शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

हिरवागार महाराष्ट्र! जंगल क्षेत्रात २० चौरस किलोमीटरनं वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 07:27 IST

मुंबई शहराचा विचार करता येथील जंगल १११ चौरस किलोमीटरवर पसरलेले आहे. दिल्लीनंतर मुंबईचा क्रमांक लागतो.

मुंबई : देशातील सर्वात पाचवे मोठे जंगल महाराष्ट्रात आहे. हे जंगल २० चौरस किलोमीटरने वाढले आहे. राज्यभरातील जंगल ५० हजार ७९८ चौरस किलोमीटरवर पसरले आहे. मुंबई शहराचा विचार करता येथील जंगल १११ चौरस किलोमीटरवर पसरलेले आहे. दिल्लीनंतर मुंबईचा क्रमांक लागतो. गेल्या दहा वर्षांत मुंबईतल्या जंगलात ९ टक्के एवढी वाढ नोंदविली आहे. तत्पूर्वी ते १०२ चौरस किलोमीटरवर पसरलेले होते.२०२१ च्या सर्वेक्षणात वनक्षेत्रात वाढराज्यभरातील विविध प्रकल्पांसह अनेक कारणांमुळे जंगल नष्ट होत असल्याची भीती व्यक्त    करण्यात आली असतानाच  २०२१ च्या वन सर्वेक्षणात वनक्षेत्रात वाढ झाल्याचे दाखले देण्यात आले आहेत. देशातील बहुतांश राज्यातील वनात वाढ नोंदविण्यात येत असतानाच बहुतांशी राज्यांनी आपले वनक्षेत्र विविध माध्यमातून टिकवून ठेवले आहे. क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात जास्त वनक्षेत्र मध्य प्रदेशात आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.वृक्ष संपत्तीचे मूल्यांकनासाठी अहवालपर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारतीय वन सर्वेक्षण संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट २०२१ या अहवालाचे प्रकाशन केले.देशातील वन आणि वृक्ष संपत्तीचे मूल्यांकन करण्यासाठी हा अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे. देशाचे एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र ८०.९ दशलक्ष हेक्टर असून हे क्षेत्र  देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या २४.६२ टक्के आहे.२०१९ च्या मूल्यांकनाच्या तुलनेत, देशातील एकूण वन  आणि वृक्षाच्छादित क्षेत्रामध्ये २,२६१ चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे. सध्या केलेल्या मूल्यांकनातून १७ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये ३३ टक्क्यांहून अधिक भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित आहे.खारफुटीचे आच्छादनएकूण क्षेत्र ४,९९२ चौरस किमी आहे.२०१९ च्या  मूल्यांकनाच्या तुलनेत खारफुटीच्या आच्छादन क्षेत्रात १७ चौरस किमीची वाढ झाली आहे.ओरिसा ( ८ चौरस किमी ) त्यानंतर महाराष्ट्र (४ चौरस किमी) आणि कर्नाटक ( ३ चौरस किमी) ही खारफुटीच्या आच्छादनामध्ये वाढ दर्शवणारी पहिली तीन राज्य आहेत.