शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

Maharashtra Government: शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचं साधलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 11:23 IST

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या विरोधात दंड थोपटले होते.

मुंबई : भाजपने माघार घेतल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसनेचा सत्तेस्थापनेचा मार्गे मोकळा झाला असून, गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. शिवसनेने मुख्यमंत्रीपदासाठी भाजप विरोधात पहिल्यापासूनचं आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे या दोन्ही पक्षात उभी फुट पडली आणि शिवसनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधी बाकावर तर भाजप-शिवसनेने एकत्र येत सरकार स्थापन केली होती. त्यांनतर २०१९ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजप-शिवसेना पक्षाने युती करून निवडणूक लढवली होती. त्यांनतर आलेल्या निकालानुसार जनतेने युतीला सत्तेत तर महाआघाडीला विरोधात बसण्याचा कौल दिला होता.

मात्र भाजप आणि शिवसेना ह्या दोन्ही पक्षाकडून मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला जात होता. तर शिवसनेने मुख्यमंत्रीपदासाठी थेट भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या विरोधात दंड थोपटले होते. काहीही झाले तर मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकच बसणार अशी त्यांनी शेवटपर्यंत भूमिका कायम ठेवली. त्यामुळे भाजप-शिवसेना वेगळे झाले आणि महाविकासआघाडीची निर्मिती झाली.

मुख्यमंत्री कोणत्याही परिस्थितीत आमचाच होणार अशी मागणी करणाऱ्या शिवसेनाला या दोन्ही पक्षांनी पाठींबा देत मुख्यमंत्रीपद सुद्धा देण्याची तयारी दर्शवली. तर भाजपचा हात सोडून शिवसनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे जनतेने विरोधात बसण्याचे कौल देऊन सुद्धा काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ते बसण्याची संधी साधली असल्याचे पाहायला मिळाले.