शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Maharashtra Political Crisis: आम्हाला गद्दार म्हणू नका, उद्या विरोधात मतदान केले तर...; केसरकर संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 13:50 IST

Eknath Shinde Revolt: सत्तेत बहुमत गमावलंय तरी काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा काढला नाही. विश्वासदर्शक ठराव सरकारने मांडावा आम्ही मतदान करू असं आव्हान केसरकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला दिलंय.

गुवाहाटी -  उद्या आम्हाला मतदान करायला लागलं तर उद्धव ठाकरेंच्या विरोधात मतदान केले हे बोलू नका. आम्हाला गद्दार एकाही शिवसैनिकांनी म्हणू नये. कितीवेळा आम्ही आवाहन करणार आहोत. आजचा शेवटचा दिवस आहे. युवासेनेची ताकद लोकांच्या मागे वाहन लावण्यासाठी करू नये. राजकारणात सत्ता येते आणि जाते. समविचारी पक्षासोबत राहा. उद्या आवाहन करायला मी नसेन. शिंदे गट जो निर्णय घेईल त्याच्यासोबत जावं लागेल असा इशारा शिंदे गटाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे. 

दीपक केसरकर म्हणाले की, सत्तेत बहुमत गमावलंय तरी काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा काढला नाही. विश्वासदर्शक ठराव सरकारने मांडावा आम्ही मतदान करू. महाराष्ट्रात लोकशाही आहे. त्याला थोर परंपरा आहे. रस्त्यावर येण्याची भाषा राऊत करतात. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा. आम्ही त्यांच्यावर हक्कभंग आणू शकतो. जेलमध्ये पाठवू शकतो. आधी राजीनामा द्या मग बोला. राऊत जी भाषा बोलतायेत त्यामुळे ५० आमदार संतप्त झालेत अशी माहिती केसरकरांनी दिली. 

आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाहीप्रेतांची मते घेऊन निवडून आलात तर राजीनामा द्या, संजय राऊतांना बोलायचा नैतिक अधिकार नाही. गद्दार हा आमचा शब्द आमच्या वाणीवर येणार नाही. राऊतांनी काय काय केले हे लेखी दिले आहे. राऊतांमुळेच शिवसेना-भाजपा यांच्यात दुरावा निर्माण झाला. असा प्रवक्ता कुठल्याही पक्षाला मिळू नये. बाळासाहेबांना अपेक्षित विजय कोकणात मिळाला. आपल्याच माणसांना जबरदस्तीने बाहेर पाठवतायेत आणि त्यांना गद्दारीचा शिक्का मारताय. एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटनेसाठी झटकले. मुख्यमंत्रिपद विचारलं तरी घेतलं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीला ते कंटाळले. मला जे काही वाटले ते उघडपणे बोललो. ५० आमदारांच्या भावना आम्ही व्यक्त केला. माझ्या मतदारसंघात मी २ हजार रस्त्यावर उतरवलो शकतो. १५० जणांचे आंदोलन करता असंही त्यांनी सांगितले आहे. 

BJP सोबत युतीचा निर्णय आजच घ्या, शेवट गोड करा; शिंदे गटाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम

उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींशी बोलावंआमचा संयम सुटत चालला आहे. दिल्लीतील भाजपा नेत्यांशी उद्धव ठाकरेंनी बोलावी. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने व्हावेत अशी इच्छा आहे. कुठेतरी भाजपा-शिवसेनेचं वितुष्ट संपवावं, शेवट गोड व्हावा. भाजपाचे प्रमुख मोदीजी तुम्हाला लहान भाऊ मानतात. तुम्ही थेट त्यांच्याशी बोला असं आवाहन केसरकरांनी केले आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे