शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

मुंबईचा पारा ३५ अंशावर! राज्यात १७ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 06:26 IST

मुंबईचे किमान तापमान किंचित खाली आले असले तरीदेखील कमाल तापमान ३५ अंश नोंदवण्यात येत असल्याने मुंबईकरांना घाम फुटत आहे.

मुंबई : राज्यात एकीकडे थंडीचा मारा सुरू असून, दुसरीकडे मात्र निर्माण होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र यात पावसाची भर घालत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, १७ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश ठिकाणांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबईचे किमान तापमान किंचित खाली आले असले तरीदेखील कमाल तापमान ३५ अंश नोंदवण्यात येत असल्याने मुंबईकरांना घाम फुटत आहे.हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी १४, १५, १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. तुरळक ठिकाणी  पावसाची शक्यता आहे. विदर्भात १५, १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी हवामान कोरडे राहील. विदर्भात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १४.२ अंश नोंद झाले असून, राज्यातील बहुतांशी शहरांतील किमान तापमानाचा पारा खाली-वर होत आहे. यात प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शहरांचा समावेश आहे. दुसरीकडे मुंबईचे किमान तापमान किंचित खाली आली तरी दुपारच्या कमाल तापमानाने मुंबईकरांचा जीव काढला.