडा बनता कामा नये या महाराष्ट्राच्या आजवरच्या परंपरेचे वहन सर्वांनीच केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले भाषण तर अप्रतिम होते. ‘मी पुन्हा येईन या वाक्याची टिंगल करणाऱ्यांचा मी बदला घेणार आहे..., असे देवेंद्र फडणवीस म्हणाले तेव्हा कोणता बदला ते घेणार, असा प्रश्न पडला पण पुढच्या सेकंदात त्यांनी दिलेले उत्तर सहृदयतेचे व निरागसतेचे दर्शन घडविणारे होते. ते म्हणाले, ‘टिंगलटवाळी करणाऱ्यांना मी माफ केले, हाच माझा बदला’. आपल्याविषयी काहीबाही बोलणाऱ्यांबद्दल निकोपता ठेवणारे त्यांचे हे वाक्य सर्वांची  मने जिंकणारे होते.

सत्ता गेली, पक्षही फुटल्याचे खापर फोडत शिंदे आणि समर्थक आमदारांवर आक्रस्ताळेपणाने तुटून पडण्याची भूमिका आदित्य ठाकरे, सुनील प्रभू यांनी घेतली नाही. भास्कर जाधव मात्र आक्रस्ताळे वाटले. अजित पवार यांच्या भाषणातही आकसाचा लवलेश नव्हता. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणात शिवसेनेत झालेल्या खच्चीकरणाची खंत होती पण शिवराळ भाषा, अरेरावीचे शब्द नव्हते. वागण्याबोलण्यात जाणवणारी कळकळ होती. पहिल्यावहिल्या भाषणाने त्यांनी राज्याला जिंकले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा