शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सर्व पक्षांच्या नेत्यांकडून सुसंस्कृतपणाचे दर्शन; भास्कर जाधव आक्रस्ताळे वाटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 06:47 IST

लोकशाहीच्या पवित्र मंदिरात आल्यानंतर आक्रस्ताळेपणाला फाटा द्यायचा असतो, राजकीय वैराला मूठमाती द्यायची असते. बाहेरच्या वादाचा विधानभवन हा आखाडा बनता कामा नये या महाराष्ट्राच्या आजवरच्या परंपरेचे वहन सर्वांनीच केले.

यदु जोशी मुंबई : गेल्या १४ दिवसांतील सत्तांतराच्या प्रचंड घडामोडी, आरोप-प्रत्यारोप, धमक्यांचे सत्र व त्यातून आलेली कटूता, असे एकूणच वातावरण राज्यात असताना या सत्तांतराला पूर्णविराम देणाऱ्या विश्वासदर्शक ठरावावेळी बोलताना सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सभ्यता व सुसंस्कृतपणाचे दर्शन घडवत देशासमोर आदर्श निर्माण केला.

लोकशाहीच्या पवित्र मंदिरात आल्यानंतर आक्रस्ताळेपणाला फाटा द्यायचा असतो, राजकीय वैराला मूठमाती द्यायची असते. बाहेरच्या वादाचा विधानभवन हा आखाडा बनता कामा नये या महाराष्ट्राच्या आजवरच्या परंपरेचे वहन सर्वांनीच केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले भाषण तर अप्रतिम होते. ‘मी पुन्हा येईन या वाक्याची टिंगल करणाऱ्यांचा मी बदला घेणार आहे..., असे देवेंद्र फडणवीस म्हणाले तेव्हा कोणता बदला ते घेणार, असा प्रश्न पडला पण पुढच्या सेकंदात त्यांनी दिलेले उत्तर सहृदयतेचे व निरागसतेचे दर्शन घडविणारे होते. ते म्हणाले, ‘टिंगलटवाळी करणाऱ्यांना मी माफ केले, हाच माझा बदला’. आपल्याविषयी काहीबाही बोलणाऱ्यांबद्दल निकोपता ठेवणारे त्यांचे हे वाक्य सर्वांची  मने जिंकणारे होते.

सत्ता गेली, पक्षही फुटल्याचे खापर फोडत शिंदे आणि समर्थक आमदारांवर आक्रस्ताळेपणाने तुटून पडण्याची भूमिका आदित्य ठाकरे, सुनील प्रभू यांनी घेतली नाही. भास्कर जाधव मात्र आक्रस्ताळे वाटले. अजित पवार यांच्या भाषणातही आकसाचा लवलेश नव्हता. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणात शिवसेनेत झालेल्या खच्चीकरणाची खंत होती पण शिवराळ भाषा, अरेरावीचे शब्द नव्हते. वागण्याबोलण्यात जाणवणारी कळकळ होती. पहिल्यावहिल्या भाषणाने त्यांनी राज्याला जिंकले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा