शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
3
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
4
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
5
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
6
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
7
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
8
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
9
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
10
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
11
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
12
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
13
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
14
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
15
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
16
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
17
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
18
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
19
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
20
शशी थरूर यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपचा ऐतिहासिक विजय; काँग्रेस खासदार म्हणाले, "हेच लोकशाहीचं सौंदर्य"
Daily Top 2Weekly Top 5

असाही एक राजीनामा : सभागृहात एकच दिवस गेलेल्या चंद्रपूरच्या खासदाराची गोष्ट!

By राजेश मडावी | Updated: April 2, 2024 11:11 IST

Maharashtra Lok sabha Election 2024: १९६२च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले तत्कालीन चांदा (चंद्रपूर)चे अपक्ष दिवंगत खासदार लाल श्याम शाह हे फक्त एकच दिवस सभागृहात गेले आणि राजीनामा दिला. कोण होते लाल श्याम शाह, त्यांनी राजीनामा कशासाठी दिला, त्याची तशीच प्रेरक कहाणी आहे. 

- राजेश मडावी चंद्रपूर - काहीही करून सत्तेला चिकटून राहणारे, कोलांटउड्या मारत नैतिकतेचा आव आणणारे नेते आज खूप वाढले. अशा अस्वस्थ वर्तमानात १९६२च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले तत्कालीन चांदा (चंद्रपूर)चे अपक्ष दिवंगत खासदार लाल श्याम शाह हे फक्त एकच दिवस सभागृहात गेले आणि राजीनामा दिला. कोण होते लाल श्याम शाह, त्यांनी राजीनामा कशासाठी दिला, त्याची तशीच प्रेरक कहाणी आहे. 

कोण होते लाल श्याम शाह?- १ मे १९१९ रोजी तत्कालीन मध्य प्रदेशात लाल श्याम शाह यांचा जन्म झाला. ते चांदा (चंद्रपूर) क्षेत्रातील पानाबरसचे जमीनदार व चौकी विधानसभा क्षेत्राचे आमदार होते. जानेवारी १९५६ला त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. - शाह यांनी १९५७ मध्ये चांदा लोकसभा निवडणूक लढविली. परंतु, काँग्रेसचे ॲड. व्ही. एन. स्वामी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. - १९६२च्या निवडणुकीत ॲड. स्वामींचा पराभव करून ते  खासदार झाले. ५ सप्टेंबर १९६२ला त्यांनी खासदार म्हणून शपथ घेतली व एप्रिल १९६४ला त्यांनी राजीनामा दिला. - दिल्लीचे ज्येष्ठ संपादक व अभ्यासक सुदीप ठाकूर यांनी लिहिलेले लाल श्याम शाह यांचे हिंदी चरित्र २०१८ मध्ये प्रकाशित झाले आणि त्यांच्या राजीनाम्याचे ऐतिहासिक कारण अभ्यासकांसमोर आले.  

राजीनामा देण्याचे कारण काय?  लाल श्याम शाह हे जल, जंगल व जमिनीच्या लढाईचे शिलेदार होते. सीमांकन होऊन चांदा मतदारसंघ मध्य प्रदेशातून मुंबई राज्यात आला. १९६२ मध्ये ते चांद्यातून खासदार झाले. त्याचवेळी पूर्व पाकिस्तानातून बांगला निर्वासितांना दंडकारण्यात आणण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली.स्थानिक आदिवासींचे प्रश्न अत्यंत बिकट असताना केंद्र सरकार दंडकारण्यावर नवी आपत्ती का लादत आहे, असा लाल श्याम शाह यांचा सवाल होता. अखेर प्रचंड अस्वस्थ झालेल्या शाह यांनी लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष सरदार हुकूमसिंग यांनाचांदा येथील धर्मराव बंगल्यातून राजीनामा लिहिला. लोकसभा अध्यक्ष सरदार हुकूमसिंग यांनी २४ एप्रिल १९६४ला राजीनामा मंजूर केला. हा राजीनामा सुदीप ठाकूर लिखित चरित्रग्रंथात उपलब्ध आहे.  

राजीनाम्यात काय म्हटले?‘मी सरकारला कोणतीही गोष्ट करण्यासाठी भाग पाडू शकत नाही; पण या सगळ्या बाबींवर नव्या पद्धतीने विचार करण्याची विनंती करू शकतो. यासाठी माझा हा राजीनामा आहे.’

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४chandrapur-pcचंद्रपूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४