शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

... म्हणून आपल्याला शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊनचा विचार करावा लागतोय : राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 15:03 IST

Maharashtra Lockdown : राज्यांनी लॉकडाऊन टाळावा आणि तो शेवटचा पर्याय असायला हवा, असं पंतप्रधान देशवासीयांना संबोधित करताना म्हणाले होते.

ठळक मुद्देराज्यांनी लॉकडाऊन टाळावा आणि तो शेवटचा पर्याय असायला हवा, असं पंतप्रधान देशवासीयांना संबोधित करताना म्हणाले होते.राज्यात आणखी कठोर निर्बंध लावण्यात येणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागू करण्याच्या दिशेने हालचाली सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना संसर्गाचे मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करून कोरोनाशी लढूया, असं सांगत राज्यांना हे करीत असताना राज्यांनी लॉकडाऊन टाळावेत, तो शेवटचा पर्याय असायला हवा, असं आवाहन केलं होतं. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केलं. "पंतप्रधानांनी हेच सांगितलं की राज्यांसाठी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असायला हवा. आज महाराष्ट्रात जर दररोज कोरोनाबाधितांची संख्या ७० हजारांपर्यंत जात असेल तर तो शेवटचा पर्याय म्हणून नक्कीच आपल्याला विचार करावा लागतोय. मंत्रिमंडळातील सर्व नेत्यांना तसंच सर्व समाजघटकांना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं होतं. बऱ्यापैकी गोष्टी आपण ब्रेक द चेनच्या माध्यमातून घालण्यात आलेल्या निर्बंधांद्वारे बंद केल्या आहेत," असं राजेश टोपे म्हणाले. त्यांनी टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान यावर भाष्य केलं. ब्रेक द चेन अंतर्गत घालण्यात आलेल्या निर्बंधांत आणखी निर्बंध वाढवले जातील आणि ती आजच्या काळाची गरज असल्याचंही टोपे म्हणाले. जिथे मिळेल तिथून लस आणून लसीकरण करणार"जगात नेहमीच या गोष्टी यशस्वी ठरल्या आहेत. ब्रिटनमध्ये कालच्या तारखेत केवल दोन मृत्यू झाले. याचं कारण म्हणजे त्यांनी तीन महिने लॉकडाऊन ठेवला आणि  देशातील ६० टक्के लोकांचं लसीकरण करून घेतलं असं उदाहरण मी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही दिलं. हर्ड इम्युनिटी त्यांच्यात आली आहे. तसंच त्यामुळे मृत्यूचं प्रमाणही नगण्य आहे. आपल्यालाही तिच स्ट्रॅटजी अवलंबावी लागेल. पुढील १५ दिवसांत कडक लॉकडाऊन करायचा आणि मोठ्या प्रमाणात लसीकरण करायचं," असंही ते म्हणाले. ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांचं लसीकरण केंद्रच करणार आहे. लसीकरणासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याचं आणि पुढे आणण्याचं काम आपण करू. १८ ते ४५ वर्षा वयोगटातील नागरिकांसाठी केंद्रानं लसीकरणाची जी जबाबदारी राज्य सरकारांवर सोपवली आहे त्याचंदेखील आव्हान आपण स्वीकारू. देशात किंवा देशाच्या बाहेर जिथून मिळेल तिथून लस घेऊन आपण लसीकरण करून. त्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही टोपे म्हणाले.आणखी काय म्हणाले होते मोदी?"कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा आताची लाट खूप मोठी आहे. परंतु आरोग्य यंत्रणा, योग्य योजना, पुरेसा औषध पुरवठा आणि लस याद्वारे आपण या संकटावर मात करूया. लोकांचे साहस, शिस्त आणि त्यांचे प्रयत्न याद्वारे आपण कोरोनाविरोधात लढूया. देशात ऑक्सिजन उत्पादन आणि सर्वांना पुरवठा यासाठी सर्वतोपरी आपण सर्व प्रकारे प्रयत्न करू," असंही मोदी आपल्या संबोधनादरम्यान म्हणाले होते.   

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसEnglandइंग्लंड