शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

'या' 5 क्षेत्रांमध्ये राज्याची पिछाडी; मात्र उद्धव सरकारच्या CMPमध्ये उल्लेख नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 13:47 IST

राज्यासमोर अनेक महत्त्वाच्या समस्या

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याआधी महाराष्ट्र विकास आघाडीनं राज्याच्या विकासासाठी किमान समान कार्यक्रम जाहीर केला. शेती, रोजगार, आरोग्य, उद्योग, सामाजिक न्याय, शिक्षण आणि ग्रामविकासाला प्राधान्य देणार असल्याचं महाविकासआघाडीनं किमान समान कार्यक्रमातून स्पष्ट केलं. मात्र राज्याच्या पाच महत्त्वाच्या समस्यांचा यामध्ये उल्लेख नाही. 1. अनियंत्रित लोकसंख्या, बकाल शहरं- महाराष्ट्रात देशभरातून स्थलांतरित होणाऱ्यांचं प्रमाण अतिशय जास्त आहे. रोजगार, शिक्षणासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण मुंबईत येतात. उज्ज्वल भविष्यासाठी येणारी हजारो कुटुंब झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. मुंबई, ठाण्यात तर मोठ्या प्रमाणात बांगलादेशी वास्तव्यास आहेत. राज्यातील कित्येक शहरं यामुळे बकाल झाली आहेत. लोकसंख्या वाढीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. 2. नैसर्गिक स्त्रोतांची कमतरता- राज्यात पाण्याची समस्या खूप मोठी आहे. गेल्या दशकभरात समस्येची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये दुष्काळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. 3. शहरीकरणामुळे वनांवर कुऱ्हाड- पश्चिम घाटाला जागतिक वारशाचा दर्जा आहे. मात्र शहरीकरणामुळे पश्चिम घाटातील अनेक भागांमध्ये झाडांवर कुऱ्हाड चालवली जात आहे. कोकणातही मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल सुरू आहे. या भागातील पर्यटन वाढत असलं तरी निसर्गाची हानी होत आहे. 4. वाढतं प्रदूषण- लोकसंख्या वाढत असल्यानं प्रदूषणाची समस्यादेखील उग्र स्वरुप धारण करत आहे. कचऱ्याची समस्या दिवसागणिक भीषण होत आहे. कचऱ्याच्या चुकलेल्या व्यवस्थापनामुळे अनेकदा मुंबई पाण्याखाली जाते. मुंबईच्या किनाऱ्यांवरदेखील अनेकदा कचऱ्याचे ढिग दिसतात. 5. छोट्या शहरांचा विकास- मुंबई, नाशिक, पुणे हा सुवर्ण त्रिकोण मानला जातो. मात्र या राज्यांवरील भार कमी करण्यासाठी आणि भौगोलिक समतोल राखण्यासाठी नागपूर, सांगली, कोल्हापूर, अमरावती, सोलापूरसारख्या शहरांचा अधिक विकास करणं गरजेचं आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना