शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

हिरवागार महाराष्ट्र! जंगल क्षेत्रात २० चौरस किलोमीटरनं वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 07:27 IST

मुंबई शहराचा विचार करता येथील जंगल १११ चौरस किलोमीटरवर पसरलेले आहे. दिल्लीनंतर मुंबईचा क्रमांक लागतो.

मुंबई : देशातील सर्वात पाचवे मोठे जंगल महाराष्ट्रात आहे. हे जंगल २० चौरस किलोमीटरने वाढले आहे. राज्यभरातील जंगल ५० हजार ७९८ चौरस किलोमीटरवर पसरले आहे. मुंबई शहराचा विचार करता येथील जंगल १११ चौरस किलोमीटरवर पसरलेले आहे. दिल्लीनंतर मुंबईचा क्रमांक लागतो. गेल्या दहा वर्षांत मुंबईतल्या जंगलात ९ टक्के एवढी वाढ नोंदविली आहे. तत्पूर्वी ते १०२ चौरस किलोमीटरवर पसरलेले होते.२०२१ च्या सर्वेक्षणात वनक्षेत्रात वाढराज्यभरातील विविध प्रकल्पांसह अनेक कारणांमुळे जंगल नष्ट होत असल्याची भीती व्यक्त    करण्यात आली असतानाच  २०२१ च्या वन सर्वेक्षणात वनक्षेत्रात वाढ झाल्याचे दाखले देण्यात आले आहेत. देशातील बहुतांश राज्यातील वनात वाढ नोंदविण्यात येत असतानाच बहुतांशी राज्यांनी आपले वनक्षेत्र विविध माध्यमातून टिकवून ठेवले आहे. क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात जास्त वनक्षेत्र मध्य प्रदेशात आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.वृक्ष संपत्तीचे मूल्यांकनासाठी अहवालपर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारतीय वन सर्वेक्षण संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट २०२१ या अहवालाचे प्रकाशन केले.देशातील वन आणि वृक्ष संपत्तीचे मूल्यांकन करण्यासाठी हा अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे. देशाचे एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र ८०.९ दशलक्ष हेक्टर असून हे क्षेत्र  देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या २४.६२ टक्के आहे.२०१९ च्या मूल्यांकनाच्या तुलनेत, देशातील एकूण वन  आणि वृक्षाच्छादित क्षेत्रामध्ये २,२६१ चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे. सध्या केलेल्या मूल्यांकनातून १७ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये ३३ टक्क्यांहून अधिक भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित आहे.खारफुटीचे आच्छादनएकूण क्षेत्र ४,९९२ चौरस किमी आहे.२०१९ च्या  मूल्यांकनाच्या तुलनेत खारफुटीच्या आच्छादन क्षेत्रात १७ चौरस किमीची वाढ झाली आहे.ओरिसा ( ८ चौरस किमी ) त्यानंतर महाराष्ट्र (४ चौरस किमी) आणि कर्नाटक ( ३ चौरस किमी) ही खारफुटीच्या आच्छादनामध्ये वाढ दर्शवणारी पहिली तीन राज्य आहेत.