शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

मुंबईसह महाराष्ट्र गारठला; शुक्रवारपर्यंत थंडीचा जोर राहणार; उत्तरेकडील बर्फवृष्टीचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 08:23 IST

मुंबई महानगरात किमान तापमान १२ ते १४ राहील. त्यानंतर यात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : थंडीमुळे पुन्हा एकदा मुंबईसहमहाराष्ट्र गारठला आहे. राज्यातील अनेक शहरांचे किमान तापमान १३ तर मुंबई महानगर प्रदेशाचे तापमान १४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले आहे. शुक्रवारपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार असून, शुक्रवारनंतर मात्र तापमानात वाढ होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली.

उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे मुंबईसह राज्यभरातील गारठ्यात वाढ झाली आहे. शुक्रवारपर्यंत गारठा राहील. मुंबई महानगरात किमान तापमान १२ ते १४ राहील. त्यानंतर यात हळूहळू वाढ होईल, असे हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेश (स्त्रोत - वेगरिज ऑफ दी वेदर)

  • मुंबई    १५.२
  • ठाणे    १६.३ 
  • नवी मुंबई    १६.५
  • पनवेल    १५.७ 
  • कल्याण    १५.५ 
  • डोंबिवली    १५.७ 
  • उल्हासनगर    १५.१ 
  • तलासरी    १२.५ 
  • बदलापूर    १३.७ 
  • कर्जत    १३.९ 
  • अंबरनाथ    १४.९ 

राज्य (स्त्रोत - हवामान विभाग)

  • जळगाव    ८.८ 
  • धाराशिव    १२ 
  • नाशिक    १२.२ 
  • अहिल्यानगर    १२.४ 
  • परभणी    १३.५ 
  • सांगली    १३.६ 
  • सातारा    १३.९ 
  • मालेगाव    १३.६ 
  • महाबळेश्वर    १४ 
  • अलिबाग    १४.९ 
  • छ. संभाजीनगर    १५

मुंबईसह कोकणात मंगळवारी पहाटेचे किमान तापमान सरासरीच्या खाली होते. मुंबईत किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २ अंशाने कमी म्हणजे १५.२ इतके होते. शुक्रवारपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण व  महाराष्ट्रात थंडी जाणवेल. ११ जानेवारीपासून पुन्हा थंडीचा प्रभाव काहीसा कमी होईल. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात कदाचित काहीसे ढगाळ वातावरण राहील.

- माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई