शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 : भाजपा नेत्यांकडून जातीय आणि विषारी प्रचार - राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 13:04 IST

वंचित बहुजन आघाडीमुळे पराभवाला सामोरे जावे लागल्याचेही राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा नेत्यांकडून जातीय आणि विषारी प्रचार करण्यात आल्याची टीका करत संसदेत खासदार असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झगडत होते. यापुढेही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत राहणार, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली. 

शुक्रवारी राजू शेट्टी एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला शेतकऱ्यांशी देणं-घेणं नसल्यामुळे विरोध होता. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारची साथ सोडल्याचा पश्चाताप होत नाही. संसदेत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झगडत होते. यापुढेही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत राहणार आहे, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीमुळे पराभवाला सामोरे जावे लागल्याचेही राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीमुळे राज्यात 8 ते 9 ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला  फटका बसला. तसेच, यंदाच्या निवडणुकीत भाजपा नेत्यांकडून भाजपा नेत्यांकडून जातीय आणि विषारी प्रचार करण्यात आल्याची टीकाही राजू शेट्टी यांनी केली. 

दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने ‘जायंट किलर’ ठरले आहेत. धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा 96 हजार 39च्या मताधिक्याने पराभव केला. या निवडणुकीत धैर्यशील माने यांना 585776 मते पडली तर राजू शेट्टी यांना 489737 मते पडली. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019