शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

चिंताजनक! बलात्कारानंतर महिलांच्या हत्येचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 06:47 IST

९४ टक्के खटले प्रलंबित; आत्महत्येस प्रवृत्त करण्याचेही मोठे प्रमाण

- मनीषा म्हात्रेमुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामुहिक बलात्कारानंतर हत्येच्या घटनेने देश हादरला आहे. अशात उत्तरप्रदेशच नाही तर गेल्या वर्षभरात बलात्कार, सामुहिक बलात्कारानंतर २८६ महिलांची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक ४७ घटनांची नोंद आहे. त्याखालोखाल उत्तरप्रदेश आणि राजस्थानचा क्रमांक लागत असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने(एनसीआरबी) जारी केलेल्या अहवालातून समोर आली आहे. विविध कारणांसाठी अपहरण, विनयभंग, हुंड्यासाठी छळ या गुन्ह्यांमध्येही राज्य तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर  आहे. तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न गंभीर असताना राज्यात  दोन लाख सात हजार (९४ टक्के) खटले प्रलंबित आहेत. राज्यातील न्यायालयांनी वर्षभरात सुमारे १३ हजार खटले निकाली काढले असून त्यापैकी दिड हजार खटल्यांमधील आरोपींचा गुन्हा सिद्ध झाला आहे.  तर साडेनऊ हजार खटल्यांमधील आरोपी पुरावे नसल्याने निर्दोष सुटले आहेत. यात महाराष्ट्रातील दोषसिद्धीचा दर १३.७ टक्के आहे.२०१९ अत्याचाराचे गुन्हेघटना    पीडितबलात्कार२,२९९    २,३०५बलात्कार/हत्या४७    ४७अपहरण६,९०६    ७,००८विनयभंग१०,४७२    १०,५१२तस्करी२२०    ६१४आत्महत्येस प्रवृत्त८०२    ८०८     हुंडा बळी१९६    १९६चिमुकलेही असुरक्षित...राज्यात अल्पवयीन मुलीही असुरक्षित आहेत. पॉक्सो अंतर्गत दाखल गुह्यांत देशात दर लाख लोकसंख्येमागे सरासरी सात गुन्हे घडतात. तर महाराष्ट्रात ११ गुन्हे घडत आहेत.महाराष्ट्रातील दोषसिद्धीचा दर १३.७% विविध कारणांसाठी अपहरण, विनयभंग, हुंड्यासाठी छळ या गुन्ह्यांमध्येही राज्य तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर आहे

टॅग्स :Murderखून