शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

'साखर कामगाराचे' आयुष्य कडवटच; दोन-दोन वर्षे पगाराविना संसार उघड्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 12:40 IST

डोक्यावर राजकारणाची टांगती तलवार

पन्हाळ्यावर उद्या, गुरुवारपासून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य साखर कामगारांचे शिबीर होत आहे. यामध्ये त्यांच्या प्रलंबित मागण्यांची केवळ चर्चा आणि आश्वासन देऊन समारोप होऊ नये, एवढीच अपेक्षा कामगारांची आहे. याबाबत ‘लोकमत’ने कामगारांच्या प्रश्नांचा घेतलेला आढावा...कोल्हापूर : प्रत्येकाच्या आयुष्यात साखरेच्या रुपाने गोडी निर्माण करणारा राज्यातील साखर कामगार मात्र स्वता कडू आयुष्य जगत आहे. शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनाच केवळ महागाईची झळ बसते, असा समज सर्वांचाच दिसतो. मात्र, दिवस-रात्र काम करणारा साखर कामगार तुटपुंज्या पगारात आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत आहे. त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येण्यासाठी राज्य साखर संघाने पुढाकार घेण्याची मागणी रेटली जात आहे.देशात साखर उत्पादनात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून, येथे सहकारी साखर कारखान्यांचे जाळे पाहावयास मिळते. अलीकडील दहा-पंधरा वर्षांत सहकारी साखर कारखानदारी मोडीत निघण्यास सुरुवात झाली आहे. हे जरी खरे असले तरी पण अडचणीच्या काळातही सहकार टिकला पाहिजे म्हणून प्रसंगी स्वताच्या पोटाला चिमटा देऊन काम करणाऱ्या साखर कामगाराच्या जीवनात सुखाची पहाट कधी येणार का?२७ वर्षे सेवा आणि ३० हजार पगारबहुतांशी साखर कारखान्यांतील अकुशल कामगारांची पगाराची सुरुवात १० हजारांपासून होते. साधारणता पाच वर्षांनी वेतनवाढ दिली जाते, म्हणजे सरासरी ३० वर्षांची सेवा गृहीत धरली तर सहाच वेतनवाढीचा लाभ होतो. सरासरी १० टक्के वाढीने पगारात वाढ होते. अनेक ठिकाणी २७ वर्षे सेवा आणि पगार ३० हजार रुपये असे चित्र पाहावयास मिळते.

राजकारणाची टांगती तलवारसाखर कारखान्याचे अध्यक्ष, संचालक हे स्थानिक पातळीवरचे नेतेच असतात. अध्यक्ष, संचालकांचे उंबरठे झिजवल्यानंतर नोकरी मिळते. सुरुवातीची किमान दोन वर्षे आणि कमाल दहा वर्षे रोजंदारी म्हणून काम करावे लागते. हंगामी कायम त्यानंतर कायम व्हायचे झाले तर संचालकांच्या मर्जीनुसार वागावे लागते. नोकरी करताना कायमच राजकारणाची टांगती तलवार कामगाराच्या डोक्यावर असते.दोन-दोन वर्षे पगाराविना संसार उघड्यावरराज्यातील अनेक साखर कारखान्यांचे कामगार पगार थकीत आहेत. त्याला महाराष्ट्रातील एकही जिल्हा अपवाद नाही. काही ठिकाणी १६ ते २४ महिन्यांचे पगार थकीत असल्याने कामगारांचे संसार उघड्यावर पडले आहेत.