शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Maharashtra Government : शिवसेनेच्या आमदारांचे वऱ्हाड चालले जयपूरला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 20:29 IST

राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिवआघाडीच्या सत्तेची बोलणी अंतिम टप्यात असून शिवआघाडीचे सरकार लवकर सत्तेवर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

-मनोहर कुंभेजकर

मुंबई: गेल्या 24 एप्रिलला विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला.मात्र सुमारे तीन आठवड्यानंतर राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आता लवकर सुटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिवआघाडीच्या सत्तेची बोलणी अंतिम टप्यात असून शिवआघाडीचे सरकार लवकर सत्तेवर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या पाश्र्वभूमीवर कोणताही दगाफटका होऊ नये याची काटेकोरपणे काळजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.शिबसेनेच्या विजयी आमदारांना उद्या शुक्रवार दि,22 रोजी सकाळी 10 वाजता मातोश्री येथे बोलावले आहे.आमदारांची बैठक झाल्यानंतर शिवसेनेचे विजयी आमदार व शिवसेनेला पाठिंबा देणारे 7 अपक्ष आमदार किमान 4 ते 5 दिवस जयपूरला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेनेच्या आमदारांना 4-5 दिवसांचे कपडे,ओळखपत्र म्हणून पॅनकार्ड व आधारकार्ड घेऊन येण्याचे आदेश मातोश्रीकडून देण्यात आले आहे. यापूर्वी शिवसेनेचे आमदारांना दि. 9 नोव्हेंबर ते दि. 13 नोव्हेंबर पर्यत मालाडच्या रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते,तर त्यापूर्वी दोन दिवस हे आमदार वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा मध्ये होते.मात्र यावेळी आमदारां बरोबर त्यांचे खाजगी सचिव, अंगरक्षक, जवळचे कार्यकर्ते असा लवाजमा होता. मात्र जयपूर दोऱ्याच्यावेळी फक्त आमदाराचा लवाजमा नसेल आणि फक्त आमदारच असतील असे समजते.मात्र उद्या किती वाजता जयपूरला जाणार, विमानाने का वातानुकूलीत बसने जयपूरला जाणार याची काही माहिती शिवसेनेच्या आंमदरांकडे नसल्याचे समजते.

जयपूर हे ठिकाण शिवसेनेच्या दृष्टीने सेफ असून यापूर्वी कॉंग्रेसच्या 44 विजयी आमदारांना काँग्रेस पक्षश्रेष्टींनी जयपूरला ठेवले होते. त्यात राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे.तर गोवा येथे भाजपा सरकार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गोवा एवजी उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना ठेवण्यासाठी जयपूरची निवड केल्याचे समजते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAditya Thackreyआदित्य ठाकरे