शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

महाराष्ट्रात बालगुन्हेगारीचा चढता आलेख , एनसीआरबीचा अहवाल : मध्य प्रदेशपाठोपाठ राज्याचा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 05:26 IST

मध्य प्रदेशपाठोपाठ राज्यातही बालगुन्हेगारी वाढत असल्याचे विदारक वास्तव एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट झाले. यामध्ये निरक्षरबालगुन्हेगारांपेक्षा शिक्षित बालगुन्हेगारांचे प्रमाण अधिक आहे. किरकोळ स्वरूपाचे गुन्हे घडणे नवीन नाही, मात्र गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतही खून, दरोडा, घरफोडी, विनयभंग....

- मनीषा म्हात्रेमुंबई : मध्य प्रदेशपाठोपाठ राज्यातही बालगुन्हेगारी वाढत असल्याचे विदारक वास्तव एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट झाले. यामध्ये निरक्षरबालगुन्हेगारांपेक्षा शिक्षित बालगुन्हेगारांचे प्रमाण अधिक आहे. किरकोळ स्वरूपाचे गुन्हे घडणे नवीन नाही, मात्र गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतही खून, दरोडा, घरफोडी, विनयभंग, बलात्कार, सामूहिक बलात्कार, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न करणे आदी गुन्ह्यांत बालकांचा समावेश वाढत चालला आहे, ही गंभीर बाब आहे.एनसीआरबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात बालगुन्हेगारीचे ३५ हजार ८४९ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मध्य प्रदेश अग्रस्थानी आहे. मध्य प्रदेशमध्ये एकूण ७,३६९ गुन्हे दाखल झाले आहेत. तर त्यापाठोपाठ महाराष्ट्र राज्याचा क्रमांक लागतो. राज्यात एकूण ६ हजार ६०६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये बालगुन्हेगारांकडून झालेल्या हत्येच्या आकडा १३०वर पोहोचला आहे. तर अल्पवयीन मुलांकडून २५८ जणी बलात्काराच्या शिकार ठरल्या आहेत. आरोपींमध्ये १२ वर्षांखालील मुलेही आहेत, ही चिंतेची बाब आहे. आतापर्यंत ७,७१२ बालगुन्हेगारांना विविध गुन्ह्यांत ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये प्राथमिक ते १२वी इयत्तेपर्यंत शिकणाºया बालगुन्हेगारांचे प्रमाण अधिक आहे.अनेक बालगुन्हेगार मौजमजेसाठी पैसे लागत असल्याने गुन्हेगारीकडे वळतात. दिवसभर सुरू असणाºया विविध वाहिन्या, गुन्हेगारी मालिका, स्पर्धात्मक जगामध्ये आपल्याला सगळ्या सुविधा मिळणे ही मानसिकता; तसेच मित्रांची संगत, पालकांचे पुरेसे नियंत्रण नसल्याने मुले चुकीच्या मार्गाकडे वळतात. काही सराईत गुन्हेगार पैशांचे आमिष दाखवून बालकांचा गुन्ह्यांमध्ये वापर करून घेतात. घरातील आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती तसेच चुकीच्या मित्रांची साथसंगतदेखील मुलांना बालगुन्हेगारीकडे वळण्यास प्रवृत्त करीत असल्याचे दिसून येत आहे. केवळ पैशांसाठीच नाही, तर विकृतपणे लैंगिक आकर्षणापोटी अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांबरोबरच पालकांनीही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.कारवाईतील अडचणीबालगुन्हेगाराला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात नोंद करून बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात येते. गुन्ह्याचे स्वरूप पाहून त्याची बालसुधारगृहात रवानगी केली जाते. जिल्हा सत्र न्यायालयात बालगुन्हेगारांच्या जामिनासाठी अर्ज करावा लागतो.कोर्टाच्या परवानगीनंतर त्याला बालसुधारगृहात ठेवायचे अथवा जामिनावर सोडून पालकांच्या ताब्यात द्यायचे, याबाबत गुन्ह्याचे स्वरूप पाहून निर्णय घेण्यात येतो. यानंतर बालसुधारगृहातील बाल न्याय मंडळापुढे त्याची केस सुरू होते. त्यानंतर साक्षीपुरावे पाहून बाल न्याय मंडळ त्यावर निर्णय घेते.पकडलेल्या बालगुन्हेगाराला अटक करता येत नाही. त्याला कारागृहात अथवा लॉकअपमध्ये ठेवता येत नाही. खाकी वर्दीची दहशत बसू नये म्हणून साध्या वेशातील कर्मचारी चौकशीसाठी येतात. त्यानंतर पुढील चौकशीसाठी त्याला ताब्यात घ्यायचे ठरले तर बाल न्याय मंडळाला अर्ज करावा लागतो.  शैक्षणिक वर्गीकरणानुसारशिक्षण    अटक बालगुन्हेगार    निरक्षर    ४२०प्राथमिक शिक्षण    २७६४दहावी नापास    ४१२९१२वी पास    ३९९ 

 

टॅग्स :Crimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार