शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

"फडणवीसांनी दिल्लीची दिशाभूल केली अन् मोदींना तोंडावर पाडलं": पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 16:52 IST

देवेंद्र फडणवीसांच्या खोट्या आत्मविश्वासामुळं नरेंद्र मोदी तोंडघशी पडले, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Prithviraj Chavan on Devendra Fadnvais : लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपच्या मोठ्या पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळं करण्याची विनंती केंद्रीय नेतृ्त्वाकडे केली आहे. २८ जागांवर निवडणूक लढणाऱ्या भाजपला केवळ नऊ जागांवर यश मिळवलं. पत्रकार परिषदेत आम्ही कमी पडलो असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.तसेच पक्षनेतृत्वानं मला सरकारमधून मोकळं करावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजपच्या पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी केली आहे. यावर आता काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या खोट्या आत्मविश्वासामुळं नरेंद्र मोदी तोंडघशी पडले, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर बोलताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारली ते योग्यच केलं असं म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली नेतृत्वाची दिशाभूल केल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. 

"महाराष्ट्रात भाजपचा जो दारुण पराभव झाला त्याची कोणीतरी जबाबदारी घेणे आवश्यक होते. ती देवेंद्र फडणवीसांनी घेतली. कारण दिल्लीच्या नेतृत्वासमोर त्यांनी ४५ पेक्षा अधिक जागा मिळवणार असल्याचे चित्र निर्माण केले होते. देवेंद्र फडणवीसांनी जो आकडा दिला तो गृहीत धरुन मोदींनी ४०० पारची घोषणा केली. त्यानंतर मोदी तोंडघशी पडली. कोणीतरी त्याची जबाबदारी घ्यावी लागेल. विधानसभेसाठी हा प्रयत्न आहे. पण त्यांचा राजीनामा स्विकारला जातो की नाही हे पाहावं लागेल. सकृतदर्शनी देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या नेतृत्वाची दिशाभूल केली त्याची जबाबदारी त्यांना स्विकारावी लागेल. त्यामुळे भाजपचा ग्राउंड रिॲलिटी टच संपलेला आहे. त्यांनी पक्ष फोडाफोडीचे राजकारण केलं आणि त्याला मोदींचा थेट आशीर्वाद मिळवला.  काहीतरी चुकल्याची त्यांना जाणीव झाली हे बरं झालं," असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

"कितीही गणितं मांडली तरी आमच्या जागा कमी आल्या आहेत हे वास्तव मान्य करावं लागेल. या निवडणुकीचं नेतृत्व भाजपाकडून मी करत होतो. त्यामुळे ज्या काही जागा कमी आल्या असतील, त्याची जबाबदारी माझी आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यासोबत  मी भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी," असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल