शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 05:28 IST

राजकीय नेते राजकीय समिकरणे समोर ठेऊन औद्योगिक क्षेत्रात विकासकामांनाही विरोध करत असल्याची बाब राज्यात निदर्शनास येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/पिंपरी: राज्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्रांमध्ये राजकीय हस्तक्षेप, दादागिरी यामुळे अस्वस्थता आहे. राजकीय नेत्यांनी औद्योगिक परिसरात आपल्या टोळ्या पोसल्या असून त्या उद्योजकांना मोठ्या प्रमाणात त्रास देत असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे.

दुसरीकडे उद्योगांनी वारंवार अनेक मागण्या करूनही त्यातील एकही पूर्ण केली जात नसल्याचे चित्र असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या मुद्यावरील अस्वस्थता हिंजवडी आयटी पार्क (जि.पुणे) येथे पहाटे केलेल्या दौऱ्यात बघायला मिळाली. प्रशासन व राजकीय पदाधिकारी यांच्याकडून कायमच दुर्लक्षित राहिलेले हिंजवडी आयटी पार्क येथून अनेक कंपन्या स्थलांतरित होऊ लागल्याने आता राजकीय नकाशावर येऊ लागले आहे. तेथील उद्योजकांच्या तक्रारी, प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची मनमानी यावरून अस्वस्थ झालेले अजित पवार यांनी हिंजवडीच्या दौर्यात खडेबोल सुनावले. 

‘रस्त्याच्या कामात आडवे येणाऱ्यांना सरळ करा, जर अजित पवार आडवे आले तरी गुन्हा दाखल करा,’ असे त्यांनी प्रशासनाला बजावले. हिंजवडीत २५० कंपन्या आणि ४ लाख कामगार आहेत, आजूबाजूच्या परिसरातही आयटी कंपन्या वाढल्या आहेत. हिंजवडी इंडस्ट्रिज असोसिएशनकडून १७ मागण्यांचे पत्र सरकारला देण्यात आले पण काहीही झाले नाही. दररोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळून हिंजवडीतील ३७ कंपन्यांनी स्थलांतर केले आहे. राजकीय नेते राजकीय समिकरणे समोर ठेऊन औद्योगिक क्षेत्रात विकासकामांनाही विरोध करत असल्याची बाब हिंजवडी आणि राज्यात इतरत्रही निदर्शनास येत आहे.

आमचे कामगार घ्या, आम्ही सांगू त्यांनाच काम द्या

औद्योगिक वसाहतींच्या परिसरातील लहानमोठे नेते हे उद्योगांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. त्यांना राजकीय वरदहस्त असल्याने कोणी काही करू शकत नाही. नव्याने आलेल्या आणि आधीपासून असलेल्या कंपन्यांनीही आपल्याच एजन्सीमार्फत कामगार/नोकरभरती करावी इथपासून तर काही बांधकाम करायचे असेल तर कंत्राट आपण सांगू त्यालाच दिले पाहिजे असा दबाव कंपन्यांवर आणला जात आहे. मंत्रालयात थेट संबंध असलेले नेते वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्यांसाठी कोट्यवधी रुपये मागतात असेही चित्र आहे.

...अन् उपमुख्यमंत्री अजित पवार भडकले

अजित पवार यांनी  हिंजवडीत पाहणी करून आढावा घेताना हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना खडेबाेल सुनावले. जांभुळकर यांनी रस्ता रुंदीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर पवार म्हणाले, “धरणं करताना त्यात मंदिरं जातात की नाही? तुम्हाला जे सांगायचं ते सांगा. मी ऐकून घेतो. मला काय करायचं ते मी करतो. आपलं वाटोळं झालं! आयटी पार्क हिंजवडी, पुणे आणि महाराष्ट्रातून बाहेर बंगळुरू, हैदराबादला चाललंय. तुम्हाला काही पडलेलं नाही. मी बघतोय. कशाला मी सहा वाजता येतो? मला कळत नाही? विकासकामे करताना स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिकांना विश्वासात घेऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावा.”

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बंगळूरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबुल केले, पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार काय झोपा काढत होते काय? पवारांनी याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा. - हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस.

हा अनुभव अंबरनाथचा

अंबरनाथमध्ये एमआयडीसीने उद्योगांना प्लॉटवाटप केले आहे पण कंपनीची उभारणी करायची तर स्थानिक राजकारण्यांचा त्रास प्रचंड होतो. परिसरातील दोन्ही राजकीय गट उद्योजकांना वेठीस धरत आहेत. फाईन ऑरगॅनिक केमिकल कंपनीला दहा एकर जागा मंजूर झाली आहे पण स्थानिक गटबाजीमुळे त्यांना प्रकल्पाची उभारणीच करता येत नाही. - उमेश तायडे, अध्यक्ष, ॲडिशनील अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारITमाहिती तंत्रज्ञानPoliticsराजकारण