शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

महाराष्ट्रात बालगुन्हेगारीचा चढता आलेख , एनसीआरबीचा अहवाल : मध्य प्रदेशपाठोपाठ राज्याचा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 05:26 IST

मध्य प्रदेशपाठोपाठ राज्यातही बालगुन्हेगारी वाढत असल्याचे विदारक वास्तव एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट झाले. यामध्ये निरक्षरबालगुन्हेगारांपेक्षा शिक्षित बालगुन्हेगारांचे प्रमाण अधिक आहे. किरकोळ स्वरूपाचे गुन्हे घडणे नवीन नाही, मात्र गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतही खून, दरोडा, घरफोडी, विनयभंग....

- मनीषा म्हात्रेमुंबई : मध्य प्रदेशपाठोपाठ राज्यातही बालगुन्हेगारी वाढत असल्याचे विदारक वास्तव एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट झाले. यामध्ये निरक्षरबालगुन्हेगारांपेक्षा शिक्षित बालगुन्हेगारांचे प्रमाण अधिक आहे. किरकोळ स्वरूपाचे गुन्हे घडणे नवीन नाही, मात्र गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतही खून, दरोडा, घरफोडी, विनयभंग, बलात्कार, सामूहिक बलात्कार, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न करणे आदी गुन्ह्यांत बालकांचा समावेश वाढत चालला आहे, ही गंभीर बाब आहे.एनसीआरबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात बालगुन्हेगारीचे ३५ हजार ८४९ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मध्य प्रदेश अग्रस्थानी आहे. मध्य प्रदेशमध्ये एकूण ७,३६९ गुन्हे दाखल झाले आहेत. तर त्यापाठोपाठ महाराष्ट्र राज्याचा क्रमांक लागतो. राज्यात एकूण ६ हजार ६०६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये बालगुन्हेगारांकडून झालेल्या हत्येच्या आकडा १३०वर पोहोचला आहे. तर अल्पवयीन मुलांकडून २५८ जणी बलात्काराच्या शिकार ठरल्या आहेत. आरोपींमध्ये १२ वर्षांखालील मुलेही आहेत, ही चिंतेची बाब आहे. आतापर्यंत ७,७१२ बालगुन्हेगारांना विविध गुन्ह्यांत ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये प्राथमिक ते १२वी इयत्तेपर्यंत शिकणाºया बालगुन्हेगारांचे प्रमाण अधिक आहे.अनेक बालगुन्हेगार मौजमजेसाठी पैसे लागत असल्याने गुन्हेगारीकडे वळतात. दिवसभर सुरू असणाºया विविध वाहिन्या, गुन्हेगारी मालिका, स्पर्धात्मक जगामध्ये आपल्याला सगळ्या सुविधा मिळणे ही मानसिकता; तसेच मित्रांची संगत, पालकांचे पुरेसे नियंत्रण नसल्याने मुले चुकीच्या मार्गाकडे वळतात. काही सराईत गुन्हेगार पैशांचे आमिष दाखवून बालकांचा गुन्ह्यांमध्ये वापर करून घेतात. घरातील आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती तसेच चुकीच्या मित्रांची साथसंगतदेखील मुलांना बालगुन्हेगारीकडे वळण्यास प्रवृत्त करीत असल्याचे दिसून येत आहे. केवळ पैशांसाठीच नाही, तर विकृतपणे लैंगिक आकर्षणापोटी अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांबरोबरच पालकांनीही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.कारवाईतील अडचणीबालगुन्हेगाराला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात नोंद करून बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात येते. गुन्ह्याचे स्वरूप पाहून त्याची बालसुधारगृहात रवानगी केली जाते. जिल्हा सत्र न्यायालयात बालगुन्हेगारांच्या जामिनासाठी अर्ज करावा लागतो.कोर्टाच्या परवानगीनंतर त्याला बालसुधारगृहात ठेवायचे अथवा जामिनावर सोडून पालकांच्या ताब्यात द्यायचे, याबाबत गुन्ह्याचे स्वरूप पाहून निर्णय घेण्यात येतो. यानंतर बालसुधारगृहातील बाल न्याय मंडळापुढे त्याची केस सुरू होते. त्यानंतर साक्षीपुरावे पाहून बाल न्याय मंडळ त्यावर निर्णय घेते.पकडलेल्या बालगुन्हेगाराला अटक करता येत नाही. त्याला कारागृहात अथवा लॉकअपमध्ये ठेवता येत नाही. खाकी वर्दीची दहशत बसू नये म्हणून साध्या वेशातील कर्मचारी चौकशीसाठी येतात. त्यानंतर पुढील चौकशीसाठी त्याला ताब्यात घ्यायचे ठरले तर बाल न्याय मंडळाला अर्ज करावा लागतो.  शैक्षणिक वर्गीकरणानुसारशिक्षण    अटक बालगुन्हेगार    निरक्षर    ४२०प्राथमिक शिक्षण    २७६४दहावी नापास    ४१२९१२वी पास    ३९९ 

 

टॅग्स :Crimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार