शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Maharashtra Government: शिवसेनेच्या याचिकेला बळ देण्यासाठी राष्ट्रवादीची खेळी

By अतुल कुलकर्णी | Updated: November 13, 2019 05:30 IST

सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी पुरेसा वेळ दिला नाही म्हणून शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

अतुल कुलकर्णी मुंबई : सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी पुरेसा वेळ दिला नाही म्हणून शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेच्या या याचिकेला बळ मिळावे म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांकडे दोन दिवसाची मुदतवाढ मागितली, अशी माहिती समोर आली आहे.राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मात्र तशी तयारी दर्शविलेल्या पक्षांना त्यांनी वेळ वाढवून दिला नाही, असा युक्तीवाद न्यायालयात करता यावा यासाठी राष्ट्रवादीने मंगळवारी रात्री साडेआठची मुदत संपण्याच्या आतच राज्यपालांना पत्र देऊन दोन दिवस वाढवून मागितले. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीची मागणीही राज्यपालांनी फेटाळली व राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली.भाजपला महाराष्ट्रात भाजपशिवाय अन्य कोणत्याही पक्षाचे सरकार नको आहे, त्यामुळेच राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घाई केली, असा शिवसेनेचा दावा आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील राज्यपालांनी शेवटचा पर्याय म्हणून काँग्रेसला ही विचारणा करायला हवी होती. काँग्रेसलाही वेळ द्यायला पाहिजे होता, पण तो दिला नाही अशी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सगळी राजकीय सूत्रे वाय बी चव्हाण सेंटर येथे बसून हलवत आहेत. अहमद पटेल यांच्याशीही ते सतत संपर्कात आहेत. शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात जावे हा सल्ला त्यांनीच दिला. शिवसेना नेते अनिल परब हे स्वत: कपिल सिब्बल यांच्याशी बोलले. सिब्बल यांच्याशी पवार यांनीही बोलणे केल्याची सूत्रांनी माहिती दिली.राष्टÑवादीने राज्यपालांकडे मुदतवाढ मागितल्याची कोणतीही माहिती काँग्रेसला नव्हती. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांकडूनही वेगवेगळी विधाने समोर आली. परिणामी दोन्ही पक्षातल्या समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा दिसून आला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस