शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 12:04 IST

Narayan Rane : जग इकडचे तिकडे झालं तरी शरद पवार यांना काहीही होत नाही ते बिनधास्त असतात असं विधान नारायण राणे यांनी केलं आहे.

Narayan Rane on Sharad Pawar : पुण्यातल्या  सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र एका भटकत्या आत्म्याचा शिकार झाले आहे. त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे अशी टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांनी ही टीका शरद पवार यांच्यावर त्यांचा नामोल्लेख टाळत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शरद पवार गटाने देखील मोदींनी शरद पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणणे पटते का असा सवाल केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी हो, मी शेतकरी आणि कामगारांसाठी अस्वस्थ आहे, असं म्हटलं होतं. या अतृप्त आत्माच्या वादात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे.

मोदींचे वाक्य काही जणांना लागलं - नारायण राणे 

शरद पवार एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर ८४ वर्षे जगले नसते, असं विधान नारायण राणे यांनी केलं आहे. एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं. " पंतप्रधान मोदी एक वाक्य बोलले इस महाराष्ट्र में अस्वस्थ नेताजन है, खाली भटक रहा है उनका आत्मा', हे मोदीजींचं वाक्य. काही जणांना लागलं. मोदींनी तर नाव घेतलं नाही. त्यानंतर एक व्यक्ती असं म्हणाले की, 'महागाईसाठी लोक त्रस्त आहे. महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी अस्वस्थ आहे. पवार साहेब कधीपासून हो?" असा सवाल नारायण राणे यांनी विचारला.

"कशामुळे अस्वस्थ? एवढी जनतेची आस्था प्रेम आहे. किती वर्षे सत्तेवर होतात. केंद्रात १२ वर्षे मंत्री होतात. मोदींनी सांगितलं भारताला महासत्ता बनवेन. देशाला तिसऱ्या क्रमांकावर आणेन. मोदी कर्तबगारी सिद्ध करताहेत. अमेरिका, इटली, इस्रायल अशा भल्याभल्या देशाच्या अध्यक्षांनी मोदींचं कौतुक केलं. प्रशासन हाताळण्याची त्यांची क्षमता. कर्तृत्वान पुरुष म्हणून देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारे आहेत," असेही नारायण राणे म्हणाले.

शरद पवार बिंनधास्त असतात

"शरद पवार आयुष्यात एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर ८४ वर्षे जगले नसते. माणसाला आजकाल हवामानामुळे अस्वस्थ झाल्यावर ५०-५५ वर्षात अटॅक येतो. माणसं जातात. वादळ येवो, पूर येवो, जग इकडचे तिकडे होवो  ८४ व्या वर्षात शरद पवार यांना काही होत नाही. बिनधास्त असतात. मोदी साहेबांना उकसवतात. तुमचं सरकार गेल्याशिवाय माझी अस्वस्थता जात नाही. आमचं सरकार जाणार नाही. ४०० खासदार निवडूण येवून मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार," असं नारायण राणे म्हणाले. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narayan Raneनारायण राणे Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाSharad Pawarशरद पवारratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग