शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

'साखर कामगाराचे' आयुष्य कडवटच; दोन-दोन वर्षे पगाराविना संसार उघड्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 12:40 IST

डोक्यावर राजकारणाची टांगती तलवार

पन्हाळ्यावर उद्या, गुरुवारपासून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य साखर कामगारांचे शिबीर होत आहे. यामध्ये त्यांच्या प्रलंबित मागण्यांची केवळ चर्चा आणि आश्वासन देऊन समारोप होऊ नये, एवढीच अपेक्षा कामगारांची आहे. याबाबत ‘लोकमत’ने कामगारांच्या प्रश्नांचा घेतलेला आढावा...कोल्हापूर : प्रत्येकाच्या आयुष्यात साखरेच्या रुपाने गोडी निर्माण करणारा राज्यातील साखर कामगार मात्र स्वता कडू आयुष्य जगत आहे. शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनाच केवळ महागाईची झळ बसते, असा समज सर्वांचाच दिसतो. मात्र, दिवस-रात्र काम करणारा साखर कामगार तुटपुंज्या पगारात आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत आहे. त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येण्यासाठी राज्य साखर संघाने पुढाकार घेण्याची मागणी रेटली जात आहे.देशात साखर उत्पादनात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून, येथे सहकारी साखर कारखान्यांचे जाळे पाहावयास मिळते. अलीकडील दहा-पंधरा वर्षांत सहकारी साखर कारखानदारी मोडीत निघण्यास सुरुवात झाली आहे. हे जरी खरे असले तरी पण अडचणीच्या काळातही सहकार टिकला पाहिजे म्हणून प्रसंगी स्वताच्या पोटाला चिमटा देऊन काम करणाऱ्या साखर कामगाराच्या जीवनात सुखाची पहाट कधी येणार का?२७ वर्षे सेवा आणि ३० हजार पगारबहुतांशी साखर कारखान्यांतील अकुशल कामगारांची पगाराची सुरुवात १० हजारांपासून होते. साधारणता पाच वर्षांनी वेतनवाढ दिली जाते, म्हणजे सरासरी ३० वर्षांची सेवा गृहीत धरली तर सहाच वेतनवाढीचा लाभ होतो. सरासरी १० टक्के वाढीने पगारात वाढ होते. अनेक ठिकाणी २७ वर्षे सेवा आणि पगार ३० हजार रुपये असे चित्र पाहावयास मिळते.

राजकारणाची टांगती तलवारसाखर कारखान्याचे अध्यक्ष, संचालक हे स्थानिक पातळीवरचे नेतेच असतात. अध्यक्ष, संचालकांचे उंबरठे झिजवल्यानंतर नोकरी मिळते. सुरुवातीची किमान दोन वर्षे आणि कमाल दहा वर्षे रोजंदारी म्हणून काम करावे लागते. हंगामी कायम त्यानंतर कायम व्हायचे झाले तर संचालकांच्या मर्जीनुसार वागावे लागते. नोकरी करताना कायमच राजकारणाची टांगती तलवार कामगाराच्या डोक्यावर असते.दोन-दोन वर्षे पगाराविना संसार उघड्यावरराज्यातील अनेक साखर कारखान्यांचे कामगार पगार थकीत आहेत. त्याला महाराष्ट्रातील एकही जिल्हा अपवाद नाही. काही ठिकाणी १६ ते २४ महिन्यांचे पगार थकीत असल्याने कामगारांचे संसार उघड्यावर पडले आहेत.