शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
7
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
8
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
9
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
10
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
11
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
12
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
13
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
14
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
15
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
16
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
17
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
18
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
19
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
20
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!

सर्व पक्षांच्या नेत्यांकडून सुसंस्कृतपणाचे दर्शन; भास्कर जाधव आक्रस्ताळे वाटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 06:47 IST

लोकशाहीच्या पवित्र मंदिरात आल्यानंतर आक्रस्ताळेपणाला फाटा द्यायचा असतो, राजकीय वैराला मूठमाती द्यायची असते. बाहेरच्या वादाचा विधानभवन हा आखाडा बनता कामा नये या महाराष्ट्राच्या आजवरच्या परंपरेचे वहन सर्वांनीच केले.

यदु जोशी मुंबई : गेल्या १४ दिवसांतील सत्तांतराच्या प्रचंड घडामोडी, आरोप-प्रत्यारोप, धमक्यांचे सत्र व त्यातून आलेली कटूता, असे एकूणच वातावरण राज्यात असताना या सत्तांतराला पूर्णविराम देणाऱ्या विश्वासदर्शक ठरावावेळी बोलताना सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सभ्यता व सुसंस्कृतपणाचे दर्शन घडवत देशासमोर आदर्श निर्माण केला.

लोकशाहीच्या पवित्र मंदिरात आल्यानंतर आक्रस्ताळेपणाला फाटा द्यायचा असतो, राजकीय वैराला मूठमाती द्यायची असते. बाहेरच्या वादाचा विधानभवन हा आखाडा बनता कामा नये या महाराष्ट्राच्या आजवरच्या परंपरेचे वहन सर्वांनीच केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले भाषण तर अप्रतिम होते. ‘मी पुन्हा येईन या वाक्याची टिंगल करणाऱ्यांचा मी बदला घेणार आहे..., असे देवेंद्र फडणवीस म्हणाले तेव्हा कोणता बदला ते घेणार, असा प्रश्न पडला पण पुढच्या सेकंदात त्यांनी दिलेले उत्तर सहृदयतेचे व निरागसतेचे दर्शन घडविणारे होते. ते म्हणाले, ‘टिंगलटवाळी करणाऱ्यांना मी माफ केले, हाच माझा बदला’. आपल्याविषयी काहीबाही बोलणाऱ्यांबद्दल निकोपता ठेवणारे त्यांचे हे वाक्य सर्वांची  मने जिंकणारे होते.

सत्ता गेली, पक्षही फुटल्याचे खापर फोडत शिंदे आणि समर्थक आमदारांवर आक्रस्ताळेपणाने तुटून पडण्याची भूमिका आदित्य ठाकरे, सुनील प्रभू यांनी घेतली नाही. भास्कर जाधव मात्र आक्रस्ताळे वाटले. अजित पवार यांच्या भाषणातही आकसाचा लवलेश नव्हता. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणात शिवसेनेत झालेल्या खच्चीकरणाची खंत होती पण शिवराळ भाषा, अरेरावीचे शब्द नव्हते. वागण्याबोलण्यात जाणवणारी कळकळ होती. पहिल्यावहिल्या भाषणाने त्यांनी राज्याला जिंकले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा