शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
2
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
3
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
4
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
5
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
6
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
7
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
8
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
9
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
10
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
11
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
12
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
13
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
14
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
15
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
16
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
17
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
18
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
19
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
20
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध

Maharashtra Government: महाशिवआघाडीबद्दल राजू शेट्टी म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 06:31 IST

राज्यात लवकरच शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचं सरकार येण्याची शक्यता

बेळगाव : भाजप सोडून भिन्न विचारधारा असणारे पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले आहेत. त्यांचा किमान समान कार्यक्रम ठरला आहे. किमान समान कार्यक्रमात शेतकरी, ग्रामीण युवकांना रोजगार, कर्जमाफी संबंधी ठोस भूमिका असेल तर महाआघाडीचा निर्णय घेणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.गेल्या वर्षभरात सरकारने साखरेच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले, पण सबसिडीची रक्कम सरकारने साखर कारखान्यांना दिली नाही. त्यामुळे दुसरीकडून पैसे घेऊन कारखान्याला व्याज भरावे लागते. म्हणून साखर कारखाने अडचणीत येत आहेत. निर्यातीला सबसिडी द्यायची, कच्ची साखर आयात करायची असे केंद्र सरकारचे मागच्या वर्षाचे धोरण होते. केंद्र सरकारच्या धोरणात सुसूत्रता नसल्यामुळे साखर उद्योगावर परिणाम झाला, अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली. भाजपने राष्ट्रपतिपदाची ऑफर जरी शरद पवार यांना दिली तरी पवार भाजपसोबत जाणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जयसिंगपूर येथे २३ नोव्हेंबर रोजी १८ वी राष्ट्रीय ऊस परिषद आयोजित करण्यात आली आहे. या ऊस परिषदेत साखर दर व एफआरपीबाबत चर्चा होणार आहे. बेळगावसह सीमाभागातून शेतकऱ्यांनी या परिषदेत सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raju Shettyराजू शेट्टी