शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government : शिवसेनेच्या आमदारांचे वऱ्हाड चालले जयपूरला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 20:29 IST

राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिवआघाडीच्या सत्तेची बोलणी अंतिम टप्यात असून शिवआघाडीचे सरकार लवकर सत्तेवर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

-मनोहर कुंभेजकर

मुंबई: गेल्या 24 एप्रिलला विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला.मात्र सुमारे तीन आठवड्यानंतर राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आता लवकर सुटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिवआघाडीच्या सत्तेची बोलणी अंतिम टप्यात असून शिवआघाडीचे सरकार लवकर सत्तेवर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या पाश्र्वभूमीवर कोणताही दगाफटका होऊ नये याची काटेकोरपणे काळजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.शिबसेनेच्या विजयी आमदारांना उद्या शुक्रवार दि,22 रोजी सकाळी 10 वाजता मातोश्री येथे बोलावले आहे.आमदारांची बैठक झाल्यानंतर शिवसेनेचे विजयी आमदार व शिवसेनेला पाठिंबा देणारे 7 अपक्ष आमदार किमान 4 ते 5 दिवस जयपूरला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेनेच्या आमदारांना 4-5 दिवसांचे कपडे,ओळखपत्र म्हणून पॅनकार्ड व आधारकार्ड घेऊन येण्याचे आदेश मातोश्रीकडून देण्यात आले आहे. यापूर्वी शिवसेनेचे आमदारांना दि. 9 नोव्हेंबर ते दि. 13 नोव्हेंबर पर्यत मालाडच्या रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते,तर त्यापूर्वी दोन दिवस हे आमदार वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा मध्ये होते.मात्र यावेळी आमदारां बरोबर त्यांचे खाजगी सचिव, अंगरक्षक, जवळचे कार्यकर्ते असा लवाजमा होता. मात्र जयपूर दोऱ्याच्यावेळी फक्त आमदाराचा लवाजमा नसेल आणि फक्त आमदारच असतील असे समजते.मात्र उद्या किती वाजता जयपूरला जाणार, विमानाने का वातानुकूलीत बसने जयपूरला जाणार याची काही माहिती शिवसेनेच्या आंमदरांकडे नसल्याचे समजते.

जयपूर हे ठिकाण शिवसेनेच्या दृष्टीने सेफ असून यापूर्वी कॉंग्रेसच्या 44 विजयी आमदारांना काँग्रेस पक्षश्रेष्टींनी जयपूरला ठेवले होते. त्यात राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे.तर गोवा येथे भाजपा सरकार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गोवा एवजी उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना ठेवण्यासाठी जयपूरची निवड केल्याचे समजते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAditya Thackreyआदित्य ठाकरे