शहरं
Join us  
Trending Stories
1
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
4
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
5
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
6
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
8
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
9
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
10
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
11
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
12
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
13
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
14
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
15
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
16
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
17
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
18
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
19
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
20
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?

'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 18:46 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: मला मुख्यमंत्रिपद दिलं असतं तर पक्ष फुटला असता, असं शरद पवार (Sharad Pawar) का म्हणाले हे मला माहीत नाही, असे  छगन भुजबळ म्हणाले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मी शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये राहिलो असतो तर तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो, असा दावा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी एका मुलाखतीत केलेल्या काही दाव्यांमुळे आज राज्यातील राजकारणात चर्चांना उधाण आले होते. त्यात मी छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केलं असतं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असती, असा दावाही शरद पवार यांनी केला होता. त्यानंतर याबाबत प्रतिक्रिया देताना मला मुख्यमंत्रिपद दिलं असतं तर पक्ष फुटला असता, असं ते का म्हणाले हे मला माहीत नाही, असे  छगन भुजबळ  म्हणाले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मी शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये राहिलो असतो तर तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

छगन भुजबळ दिवसभर सुरू असलेल्या चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मी शिवसेना सोडली नसती तरी मुख्यमंत्री झालो असतो, काँग्रेस सोडली नसती तरी मुख्यमंत्री झालो असतो. १९९९ मध्ये काँग्रेसचे अनेक मोठे नेते मी पक्ष सोडू नये, असा आग्रह करत होते. दोन महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तुम्हालाच मुख्यमंत्री जाहीर करतो, असे सांगत होते. मात्र मी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्याचा प्रदेशाध्यक्ष झालो. त्यावेळी पक्षाच्या जिल्हा संघटना तयार झाल्या नव्हत्या. तरीही आम्ही उमेदवार दिले. तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच वेगवेगळे निवडणूक लढवत होते. तर शिवसेना आणि भाजपा एकत्र निवडणूक लढवत होते. त्या निवडणुकीचा निकाल त्रिशंकू लागला. त्यावेळी असं लक्षात आलं की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर सरकार स्थापन होईल. त्यानंतर आम्ही ते आघाडीचं सरकार स्थापन केलं. त्यावेळी काँग्रेसचे आमदार जास्त होते. त्यामुळे विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले. तर मी उपमुख्यमंत्री झालो. 

दरम्यान, २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता पण पक्ष नेतृत्वाने ते पद काँग्रेसला दिले, असा आरोप अजित पवार यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, " २००४ मध्ये मुख्यमंत्रि‍पदाबाबत निर्णय फार विचारपूर्वक घेण्यात आला होता. तेव्हा अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविण्याचा प्रश्न नव्हता. कारण ते फारच नवखे होते. मुख्यमंत्रि‍पदासाठी कोणी योग्य नेता आमच्याकडे नव्हता. तेव्हा छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिले असते तर भविष्यात पक्षात फूट पडली असती.त्यामुळे अधिकची मंत्रि‍पदे आणि खाती मिळवून मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे कायम ठेवण्याचा निर्णयावर आम्ही आलो," असं शरद पवार म्हणाले होते. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Chhagan Bhujbalछगन भुजबळSharad Pawarशरद पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४