शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

Maharashtra Government: शिवसेनेने जनतेचा अपमान केला: महादेव जानकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 12:48 IST

मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेकडून जो दावा केला जात होता, तसा शब्दच भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी त्यांना दिला नव्हता असेही जानकर म्हणाले.

मुंबई : राज्यात महा विकास आघाडीची सत्तास्थापन होणार असल्याचे निश्चित झाले असून, भाजप आणि त्यांचा मित्रपक्षांना विरोधात बसावे लागणार आहे. तर यावरूनच रासपचे प्रमुख नेते महादेव जानकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राज्यातील मतदारांनी महायुतीला सत्तेत बसण्याचे कौल दिले असताना शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केल्याने हा जनतेचा अपमान असल्याचे जानकर म्हणाले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना जानकर म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपसोबत होतो. त्यामुळे आत्ता सुद्धा आम्ही त्यांच्या सोबतच राहणार असून त्यासाठी विरोधात बसण्याची वेळ आली तरीही चालेल. तसेच पुढे सत्ता आल्यास पुन्हा सत्तेत बसू, असे जानकर म्हणाले. तर याचबरोबर त्यांनी शिवसेनेवर सुद्धा टीका केली.

विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून जनते समोर गेलो होतो. त्यामुळे राज्यातील मतदारांनी महायुतीला सत्तेत बसण्याचा कौल दिला होता. मात्र शिवसेनेने जनतेचा अपमान करण्याची भूमिका घेतली, ती बरोबर नसल्याचे जानकर म्हणाले. महायुतीत निवडणूक लढवून त्यांनी ऐनवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

तसेच मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेकडून जो दावा केला जात होता, तसा शब्दच भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी त्यांना दिला नव्हता असेही जानकर म्हणाले. त्यामुळे शिवसेनेने असंघाशी संघ नको करायला पाहिजे होते. तर भाजप-शिवसेना एकत्र यावे म्हणून उद्धव ठाकरे यांची पाच वेळा भेट घेण्याचा मी प्रयत्न केला. मात्र अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद द्यायला तयार असेल तरच भेटीला या असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. असा दावा सुद्धा जानकर यांनी यावेळी केला.