शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

जो न्याय दुसऱ्या राज्याला, तोच न्याय महाराष्ट्राला मिळावा! खासदार सुप्रिया सुळे यांची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 05:40 IST

राज्यातील काही भागांमध्ये हवा तेवढा पाऊस पडलेला नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: स्वातंत्र्य दिनानिमित्त शरद पवार गटातर्फे मुंबईतील प्रदेश कार्यालयात ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या सर्व महापुरुषांना वंदन करून राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रध्वज फडकवला. आजचा दिवस साजरा करताना जो न्याय दुसऱ्या राज्याला तोच न्याय महाराष्ट्राला मिळावा, अशी अपेक्षा यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

या वर्षी महाराष्ट्रात मागील वर्षाच्या तुलनेत चांगला पाऊस झाला आहे. परंतु, राज्यातील काही भागांमध्ये हवा तेवढा पाऊस पडलेला नाही. ज्या भागामध्ये पाऊस कमी पडला त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या प्राण्याचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी तसेच भ्रष्टाचाराचे आव्हान राज्य आणि देशासमोर आहे, असे सुळे म्हणाल्या.

आपल्यासमोरदेखील वर्षापूर्वी एक संघर्ष आला होता. आपण मागील स्वातंत्र्य दिनी इथे होतो तेव्हा ना पक्ष होता, ना चिन्ह होते. तुम्ही सर्व पवार साहेबांच्या सोबत आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारासोबत उभे राहिला. तुमचे सर्वांचे कितीही कौतुक केले आणि आभार मानले तरी कमीच आहेत.

गेल्या वर्षापासून आपण संघर्ष करीत आहोत. आणि शेवटी सत्याचाच विजय होतो. त्यासाठी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे आभार मानले पाहिजेत. पक्ष, चिन्ह नसताना महाविकास आघाडीचे ३३ खासदार जनतेने निवडून दिले आहेत. महाराष्ट्राने आपल्याला यश दिले; पण, या यशाबरोबर आपल्याला प्रचंड जबाबदारी दिलेली आहे. प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचे पालन करावे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनSupriya Suleसुप्रिया सुळे