शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

उमेदवारी उशिरा जाहीर होणे भोवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 11:17 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: १५ जागांवर उमेदवार उभे केले, त्यापैकी सात जागांवर आमचा विजय झाला. त्या तुलनेत आमची कामगिरी चांगली राहिली. नवीन राजकीय समीकरणे होती. या सगळ्या परिस्थितीत कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली. मात्र, या सगळ्या निवडणुकीच्या काळात आमच्या उमेदवारांची उमेदवारी उशिरा घोषित होणे याचा आम्हाला जोरदार फटका बसल्याचे दिसून येत आहे.

- डॉ. मनीषा कायंदे(प्रवक्त्या, शिंदेसेना ) 

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून विरोधक आमच्यावर टीका करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सात ते आठ जागांवर बोळवण केली जाईल, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, मुख्यमंत्री त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी १५ जागांवर उमेदवार उभे केले, त्यापैकी सात जागांवर आमचा विजय झाला. त्या तुलनेत आमची कामगिरी चांगली राहिली. नवीन राजकीय समीकरणे होती. या सगळ्या परिस्थितीत कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली. मात्र, या सगळ्या निवडणुकीच्या काळात आमच्या उमेदवारांची उमेदवारी उशिरा घोषित होणे याचा आम्हाला जोरदार फटका बसल्याचे दिसून येत आहे.

निवडणूक अर्ज भरण्याच्या काही दिवस अगोदर आमच्याकडे उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे प्रचारासाठी खूप कमी वेळ उमेदवारांना मिळाला. विरोधकांनी त्यांचे उमेदवार महिनाभर आधीच जाहीर केले होते. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी चांगला वेळ मिळाला. ज्याठिकाणी आमच्या जागा आहेत, त्याठिकाणी सहकारी पक्ष त्या जागेची मागणी करत राहिले आणि तो तिढा सोडविण्यात वेळ गेला. या गोष्टींचा उमेदवार निवडीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी आमच्या विद्यमान उमेदवारांबाबत नकारात्मक सर्वेक्षण असल्याचे सांगून आयत्यावेळी उमेदवार बदलायला लावले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आम्हाला त्रास झाला. हे सर्वेक्षण कोणी केले, कुठून केले, याबाबत मला काही माहीत नाही. मात्र या कारणांमुळेही अनेक ठिकाणी आमचे उमेदवार पराभूत झाल्याचे दिसून आले आहे. जर पालघर, यवतमाळ, वाशिम याठिकाणी आमचे उमेदवार दिले असते तर आजचा निकाल वेगळा दिसला असता.

     उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला किती मराठी मते मिळाली, याचा शोध घेणे गरजेचे आहे.      ठाकरे यांच्या पक्षाला अल्पसंख्याक समाजाची मते अधिक प्रमाणात मिळाली.      संविधान बदलणार हे चुकीच्या पद्धतीने ‘नॅरेटिव्ह’ विरोधकांनी जनमानसात तयार केले. त्याचाही फटका आम्हाला बसला.      सहकारी पक्ष म्हणून भाजपची चांगली साथ मिळाली. अजित पवार गटाचा किती फायदा झाला, हे तपासावे लागेल.     मुख्यमंत्र्यांनी सहकारी पक्षाचे सर्व उमेदवार निवडून यावेत, यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली होती.     लोकसभा निकालाचा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. 

सजग राहावे लागेलज्या चुका लोकसभा निवडणुकीत झाल्या त्या टाळायच्या असतील तर नवीन रणनीती आखावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. तसेच पुन्हा अधिक जोमाने मेहनत करण्याची गरज आहे. विधानसभा निवडणूक नजीकच आहे. या पार्श्वभूमीवर सजग राहून कष्ट घेऊ. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shiv Senaशिवसेना