शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

सुखद चित्र : महाराष्ट्रात आवाज सलोख्याचा!, राजकारणाकडे नागरिकांनी केले दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 06:07 IST

पोलिसांना करावा लागला नाही बळाचा वापर  

मुंबई : भोंग्याविरोधातील आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक एकोप्याचे सुखद चित्र पुन्हा एकदा पहायला मिळाले. राजनीतीकडे दुर्लक्ष करीत सर्वसामान्य नागरिकांनी शांततेच्या मार्गाने जाणेच पसंत करीत महाराष्ट्रात आवाज सलोख्याचाच आहे, यावर मोहोर उठविली. 

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र विशेषत प्रार्थनास्थळांसमोर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. तथापि बहुतांश मस्जिदींमध्ये पहाटेची अजानची मुळी भोंग्याविना पार पडली. तसेच अनेक ठिकाणांवरील भोंग्यांचा आवाज आपणहून कमी केल्याचे दिसून आले. त्यामुळे कोणाचाच आवाज बंद करण्यासाठी पोलिसांना  कुठेही बळाचा वापर करावा लागला नाही. 

मनसे कार्यकर्त्यांना रात्री प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्यानंतर पोलिसांनी सकाळी खबरदारी म्हणून काही स्थानिक नेतेमंडळींना ताब्यात घेतले. अनेक शहरांमध्ये पोलिसांनी सर्वधर्मिय बैठका घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले होते. त्याचाही चांगला फायदा झाल्याचे दिसून आले.

शिर्डी व शनिशिंगणापुरातही आरतीचा भोंगा बंदअहमदनगर शहरातील मशिदींतून एकही अजान ध्वनिक्षेपकावर दिली गेली नाही. शिर्डी व शनिशिंगणापुरातही आरती ध्वनिक्षेपकावर झाली नाही. 

न्यायालय काय करते तेही पाहायचे आहेसर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले असतानाही भोंगे कसे काय वाजतात, असा प्रश्न करतानाच न्यायालयाच्या निर्णयाचा अशा पद्धतीने अवमान केला जातो. यावर न्यायालय काय करते, हे मला पाहायचे आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

औरंगाबादेत सामाजिक एकोप्याची आरतीशहरातील संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेलीपुरा भागात बुधवारी हिंदू-मुस्लीम व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ‘वरद हस्ताय’ गणपती मंदिरात आरती केली. रमजान ईदनिमित्त एकमेकांना मिठाई भरवली. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRaj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारण